शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

बारशीला वरुण बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 21:34 IST

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. त्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आदी उभी पीक करपून उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली होती. इतकेच नव्हे तर सध्यास्थितीत जिल्ह्यातील ११ जलायशांमध्ये केवळ ३९.३२ टक्के पाणी शिल्लक आहे.

ठळक मुद्देजलाशयांमध्ये केवळ ३९.३२ टक्के पाणी : कोरड्या दुष्काळाचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. त्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आदी उभी पीक करपून उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली होती. इतकेच नव्हे तर सध्यास्थितीत जिल्ह्यातील ११ जलायशांमध्ये केवळ ३९.३२ टक्के पाणी शिल्लक आहे. पुढील काळात जिल्ह्यात मुसळधार पाऊस न झाल्यास वर्धेकरांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. शुक्रवारी बारशीच्या दिवशी परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.पोथरा प्रकल्प १०० टक्के आणि लाल नाला प्रकल्प ९४ टक्के भरला असला तरी जिल्ह्यातील उर्वरित जलायशयांतील पाणी पातळी अतिशय अल्प असल्याचे वास्तव आहे. सध्यास्थितीत बोर प्रकल्पात ३१.३३, निम्न वर्धा प्रकल्पात २७.६७, धाम प्रकल्पात ३७.६५, पंचधारा प्रकल्पात २४.९१, डोंगरगाव प्रकल्प ७३.९२, मदन प्रकल्प ४९.३२, मदन उन्नई प्रकल्प १०.१५, वर्धा कार नदी प्रकल्प ३७.९३ तर सुकळी लघु प्रकल्पात ३६.८७ टक्के पाणी शिल्लक आहे. यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस शेत पिकांसाठी फायद्याचा ठरला असला तरी मुसळधार पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी पातळीत वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी याच दिवशी जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये ५८.३६ टक्के पाणी होते. मात्र, यंदाच्या वर्षी पावसाअभावी जलाशयात केवळ ३९.३२ टक्के पाणी शिल्लक आहेत. सप्टेंबर महिन्यात ओढावणारी ही परिस्थिती वर्धेकरांवर ऐरवी उन्हाळ्यात येत असे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास तूर, सोयाबीन, कापूस आदी उभी पीक करपून उत्पादनात घट येण्याची तसेच नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांसह जल तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.४.७ लाख हेक्टर वरील पीक धोक्यातजिल्ह्यात यंदाच्यावर्षी ६२ हजार ८८२.५ हेक्टरवर तूर, १ लाख १५ हजार ६६९ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख २९ हजार ५ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. सुरूवातीला पावसाने हूलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, नंतर समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीच्या कामांना शेतकऱ्यांनी वेग दिला. जिल्ह्यातील जलाशयांचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्यात येते. परंतु, सध्या अनेक जलाशये तळ दाखवत असल्याने यंदा सिंचनासाठीही शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीणच आहे. परिणामी, तूर व कापूस तसेच सोयाबीन पीक पाण्याअभावी धोक्यातच असल्याचे शेतकरी सांगतात.सोयाबीनवर लष्करीअळीचा प्रादुर्भावयंदाच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची निवड करताना अर्ली प्रजातीच्या बियाण्याची निवड करून त्याची लागवड केली. सध्या सदर पीक अंतीम टप्प्यात असून काही शेतकरी सोयाबीनची कापणीही करीत आहेत. असे असले तरी गत वर्षीच्या तूलनेत यंदा उत्पादनात घट येत असल्याचे काही सोयाबीन शेतकरी सांगतात. तर जे सोयाबीन पीक सध्या शेतात उभे आहे. त्या पिकांवर बऱ्यापैकी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली असून त्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.३४.९८ टक्के पावसाची तूटऐरवी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सरासरी १८२.६३ पाऊस पडतो. मात्र सध्या पावसाने जिल्ह्याकडे पाठ दाखविल्याचे वास्तव आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा ३४.९८ टक्के पाऊस जिल्ह्यात कमी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ज्यांनी सोयाबीनची पेरणी केली त्यांचे सोयाबीन बºयापैकी भरले. परंतु, नंतरच्या पेरणीतील सोयाबीन पीक पोटलोट झाले आहे. तसेच कपाशीबाबतही झाले आहे. ज्यांनी सहा, सात व आठ जूनला लागवड केली त्यांच्या कपाशीला चांगले बोंड आहेत. परंतु, नंतरच्या कपाशीला पाहिजे तशी बोंड आलेली नाही. आता जर पाऊस आला तर कपाशी व तूर या पिकाला फायदाच आहे; पण सोयाबीनचे नुकसान होईल.- राजेंद्र दहाघाने, शेतकरी.सोयाबीन पीक अपुऱ्या पावसामुळे पोट लोट होण्याची शक्यता आहे. तसेच लष्करीअळीमुळे अडचणीत भर पडली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.-भाष्कर काकडे, शेतकरी.या पावसाचा कपाशीला फायदा होईल. शिवाय दमदार पाऊस आल्यास पाणी पातळीत वाढ होईल. जर पावसाने पाठ फिरविली तर यंदा उन्हाळ्यापूर्वीच जलसंकटाला सोमोरे जावे लागणार आहे.-विजय बेलसरे, शेतकरी.

टॅग्स :Rainपाऊस