शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बारशीला वरुण बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 21:34 IST

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. त्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आदी उभी पीक करपून उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली होती. इतकेच नव्हे तर सध्यास्थितीत जिल्ह्यातील ११ जलायशांमध्ये केवळ ३९.३२ टक्के पाणी शिल्लक आहे.

ठळक मुद्देजलाशयांमध्ये केवळ ३९.३२ टक्के पाणी : कोरड्या दुष्काळाचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. त्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आदी उभी पीक करपून उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली होती. इतकेच नव्हे तर सध्यास्थितीत जिल्ह्यातील ११ जलायशांमध्ये केवळ ३९.३२ टक्के पाणी शिल्लक आहे. पुढील काळात जिल्ह्यात मुसळधार पाऊस न झाल्यास वर्धेकरांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. शुक्रवारी बारशीच्या दिवशी परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.पोथरा प्रकल्प १०० टक्के आणि लाल नाला प्रकल्प ९४ टक्के भरला असला तरी जिल्ह्यातील उर्वरित जलायशयांतील पाणी पातळी अतिशय अल्प असल्याचे वास्तव आहे. सध्यास्थितीत बोर प्रकल्पात ३१.३३, निम्न वर्धा प्रकल्पात २७.६७, धाम प्रकल्पात ३७.६५, पंचधारा प्रकल्पात २४.९१, डोंगरगाव प्रकल्प ७३.९२, मदन प्रकल्प ४९.३२, मदन उन्नई प्रकल्प १०.१५, वर्धा कार नदी प्रकल्प ३७.९३ तर सुकळी लघु प्रकल्पात ३६.८७ टक्के पाणी शिल्लक आहे. यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस शेत पिकांसाठी फायद्याचा ठरला असला तरी मुसळधार पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी पातळीत वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी याच दिवशी जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये ५८.३६ टक्के पाणी होते. मात्र, यंदाच्या वर्षी पावसाअभावी जलाशयात केवळ ३९.३२ टक्के पाणी शिल्लक आहेत. सप्टेंबर महिन्यात ओढावणारी ही परिस्थिती वर्धेकरांवर ऐरवी उन्हाळ्यात येत असे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास तूर, सोयाबीन, कापूस आदी उभी पीक करपून उत्पादनात घट येण्याची तसेच नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांसह जल तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.४.७ लाख हेक्टर वरील पीक धोक्यातजिल्ह्यात यंदाच्यावर्षी ६२ हजार ८८२.५ हेक्टरवर तूर, १ लाख १५ हजार ६६९ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख २९ हजार ५ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. सुरूवातीला पावसाने हूलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, नंतर समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीच्या कामांना शेतकऱ्यांनी वेग दिला. जिल्ह्यातील जलाशयांचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्यात येते. परंतु, सध्या अनेक जलाशये तळ दाखवत असल्याने यंदा सिंचनासाठीही शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीणच आहे. परिणामी, तूर व कापूस तसेच सोयाबीन पीक पाण्याअभावी धोक्यातच असल्याचे शेतकरी सांगतात.सोयाबीनवर लष्करीअळीचा प्रादुर्भावयंदाच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची निवड करताना अर्ली प्रजातीच्या बियाण्याची निवड करून त्याची लागवड केली. सध्या सदर पीक अंतीम टप्प्यात असून काही शेतकरी सोयाबीनची कापणीही करीत आहेत. असे असले तरी गत वर्षीच्या तूलनेत यंदा उत्पादनात घट येत असल्याचे काही सोयाबीन शेतकरी सांगतात. तर जे सोयाबीन पीक सध्या शेतात उभे आहे. त्या पिकांवर बऱ्यापैकी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली असून त्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.३४.९८ टक्के पावसाची तूटऐरवी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सरासरी १८२.६३ पाऊस पडतो. मात्र सध्या पावसाने जिल्ह्याकडे पाठ दाखविल्याचे वास्तव आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा ३४.९८ टक्के पाऊस जिल्ह्यात कमी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ज्यांनी सोयाबीनची पेरणी केली त्यांचे सोयाबीन बºयापैकी भरले. परंतु, नंतरच्या पेरणीतील सोयाबीन पीक पोटलोट झाले आहे. तसेच कपाशीबाबतही झाले आहे. ज्यांनी सहा, सात व आठ जूनला लागवड केली त्यांच्या कपाशीला चांगले बोंड आहेत. परंतु, नंतरच्या कपाशीला पाहिजे तशी बोंड आलेली नाही. आता जर पाऊस आला तर कपाशी व तूर या पिकाला फायदाच आहे; पण सोयाबीनचे नुकसान होईल.- राजेंद्र दहाघाने, शेतकरी.सोयाबीन पीक अपुऱ्या पावसामुळे पोट लोट होण्याची शक्यता आहे. तसेच लष्करीअळीमुळे अडचणीत भर पडली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.-भाष्कर काकडे, शेतकरी.या पावसाचा कपाशीला फायदा होईल. शिवाय दमदार पाऊस आल्यास पाणी पातळीत वाढ होईल. जर पावसाने पाठ फिरविली तर यंदा उन्हाळ्यापूर्वीच जलसंकटाला सोमोरे जावे लागणार आहे.-विजय बेलसरे, शेतकरी.

टॅग्स :Rainपाऊस