शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

सूत्रयज्ञातून बापूंना केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:34 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जनदिनाचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रमात दुपारी १२ वाजता सूत्रयज्ञ आणि सर्वधर्म प्रार्थना, ईशोपनिषदाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमाला अनेकांची उपस्थिती होती. सुत्रयज्ञात गांधीवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बापूंना अभिवादन केले.

ठळक मुद्देरक्षा विसर्जनदिन : सर्वधर्म प्रार्थनेला अनेकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जनदिनाचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रमात दुपारी १२ वाजता सूत्रयज्ञ आणि सर्वधर्म प्रार्थना, ईशोपनिषदाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमाला अनेकांची उपस्थिती होती. सुत्रयज्ञात गांधीवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बापूंना अभिवादन केले.महात्मा गांधीजींची हत्या दिल्ली येथे ३० जानेवारी १९४८ ला झाली. भारतीय पंरपरेप्रमाणे तेरवीची प्रथा आहे; पण बापूंनी अशा गोष्टींना आपल्या जीवनात महत्त्व दिले नव्हते. दिल्लीवरून गांधीजींच्या अस्ती आश्रमात त्यावेळी आणण्यात आल्या होत्या. त्याप्रसंगी भारताचे गव्हर्नर मंगलदास पकवासा हे सुद्धा आश्रमात आले होते. आश्रमातून १२ फेब्रुवारी १९४८ ला अस्तीकलश पवनारच्या धामनदीवर आश्रमचे कार्यकर्ते, नई तालिमचे ई. डब्लू. आर्यनायकम्, आशादेवी, शंकर पांडे आदींच्या उपस्थितीत नेण्यात आला होता. त्या ठिकाणी गव्हर्नर मंगलदास पकवासा यांच्यासह आदींच्या हस्ते बापूंच्या अस्ती धामनदीत विसर्जीत करण्यात आल्या. तेव्हापासून १२ फेब्रुवारी हा रक्षा विसर्जनदिन म्हणून पाळल्या जातो. मंगळवारी बापूकुटीच्या आवारात सूत्रयज्ञ पार पडला. त्यानंतर सर्वधर्म प्रार्थना, गिताई वाचन आणि इशोपनिषद झाले. याप्रसंगी आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे, शोभा कवाडकर, अश्विनी बघेल, प्रभा शहाने, रिता हुसैन, जालंधरनाथ, बाबा खैरकार, नामदेव ढोले, प्रशांत ताकसांडे, मिथून हरडे, सिद्धेश्वर उंबरकर, सचिन हुडे, इस्माईल हुसैन आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम