दिलीप चव्हाण - सेवाग्रामस्वातंत्र्यापूर्वी व नंतर आरोग्यावरील डॉ़ सुशीला नय्यर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. डॉक्टर असल्याने बापूंनी त्यांच्याकडे आरोग्याची जबाबदारी सोपविली. बापूंच्या विश्वासास त्या खऱ्या उतरल्या. आरोग्य सेवेचे अखंड व्रत त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत सांभाळले. त्यांच्या ध्येय व नीतिपूर्ण व्रतांमुळे त्या बापूंच्या ‘डॉक्टर कन्या’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. डॉ. सुशीला नय्यर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी गुजरात (पंजाब) जिल्ह्यातील ‘कंजा’ गावात झाला. हे गाव पाकिस्तानात आहे. शुक्रवारी (दि़२६) त्यांच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण होत आहे़ त्या शीख परिवारातील असून धार्मिक, सनातनी वातावरणात छत्र हरविले. यामुळे मोठे भाऊ प्यारेलालजी पितृतुल्य व गुरू समान मानले. डॉ. सुशीला नैयर यांना लहानपणापासून ‘बहनजी’ म्हणत असे. पुढे आदराने त्यांना ‘बडी बहनजी’ म्हणू लागले, ते कायमचेच! सुट्ट्यांच्या कालावधीत प्रथमच त्या १९३० मध्ये साबरमती आश्रमात प्यारेलालजी सोबत गेल्या. दुसऱ्या वर्षीही त्यांना जाण्याचा योग आला; पण बापूंची भेट होऊ शकली नाही. आश्रमातील सर्व काम त्या मन लावून करू लागल्या. पेळू बनविणे, सूत कातने आदी कामात त्या तरबेज झाल्या. १९३६ मध्ये गांधीजी सेवाग्राम येथे आले. आश्रम स्थापन झाला. ग्रामोन्नोतीचे कार्य आणि स्वातंत्र्य चळवळीला प्रारंभ झाला़ दरम्यान, बहनजी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्या आश्रमात आल्या. या मागे त्यांचे भाऊ प्यारेलालजी यांची प्रेरणा होती. प्रारंभी आश्रमातील कार्यकर्त्यांच्या आरोग्याची जबाबदारी गांधीजींकडे होती. ते प्राकृतिक चिकित्सा पद्धतीवर उपचार करीत. बहनजी आश्रमात आल्यानंतर ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. स्वतंत्र व्यवस्था म्हणून जमनालाल बजाज यांचे निवासस्थान (आखरी निवास) देण्यात आले. याच ठिकाणी एक छोटेखानी दवाखाना सुरू केला. याच छोटेखानी दवाखान्याचे मोठे स्वरूप कस्तुरबा दवाखान्याने घेतले. हा दवाखाना गांधीजींच्या इच्छेनुसार बिडलाजींच्या गेस्ट हाऊस येथे १९४५ मध्ये करण्यात आला.
नीतिपूर्ण व्रतांमुळे सुशीला झाल्या बापूंच्या डॉक्टर कन्या
By admin | Updated: December 25, 2014 23:36 IST