शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

बापू कुटीला भेट देत स्वीकारला पदभार

By admin | Updated: May 31, 2015 01:41 IST

महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद असून वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यात येईल.

नवीन सोना यांना निरोप : नवीन जिल्हाधिकारी रूजू वर्धा : महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद असून वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी एक टीम म्हणून काम करण्याचा मनोदय नवनियुक्त जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केला. वर्ध्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्याकडून पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या आश्रमामध्ये भेट देत बापू कुटीत प्रार्थनाही केली. नवीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अमरावती येथे प्रारंभी प्रोबेशन सेवा काळ पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर येथे उपविभागीय महसूल अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या काळात ग्रामविकासाच्या विविध योजना राबविल्या. जिल्ह्याच्या विकासाकरिता गरजेचे असलेले निर्णय तत्परतेने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून भरीव कामाची अपेक्षा वर्धेकर करीत आहेत.नवीन सोना यांना निरोपमावळते जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना निरोप तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या स्वागताचा कार्यक्रम विकास भवन येथे अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.जिल्ह्याच्या विकासासोबतच नवीन उपक्रम राबविताना जिल्ह्यातील जनतेचे तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगताना एन. नवीन सोना म्हणाले की वर्धा जिल्हा इ-जिल्हा करण्याचा यशस्वी प्रकल्प राबविल्याचे म्हणाले. देशात सर्वप्रथम जीआयएस प्रणालीवर आधारीत क्राईम मॅपिंग करण्यासोबतच मोबाईल पंचनामा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात केल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले निर्णय तत्परतेने घेवून ते प्रभावीपणे राबविण्याला प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. जनतेला शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ व सेवा सहज व सुलभपणे करण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कर्मचारी संघटनेतर्फे शैलेंद्र देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन अतुल रासपायले यांनी केले. आभार उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले. व्यासपीठावर उपवसंरक्षक मुकेश गाणात्रा, उपजिल्हाधिकारी वालस्कर, जैन, शिरीष पांडे, आर्वी उपविभागीय अधिकारी फडके उपस्थित होते.