शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बापू कुटीला भेट देत स्वीकारला पदभार

By admin | Updated: May 31, 2015 01:41 IST

महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद असून वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यात येईल.

नवीन सोना यांना निरोप : नवीन जिल्हाधिकारी रूजू वर्धा : महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद असून वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी एक टीम म्हणून काम करण्याचा मनोदय नवनियुक्त जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केला. वर्ध्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्याकडून पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या आश्रमामध्ये भेट देत बापू कुटीत प्रार्थनाही केली. नवीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अमरावती येथे प्रारंभी प्रोबेशन सेवा काळ पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर येथे उपविभागीय महसूल अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या काळात ग्रामविकासाच्या विविध योजना राबविल्या. जिल्ह्याच्या विकासाकरिता गरजेचे असलेले निर्णय तत्परतेने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून भरीव कामाची अपेक्षा वर्धेकर करीत आहेत.नवीन सोना यांना निरोपमावळते जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना निरोप तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या स्वागताचा कार्यक्रम विकास भवन येथे अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.जिल्ह्याच्या विकासासोबतच नवीन उपक्रम राबविताना जिल्ह्यातील जनतेचे तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगताना एन. नवीन सोना म्हणाले की वर्धा जिल्हा इ-जिल्हा करण्याचा यशस्वी प्रकल्प राबविल्याचे म्हणाले. देशात सर्वप्रथम जीआयएस प्रणालीवर आधारीत क्राईम मॅपिंग करण्यासोबतच मोबाईल पंचनामा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात केल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले निर्णय तत्परतेने घेवून ते प्रभावीपणे राबविण्याला प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. जनतेला शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ व सेवा सहज व सुलभपणे करण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कर्मचारी संघटनेतर्फे शैलेंद्र देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन अतुल रासपायले यांनी केले. आभार उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले. व्यासपीठावर उपवसंरक्षक मुकेश गाणात्रा, उपजिल्हाधिकारी वालस्कर, जैन, शिरीष पांडे, आर्वी उपविभागीय अधिकारी फडके उपस्थित होते.