शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बँकांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:31 IST

शंभर कोटी पेक्षा जास्त लक्ष्यांक असणाऱ्या बँकांनी कर्ज वाटपाचा रोज आढावा घ्यावा. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेत प्रसिद्ध करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पीक कर्ज वाटपाची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शंभर कोटी पेक्षा जास्त लक्ष्यांक असणाऱ्या बँकांनी कर्ज वाटपाचा रोज आढावा घ्यावा. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेत प्रसिद्ध करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वाटपाची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला राज्य कृषी मूल्य आयोगाचे नवनियुक्त सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, लिड बँकेचे प्रतिनिधी जगदीश यांच्यासह सर्व बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.तिवारी पुढे म्हणाले, जिल्ह्यात केवळ ३० टक्के कर्ज वाटप झाले आहे. ही खेदाची बाब आहे. कर्ज वाटपाची गती वाढविली गेली पाहिजे. कागदपत्रांअभावी कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज मिळण्यापासून वंचित ठेवू नये. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रा.पं. मध्ये फलक तयार करुन लावण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये दीड लाख पेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी वरील रक्कम भरल्यास शेतकऱ्याला ओटीएस योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम परत मागीतली तर शेतकऱ्यांना ती परत करण्यात यावी. तांत्रिक अडचण दूर झाल्यावर शेतकऱ्यांना पुन्हा रक्कम भरण्यास सांगण्यात यावे असेही यावेळी त्यांनी सांगितले.भारतीय स्टेट बँक ही कर्ज वाटपात मागे आहे. त्यामुळे या बँकेत असलेले शासनाचे खाते बंद करावेत असे स्पष्ट निर्देश याप्रसंगी किशोर तिवारी यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिलेत.अन्यथा बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू - नवालशासनाच्या कोणत्याही योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर ते कर्ज खात्यात वळते करू नये. वळते केल्यास संबंधित बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी सर्व बँक अधिकाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज