शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१० हजाराच्या कर्जाकरिता बँकांकडून परवानगीचा पाढा

By admin | Updated: June 16, 2017 01:28 IST

शेतकऱ्यांनी ११ दिवस केलेल्या संघर्षाचे फलित म्हणून शासनाने ११ जून रोजी सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली;

शासनाची मलमपट्टी : ‘पिक कर्ज नव्हे तर हमी कर्ज’लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी ११ दिवस केलेल्या संघर्षाचे फलित म्हणून शासनाने ११ जून रोजी सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली; पण यातील निकष ठरविण्याकरिता कालावधी लागणार आहे. सध्या खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज राहणार आहे. ही बाब लक्षात घेत शासनाने कृषी निविष्ठांच्या खरेदीकरिता शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे ‘हमी कर्ज’ देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आले असले तरी बँकाकडून मात्र परवानगीचा पाढा वाचल्या जात असल्याचे दिसून आले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली आहे; पण यात निव्वळ शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून कर्जमाफीसाठी काही निकष ठरविले जाणार आहेत. हे निकष निश्चित करण्याकरिता काही कालावधी लागणार आहे. यामुळे कर्जमाफीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब होणार आहे. ही बाब शासनाने मान्य करताना शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, याचाही विचार केल्याचे दिसते. केवळ दहा हजार रुपयांत शेती होत नाही, हे खरे असले तरी खरीप हंगामाच्या तोंडावर ती मदत शेतकऱ्यांना मोलाची ठरणारी आहे. यासाठी शासनाने परिपत्रक काढले आहे. हे कर्ज कुणाला मिळू शकणार नाही, याचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यात राज्य, जिल्हा व स्थानिक लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासकीय कुठलाही अधिकारी, कर्मचारी, आयकर रिटर्न भरणारी व्यक्ती, डॉक्टर, वकील, सीए, अभियंते, कुठलाही कंत्राटदार, कारखाने, बाजार समिती, सूतगिरणी, सहकारी बँक, दूध संघांचे संचालक, अधिकारी, मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती, कुटुंबातील कुणाच्याही नावावर चारचाकी वाहन असेल असे कुटुंब, मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ नुसार परवानाधारक व्यक्ती यांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्षात कर्ज वितरणाला अद्याप प्रारंभ झालेला नाही. बॅकांना आदेश नाहीचशासनाने दहा हजार रुपये मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत परिपत्रक जारी केले; पण अद्याप याबाबत रिझर्व्ह बँकेला निर्देश देण्यात आलेले नाही. परिणामी, बँकांनाही या अध्यादेशाबाबत कुठलेही आदेश आलेले नाही. रिझर्व्ह बँक आदेश देणार नाही, तोपर्यंत कुठलेही कर्ज देणे वा कर्जमाफीची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे. गुरूवारी शासनाने निर्णय जारी केला असला तरी रिझर्व्ह बँकेचे आदेश आल्यानंतरच कार्यवाही केली जाणार असल्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे.