शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
2
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
3
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
4
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
5
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
6
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
7
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
8
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
9
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
10
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
11
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
12
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
13
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
14
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
15
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
16
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
17
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
18
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
19
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
20
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामातील पीककर्ज वाटपात बँकांनी गाठले अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 22:28 IST

ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ४२४ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप झाले असून बँकांनी निम्मे उद्दिष्ट गाठले  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावेळीही करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे खरीप हंगामातील पीककर्ज वितरण  प्रक्रिया मध्यंतरीच्या काळात मंदावली होती. अनलॉकनंतर कर्जवाटपाला गती आली असून ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार ५३४ शेतकऱ्यांना ४२४ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. कर्जवाटपाची ही टक्केवारी ५० टक्के आहे.जिल्ह्यातील बँकांना  ८५० कोटी रुपये खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यात ४ लाख ३३ हजार ८५० हेक्टरवर खरिपातील पिकांची पेरणी करण्यात आली. खरीप हंगाम आता उलटण्याच्या मार्गावर असून १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागीलवर्षी तब्बल पाच महिने लॉकडाऊन होते. यावेळीही मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केला. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येने अक्षरश: तांडव घातले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात आले होते. शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला होता. ८ मे पासून १८ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने या काळात बँकांदेखील बंद होत्या. ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ४२४ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप झाले असून बँकांनी निम्मे उद्दिष्ट गाठले  आहे. 

१ ऑक्टोबरपासून रब्बीचे कर्जवितरण- खरीप हंगामातील पीककर्ज वितरणाने अर्थशतक गाठले आहे.  खरीप हंगाम आता उलटण्याच्या मार्गावर आहे. १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील एकूण खातेदार शेतकरी ३६५३४

मागीलवर्षीपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यावेळीही हे संकट कायम असल्याने मध्यंतरी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणावर परिणाम झाला. अनलॉकनंतर बँकांचे कामकाज पूर्वपदावर आले असून कर्जवाटपालाही गती आली आहे. खरीप हंगामातील कर्जवाटपाचे निम्मे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे.-वैभव लहाने, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक