शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

खरीप हंगामातील पीककर्ज वाटपात बँकांनी गाठले अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 22:28 IST

ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ४२४ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप झाले असून बँकांनी निम्मे उद्दिष्ट गाठले  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावेळीही करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे खरीप हंगामातील पीककर्ज वितरण  प्रक्रिया मध्यंतरीच्या काळात मंदावली होती. अनलॉकनंतर कर्जवाटपाला गती आली असून ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार ५३४ शेतकऱ्यांना ४२४ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. कर्जवाटपाची ही टक्केवारी ५० टक्के आहे.जिल्ह्यातील बँकांना  ८५० कोटी रुपये खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यात ४ लाख ३३ हजार ८५० हेक्टरवर खरिपातील पिकांची पेरणी करण्यात आली. खरीप हंगाम आता उलटण्याच्या मार्गावर असून १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागीलवर्षी तब्बल पाच महिने लॉकडाऊन होते. यावेळीही मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केला. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येने अक्षरश: तांडव घातले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात आले होते. शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला होता. ८ मे पासून १८ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने या काळात बँकांदेखील बंद होत्या. ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ४२४ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप झाले असून बँकांनी निम्मे उद्दिष्ट गाठले  आहे. 

१ ऑक्टोबरपासून रब्बीचे कर्जवितरण- खरीप हंगामातील पीककर्ज वितरणाने अर्थशतक गाठले आहे.  खरीप हंगाम आता उलटण्याच्या मार्गावर आहे. १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील एकूण खातेदार शेतकरी ३६५३४

मागीलवर्षीपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यावेळीही हे संकट कायम असल्याने मध्यंतरी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणावर परिणाम झाला. अनलॉकनंतर बँकांचे कामकाज पूर्वपदावर आले असून कर्जवाटपालाही गती आली आहे. खरीप हंगामातील कर्जवाटपाचे निम्मे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे.-वैभव लहाने, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक