शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँकांकडून केली जातेय टाळाटाळ

By admin | Updated: May 30, 2015 00:10 IST

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यास सारवाडी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया टाळाटाळ करीत आहे.

कारंजा (घा.) : शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यास सारवाडी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया टाळाटाळ करीत आहे. गोड बोलून कर्ज व व्याजाची रक्कम भरण्यास सांगितले आणि पुन्हा कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दोन वर्षे कर्ज देता येणार नसल्याचे पत्रच सदर बँकेने देत हेकेखोरीचा प्रत्यय दिला, असा आरोप शेतकरी करीत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सततची नापिकी, कर्ज, ओला व कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कशीबशी पीक कर्जाची रक्कम जुळवून शेतकरी जुने कर्ज भरून नवीन वाढीव रक्कम मिळणार, या आशेने बँकांकडे पाहत आहे; पण बँक व्यवस्थापक शेतकऱ्यांना निराश केली असल्याचे दितसे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश असताना शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली केली जात आहे. शिवाय ऐन पेरणीच्या वेळी बोळवण केली जात आहे.तालुक्यातील बोंदरठाणा येथील शेतकरी सत्यविजय बापुराव गाखरे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा सारवाडी येथून पीक कर्ज घेतले होते. या कर्जापोटी त्यांनी २८ एप्रिल रोजी मुद्दल ८६ हजार ४० रुपये अदा केले. शिवाय १३ मार्च रोजी २१ हजार ५०५ रुपयांचा भरणा करून मागील थकबाकीही अदा केली. यानंतर चालू हंगामाकरिता पीक कर्जाची मागणी केली असता सदर बँक पीक कर्ज देण्यास नकार देत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुम्हाला दोन वर्षे पीक कर्ज मिळत नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे जा की मुख्यमंत्र्याकडे, त्यांना घेऊन या तरी पीक कर्ज मिळणार नाही’, अशी दमदाटीही व्यवस्थापकाने केली. दुष्काळी परिस्थितीत कर्जमुक्तीसाठी जवळची रक्कम बँकेत भरल्याने व आता कर्ज नाकारल्याने शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. हे एकच नव्हे तर तालुक्यात अनेक प्रकरणे आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष कारवाई करावी व कर्ज मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकरी सत्यविजय गाखरे यांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)बँक महाअदालतीत शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन गोडी-गुलाबीने कर्जाची वसुली करून घेतात. पीक कर्ज वाटपाची वेळ आल्यावर ते नाकारले जाते. नापिकी, कर्जबाजारीपणाने शेतकरी त्रस्त आहे. यातच कर्ज भरूनही पीक कर्ज मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कर्ज का भरावे, हा प्रश्नच आहे. बँकेने १२ मे रोजी कर्ज मिळणार नाही, असे पत्र दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.