शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँकांकडून केली जातेय टाळाटाळ

By admin | Updated: May 30, 2015 00:10 IST

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यास सारवाडी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया टाळाटाळ करीत आहे.

कारंजा (घा.) : शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यास सारवाडी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया टाळाटाळ करीत आहे. गोड बोलून कर्ज व व्याजाची रक्कम भरण्यास सांगितले आणि पुन्हा कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दोन वर्षे कर्ज देता येणार नसल्याचे पत्रच सदर बँकेने देत हेकेखोरीचा प्रत्यय दिला, असा आरोप शेतकरी करीत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सततची नापिकी, कर्ज, ओला व कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कशीबशी पीक कर्जाची रक्कम जुळवून शेतकरी जुने कर्ज भरून नवीन वाढीव रक्कम मिळणार, या आशेने बँकांकडे पाहत आहे; पण बँक व्यवस्थापक शेतकऱ्यांना निराश केली असल्याचे दितसे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश असताना शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली केली जात आहे. शिवाय ऐन पेरणीच्या वेळी बोळवण केली जात आहे.तालुक्यातील बोंदरठाणा येथील शेतकरी सत्यविजय बापुराव गाखरे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा सारवाडी येथून पीक कर्ज घेतले होते. या कर्जापोटी त्यांनी २८ एप्रिल रोजी मुद्दल ८६ हजार ४० रुपये अदा केले. शिवाय १३ मार्च रोजी २१ हजार ५०५ रुपयांचा भरणा करून मागील थकबाकीही अदा केली. यानंतर चालू हंगामाकरिता पीक कर्जाची मागणी केली असता सदर बँक पीक कर्ज देण्यास नकार देत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुम्हाला दोन वर्षे पीक कर्ज मिळत नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे जा की मुख्यमंत्र्याकडे, त्यांना घेऊन या तरी पीक कर्ज मिळणार नाही’, अशी दमदाटीही व्यवस्थापकाने केली. दुष्काळी परिस्थितीत कर्जमुक्तीसाठी जवळची रक्कम बँकेत भरल्याने व आता कर्ज नाकारल्याने शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. हे एकच नव्हे तर तालुक्यात अनेक प्रकरणे आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष कारवाई करावी व कर्ज मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकरी सत्यविजय गाखरे यांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)बँक महाअदालतीत शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन गोडी-गुलाबीने कर्जाची वसुली करून घेतात. पीक कर्ज वाटपाची वेळ आल्यावर ते नाकारले जाते. नापिकी, कर्जबाजारीपणाने शेतकरी त्रस्त आहे. यातच कर्ज भरूनही पीक कर्ज मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कर्ज का भरावे, हा प्रश्नच आहे. बँकेने १२ मे रोजी कर्ज मिळणार नाही, असे पत्र दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.