शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
2
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
3
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
4
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
5
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
6
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
7
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
8
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
9
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
10
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
11
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
12
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
13
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
15
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
16
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
17
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
18
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
19
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
20
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले

सहा दिवसांपासून बँकेतील व्यवहार ठप्प

By admin | Updated: May 19, 2014 23:47 IST

येथील कारंजा चौकस्थित बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील आर्थिक व्यवहार मंगळवार पासून ठप्प झाले आहे. परिणामी ग्राहकांना व्यवहार करता आले नाही.

हिंगणघाट : येथील कारंजा चौकस्थित बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील आर्थिक व्यवहार मंगळवार पासून ठप्प झाले आहे. परिणामी ग्राहकांना व्यवहार करता आले नाही. याचा नाहक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील बँकेचे व्यवस्थापक यांनी सहा दिवसांपासून लिंक असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याची माहिती दिली. नागपूर येथील विभागीय कार्यालयात याबाबत माहिती देऊनही काहीच उपाययोजना करण्यात न आल्याने बँकेच्या नाकर्तेपणाचा ग्राहकांना फटका बसत आहे. सतत सहा दिवसांपासून ग्राहकांची बँकेत गर्दी पहायला मिळत आहे. खातेदार शेतकरी, व्यावसायिक, ठेकेदार, नोकरदार मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करतात. यासोबतच लग्नाचा हंगाम असल्यामुळे ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी असते. मात्र मंगळवारपासून लिंक फेल झाल्यामुळे बँकेत कोणत्याच प्रकारचे व्यवहार होत नाही. यामुळे ग्राहक येथील मेटाकुटीला आले आहेत. लगतच्या बँक आॅफ इंडियाच्या जाम, वडनेर, समुद्रपूर, अल्लीपूर शाखेत लिंक योग्य असून तेथील व्यवहार सुरळीत आहेत. मात्र हिंगणघाट शाखेत खाते असलेल्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ग्राहकांनाा १० किलोमीटर अंतरावरील जाम शाखेत आर्थिक व्यवहाराकरिता पाठविले जात आहे. मात्र तेथूनही केवळ ५० हजार रुपयांपर्यंत व्यवहार होत आहेत. परिणामी, अनेक ग्राहक अडचणीत सापडले आहेत. हिंगणघाट शाखेतून योग्य व नियमित सेवा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. गॅस अनुदानाबाबतही अनेक वादग्रस्त प्रकरण अनेकदा समोर आले आहे. याबाबत बँकेचे व्यवस्थापक आय. आर. गिरडकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, लिंक फेल झाल्याची माहिती हिंगणघाट शाखेतर्फे नागपूरच्या विभागीय कार्यालयाला देण्यात आली आहे. मात्र संबंधित अभियंत्याला अद्याप पाठविण्यात आलेले नाही. तांत्रिक बिघाड पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत लिंक सुरु होणे शक्य नाही. याकरिता नागपूरचे विभागीय कार्यालयच जबाबदार आहे, असे सांगितले. यासर्व प्रकारात मात्र ग्राहकांची नाहक कुचंबना होत आहे. हा तांत्रिक बिघाड त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)