शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

सहा दिवसांपासून बँकेतील व्यवहार ठप्प

By admin | Updated: May 19, 2014 23:47 IST

येथील कारंजा चौकस्थित बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील आर्थिक व्यवहार मंगळवार पासून ठप्प झाले आहे. परिणामी ग्राहकांना व्यवहार करता आले नाही.

हिंगणघाट : येथील कारंजा चौकस्थित बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील आर्थिक व्यवहार मंगळवार पासून ठप्प झाले आहे. परिणामी ग्राहकांना व्यवहार करता आले नाही. याचा नाहक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील बँकेचे व्यवस्थापक यांनी सहा दिवसांपासून लिंक असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याची माहिती दिली. नागपूर येथील विभागीय कार्यालयात याबाबत माहिती देऊनही काहीच उपाययोजना करण्यात न आल्याने बँकेच्या नाकर्तेपणाचा ग्राहकांना फटका बसत आहे. सतत सहा दिवसांपासून ग्राहकांची बँकेत गर्दी पहायला मिळत आहे. खातेदार शेतकरी, व्यावसायिक, ठेकेदार, नोकरदार मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करतात. यासोबतच लग्नाचा हंगाम असल्यामुळे ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी असते. मात्र मंगळवारपासून लिंक फेल झाल्यामुळे बँकेत कोणत्याच प्रकारचे व्यवहार होत नाही. यामुळे ग्राहक येथील मेटाकुटीला आले आहेत. लगतच्या बँक आॅफ इंडियाच्या जाम, वडनेर, समुद्रपूर, अल्लीपूर शाखेत लिंक योग्य असून तेथील व्यवहार सुरळीत आहेत. मात्र हिंगणघाट शाखेत खाते असलेल्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ग्राहकांनाा १० किलोमीटर अंतरावरील जाम शाखेत आर्थिक व्यवहाराकरिता पाठविले जात आहे. मात्र तेथूनही केवळ ५० हजार रुपयांपर्यंत व्यवहार होत आहेत. परिणामी, अनेक ग्राहक अडचणीत सापडले आहेत. हिंगणघाट शाखेतून योग्य व नियमित सेवा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. गॅस अनुदानाबाबतही अनेक वादग्रस्त प्रकरण अनेकदा समोर आले आहे. याबाबत बँकेचे व्यवस्थापक आय. आर. गिरडकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, लिंक फेल झाल्याची माहिती हिंगणघाट शाखेतर्फे नागपूरच्या विभागीय कार्यालयाला देण्यात आली आहे. मात्र संबंधित अभियंत्याला अद्याप पाठविण्यात आलेले नाही. तांत्रिक बिघाड पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत लिंक सुरु होणे शक्य नाही. याकरिता नागपूरचे विभागीय कार्यालयच जबाबदार आहे, असे सांगितले. यासर्व प्रकारात मात्र ग्राहकांची नाहक कुचंबना होत आहे. हा तांत्रिक बिघाड त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)