शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:50 IST

तालुक्यातील केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या आहेत. विहिरींनी तळ गाठल्याने तर काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये थेंंब भरही पाणी नसल्याने तसेच जून महिन्याचे १५ दिवस लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे. या प्रकारामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : शासकीय मदतीची मागणी

प्रफुल्ल लुंगे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या आहेत. विहिरींनी तळ गाठल्याने तर काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये थेंंब भरही पाणी नसल्याने तसेच जून महिन्याचे १५ दिवस लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.सेलू तालुक्यातील नामशेष होवू पाहणाऱ्या केळीच्या बागांची संख्या पुन्हा वाढीला लागली होती. एवढेच नव्हे तर केळी पिकविण्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले पाच युनिट सेलूत सुरू झाले. कच्ची केळी या राईपनिंग युनिटमध्ये पिकवून विक्रीसाठी मोठ्या बाजारपेठेत पाठविल्या जाते. आतापर्यंत ठिंबक सिंचनावर जागविलेल्या बागा उन्हाने करपल्या आहेत.विहिरी कोरड्या पडल्या आहे. उभे पीक वाळताना पाहुन शेतकरी हवालदील झाला आहे. हिच परिस्थिती ऊस उत्पादक शेतकºयांवरही ओढावली आहे. एकूणच यंदाच्या दुष्काळाने अनेकांच्या अडचणीत भर टाकली असून नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने भरीव शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.यंदा पाण्याची भीषण टंचाई आहे. जून महिन्याचे १५ दिवस लोटले तरी दमदार पाऊस झाला नाही. करपलेली काही झाडे दमदार पाऊस आल्यावर हिरवी होण्याची शक्यता असल्याने पावसाची प्रतीक्षा आहे. शेतातील विहिरीही कोरड्या झाल्याने केळीच्या बागा करपल्या आहेत. केळीचा बगीचा तयार करायचा खूप खर्च येतो. त्यामुळे शासनानेही नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी भरीव शासकीय मदत द्यावी.- पुरूषोत्तम बोबडे, केळी उत्पादक शेतकरी, वडगाव (कला.).