शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

वाळू उपशावर बंदी घाटाचा ताबा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:50 IST

वाळू घाटांसंदर्भात न्यायालयात प्रकरण सुरु असल्यानेच वर्षभर वाळूघाटांचे लिलाव थांबले होते. अखेर मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचे लिलाव करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाळू घाटांसंदर्भात न्यायालयात प्रकरण सुरु असल्यानेच वर्षभर वाळूघाटांचे लिलाव थांबले होते. अखेर मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचे लिलाव करण्यात आले. या घाटावरुन उपसा सुरु असतानाच आता वाळू उपसा थांबवावा, असे न्यायालयाचे आदेश धडकल्याने जिल्हा खनिकर्म विभागाच्यावतीने घाटधारकांना सूचना दिल्या आहे. सध्या वाळूउपसा बंद केला तरीही घाटाचा ताबा मात्र कायमच आहे.शासनाने वाळू घाटावरुन वाळूचा उपसा करण्याकरिता काही नियम व अटी घालून दिल्या आहे. मात्र घाटधारकांकडून प्रत्यक्षात या नियमांना तिलाजली दिली जात असल्याने न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने मागील वर्षी घाटांचे लिलाव थांबले होते. यामुळे वाळू माफियांनी वाळूची चोरी करुन आपले उखळ पांढरे केले. पण, यात शासनाचा महसूल बुडाला आणि सर्वसामान्यांच्याही खिशाला झळ पोहोचली. त्यानंतर यावर्षी मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचा लिलाव करण्यात आला. लिलाव होताच काही घाटधारकांनी घाटाचा ताबा मिळण्यापूर्वीच नियमबाह्य वाळू उपसा सुरु केला. पंधरा ते वीस दिवस वाळूची उचल केली नाही तोच न्यायालयाचा आदेश धडकला. या आदेशानुसार सुरु असलेल्या घाटांवरील वाळू उपसा थांबवावा, अशा सूचना जिल्हा खनिकर्म विभागाने दिल्या. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत उपसा थांबविण्याच्या सूचना असल्याने घाटधारकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. पण या आदेशाचे पालन होईल काय? हा प्रश्नच आहे.-तर घाटधारकाची रक्कम परत करावी लागणारवर्षभराच्या प्रतिक्षेनंतर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दहा घाटांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापैकी आठ घाटांचाच लिलाव करण्यात आला. यातून शासनाला ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५२ रुपयाचा महसूल मिळाला. जर या घाटावर न्यायालयाच्या आदेशाने कायमची बंदी घातल्यास शासनाला घाटधारकांची ही रक्कम परत करावी लागणार.

टॅग्स :sandवाळू