शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये मतमोजणीला सुरुवात; NDA ने घेतली आघाडी, पण तेजस्वी यादवांच्या राजदचीही मुसंडी
2
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
5
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
6
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
7
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
8
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
9
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
10
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
11
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
12
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
13
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
16
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
17
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
18
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
19
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
20
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशावर बंदी घाटाचा ताबा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:50 IST

वाळू घाटांसंदर्भात न्यायालयात प्रकरण सुरु असल्यानेच वर्षभर वाळूघाटांचे लिलाव थांबले होते. अखेर मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचे लिलाव करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाळू घाटांसंदर्भात न्यायालयात प्रकरण सुरु असल्यानेच वर्षभर वाळूघाटांचे लिलाव थांबले होते. अखेर मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचे लिलाव करण्यात आले. या घाटावरुन उपसा सुरु असतानाच आता वाळू उपसा थांबवावा, असे न्यायालयाचे आदेश धडकल्याने जिल्हा खनिकर्म विभागाच्यावतीने घाटधारकांना सूचना दिल्या आहे. सध्या वाळूउपसा बंद केला तरीही घाटाचा ताबा मात्र कायमच आहे.शासनाने वाळू घाटावरुन वाळूचा उपसा करण्याकरिता काही नियम व अटी घालून दिल्या आहे. मात्र घाटधारकांकडून प्रत्यक्षात या नियमांना तिलाजली दिली जात असल्याने न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने मागील वर्षी घाटांचे लिलाव थांबले होते. यामुळे वाळू माफियांनी वाळूची चोरी करुन आपले उखळ पांढरे केले. पण, यात शासनाचा महसूल बुडाला आणि सर्वसामान्यांच्याही खिशाला झळ पोहोचली. त्यानंतर यावर्षी मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचा लिलाव करण्यात आला. लिलाव होताच काही घाटधारकांनी घाटाचा ताबा मिळण्यापूर्वीच नियमबाह्य वाळू उपसा सुरु केला. पंधरा ते वीस दिवस वाळूची उचल केली नाही तोच न्यायालयाचा आदेश धडकला. या आदेशानुसार सुरु असलेल्या घाटांवरील वाळू उपसा थांबवावा, अशा सूचना जिल्हा खनिकर्म विभागाने दिल्या. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत उपसा थांबविण्याच्या सूचना असल्याने घाटधारकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. पण या आदेशाचे पालन होईल काय? हा प्रश्नच आहे.-तर घाटधारकाची रक्कम परत करावी लागणारवर्षभराच्या प्रतिक्षेनंतर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दहा घाटांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापैकी आठ घाटांचाच लिलाव करण्यात आला. यातून शासनाला ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५२ रुपयाचा महसूल मिळाला. जर या घाटावर न्यायालयाच्या आदेशाने कायमची बंदी घातल्यास शासनाला घाटधारकांची ही रक्कम परत करावी लागणार.

टॅग्स :sandवाळू