शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बंधपत्रित एमबीबीएसच्या नियुक्तीने बीएएमएस डॉक्टर बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 11:37 IST

Wardha News आरोग्य विभागाने बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केल्याने दोन वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले. या निर्णयामुळे बीएएमएस डॉक्टरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा आदेश ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित?

 लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टरांचा सेवा देण्यास नकार असतो, त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेची धुरा बीएएमएस डॉक्टरांनाच सांभाळावी लागत आहे. या कोरोनाकाळातही बीएएमएस डॉक्टरांचा रुग्णांना मोठा आधार मिळाला. परंतु आता आरोग्य विभागाने बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केल्याने दोन वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले. या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्यासह राज्यात इतरत्र कार्यरत असलेल्या बीएएमएस डॉक्टरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस डॉक्टरांच्या जागा रिक्त राहत असल्यामुळे बीएएमएस डॉक्टरांची वर्षभराच्या करारावर नियुक्ती करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा डोलारा या बीएएमएस डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. कोरोनाकाळातही हे बीएएमएस डॉक्टर दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहे. परंतु आता आरोग्य विभागाने बंधनपत्रित एमबीबीएस डॉक्टरांची एक वर्षाकरिता नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यात १५ बंधपत्रिक एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याने १५ बीएएमएस डॉक्टरांना अचानक ते कार्यरत असलेल्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. हीच अवस्था राज्यातील इतरही जिल्ह्यातील असल्याने बीएएमएस डॉक्टरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता इतर कार्यरत बीएएमएस डॉक्टरांचीही चिंता वाढली आहे.

एक वर्षानंतर पुढे काय?

आरोग्य संचालकांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये बंधनपत्रित एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केवळ वर्षभरासाठीच आहे. वर्षभरानंतर हे बंधपत्रित डॉक्टर उच्च शिक्षणाकरिता किंवा इतर कारणांकरिता निघून जाईल. त्यानंतर येथील आरोग्य सेवेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या आदेशाने गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असलेले बीएएमएस डॉक्टरही कार्यमुक्त झालेत आणि बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टरही वर्षभरानंतर निघून जाणार आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.

एमबीबीएस डॉक्टरांच्या सेवा पूर्ववत करा

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदावर कंत्राटी स्वरुपात बीएएमएस डॉक्टरांची सेवा घेण्यात आली. कोविड काळात दोन वर्षांपासून ते सेवा देत आहे. परंतु आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने बीएएमएस डॉक्टरांच्या सेवा समाप्त करून बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टरांना नियुक्ती देण्यात आली आहे. आरोग्य केंद्रातील अनुभवी बीएएमएस डॉक्टरांना कार्यमुक्त केल्याने ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे बीएएमएस डॉक्टरांची सेवा पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मृणाल माटे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर