शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

गिट्टी खदानीतील खड्ड्यांनी घेतला तिघींचा बळी

By admin | Updated: July 25, 2016 01:50 IST

गिट्टी खदानीत उत्खननामुळे निर्माण झालेल्या खड्डेरूपी तलावातील पाणी नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

वर्धा : गिट्टी खदानीत उत्खननामुळे निर्माण झालेल्या खड्डेरूपी तलावातील पाणी नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. देवळी तालुक्यातील आगरगाव येथील तीन मुलींचा या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघड झाली. यावेळी एका गावकऱ्याच्या प्रयत्नाने त्यांच्यासोबत असलेल्या तिघी थोडक्यात बचावल्या. आगरगाव येथील सहा मुली या खदानीवर कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. यात खड्ड्यांतील पाण्यात पडून अंजली हिरणसिंग भोसले (१८), रोहिणी सुइंद्रसिंग चव्हाण (१६) व तोरणा नज्जुराव चव्हाण (१४) या तिघींचा मृत्यू झाला, तर दिक्षा प्रदीप पवार, वैशाली बंडुसिंग पवार व आशिकला नगीनराम पवार या तिघी थोडक्यात बचावल्या. या सहा जणी नित्याप्रमाणे गावालगत असलेल्या गिट्टी खदानीत उत्खननामुळे तयार झालेल्या तलावात साचलेल्या पाण्यात कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. कपडे धुताना रोहिणीचा पाय घसरून ती पडली. तिला वाचविण्यासाठी तोरणा आणि अंजलीसह इतर तिघीही पाण्यात उतरल्या; मात्र त्यांनीही गटांगळ्या घेतल्या. यावेळी रस्त्याने जात असलेल्या राजू सदाशिव मेंढेकार रा. आगरगाव याची या मुलींवर नजर पडली. त्याला त्या गटांगळ्या खात असल्याचे दिसताच त्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. सहापैकी तिघींना वाचविण्यात त्याला यश आले; मात्र तिघींचा यात बळी गेला. गिट्टी खदानीत तयार होत असलेल्या या जीवघेण्या तलावांकरिता खदानीचे मालकच जबाबदार असल्याचे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले. गिट्टीचा उपसा झाल्यानंतर येथे तयार झालेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी मालकांची आहे; मात्र त्यांच्याकडून असे होत नाही. यामुळे असे मृत्यूचे सापळे एका देवळी तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यात निर्माण होत आहेत. वर्धेलगत बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), येळाकेळी येथील अशा तलावांत अनेकांचा बळी गेला आहे. याची शासन दरबारी नोंद असली तरी त्यांच्याकडून या खदान मालकांवर काहीच कार्यवाही होत नाही, याचेच नवल! मृत्यू झालेल्या तिघी येथे नित्यानेच येत होत्या. पावसाचे दिवस असल्याने या खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज चुकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. शिवाय तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी गावाला भेट देत प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठविल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)