शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टी खदानीतील खड्ड्यांनी घेतला तिघींचा बळी

By admin | Updated: July 25, 2016 01:50 IST

गिट्टी खदानीत उत्खननामुळे निर्माण झालेल्या खड्डेरूपी तलावातील पाणी नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

वर्धा : गिट्टी खदानीत उत्खननामुळे निर्माण झालेल्या खड्डेरूपी तलावातील पाणी नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. देवळी तालुक्यातील आगरगाव येथील तीन मुलींचा या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघड झाली. यावेळी एका गावकऱ्याच्या प्रयत्नाने त्यांच्यासोबत असलेल्या तिघी थोडक्यात बचावल्या. आगरगाव येथील सहा मुली या खदानीवर कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. यात खड्ड्यांतील पाण्यात पडून अंजली हिरणसिंग भोसले (१८), रोहिणी सुइंद्रसिंग चव्हाण (१६) व तोरणा नज्जुराव चव्हाण (१४) या तिघींचा मृत्यू झाला, तर दिक्षा प्रदीप पवार, वैशाली बंडुसिंग पवार व आशिकला नगीनराम पवार या तिघी थोडक्यात बचावल्या. या सहा जणी नित्याप्रमाणे गावालगत असलेल्या गिट्टी खदानीत उत्खननामुळे तयार झालेल्या तलावात साचलेल्या पाण्यात कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. कपडे धुताना रोहिणीचा पाय घसरून ती पडली. तिला वाचविण्यासाठी तोरणा आणि अंजलीसह इतर तिघीही पाण्यात उतरल्या; मात्र त्यांनीही गटांगळ्या घेतल्या. यावेळी रस्त्याने जात असलेल्या राजू सदाशिव मेंढेकार रा. आगरगाव याची या मुलींवर नजर पडली. त्याला त्या गटांगळ्या खात असल्याचे दिसताच त्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. सहापैकी तिघींना वाचविण्यात त्याला यश आले; मात्र तिघींचा यात बळी गेला. गिट्टी खदानीत तयार होत असलेल्या या जीवघेण्या तलावांकरिता खदानीचे मालकच जबाबदार असल्याचे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले. गिट्टीचा उपसा झाल्यानंतर येथे तयार झालेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी मालकांची आहे; मात्र त्यांच्याकडून असे होत नाही. यामुळे असे मृत्यूचे सापळे एका देवळी तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यात निर्माण होत आहेत. वर्धेलगत बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), येळाकेळी येथील अशा तलावांत अनेकांचा बळी गेला आहे. याची शासन दरबारी नोंद असली तरी त्यांच्याकडून या खदान मालकांवर काहीच कार्यवाही होत नाही, याचेच नवल! मृत्यू झालेल्या तिघी येथे नित्यानेच येत होत्या. पावसाचे दिवस असल्याने या खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज चुकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. शिवाय तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी गावाला भेट देत प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठविल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)