शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टी खदानी बनताहेत मृत्यूचे द्वार

By admin | Updated: September 6, 2015 02:01 IST

पक्की घरे व पक्क्या इमारती व सडका बनविण्याकरिता लागणारा दगड पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने विविध भागात गिट्टी खाणी निर्माण केल्या.

परवान्याचे नूतनीकरण नाही : पडलेल्या खड्ड्यांकडे खाण मालकांसह प्रशासनाचाही कानाडोळा रूपेश खैरी / प्रशांत हेलोंडे वर्धापक्की घरे व पक्क्या इमारती व सडका बनविण्याकरिता लागणारा दगड पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने विविध भागात गिट्टी खाणी निर्माण केल्या. महसूल विभागाच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या या खाणी भाडेतत्त्वार देण्यात आल्या. या खाणीतून आवश्यक दगड काढण्याकरिता उत्खनण सुरू आहे. या उत्खनणात तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचत असून तयार झालेली खाणीतील ही कृत्रिम तळे आता मृत्यूचे सापळे ठरत असल्याचे समोर आले आहे. या वर्षात बोरगाव (मेघे) येथील खदानीत तयार झालेल्या तळ्यात दोन युवकांचा मृत्यू झाला. या पूर्वीही येथे अशा अनेक घटना घडल्या आहेत. गिट्टी खदानीतील खोदकाम झाल्यानंतर येथे तयार झालेल्या तलावाचा वापर मत्स्य उत्पादनाकरिता करता येईल, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे. मात्र वर्धेत तयार झालेल्या गिट्टी खदानीत एकाही ठिकाणी असा तलाव असल्याची नोंद नाही. खोदकामामुळे तयार झालेले खड्डे खाण मालकाने महसुलच्या खणिकर्म विभागाशी संपर्क साधून शहरात साचलेला कचरा टाकून बुजविण्यासंदर्भात सन २०१३ मध्ये आदेश आले आहेत. याची माहिती खणिकर्म विभागाला आहे; मात्र ती माहिती खाण मालकांना नसून त्यांच्याकडून अशी कुठलीही मागणी या विभागात करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय परिसरात घडत असलेल्या घटनेची माहिती खाण मालकाने महसूल विभागाला देणे बंधणकारक असताना तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकूण ७९ खाणी आहेत. त्यातील बऱ्याच खाणींचे नुतणीकरण झाले नसतानाही त्यातून मोठ्या प्रमाणात उत्खणण सुरू आहे. एकूण खाणीपैकी ३३ खाणीच्या नुतनीकरणाचे पत्र आल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर १२ खाण मालकांकडून अद्याप कुठलेही अर्ज आले नाही. असे असतानाही त्यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. वर्धेतील बऱ्याच खदानी कागदावर एकाच्या नावावर आहे तर तिथे काम मात्र दुसराच करीत असल्याचे वास्तव आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. खाणीतून उत्खनण करण्याकरिता खाणीला परवाना आवश्यक आहे. असे असताना वर्धेत मात्र तब्बल ३३ खाणींचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यांच्याकडून केवळ अर्ज आल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाच्या नव्या आदेशाला तिलांजलीखाणीत तयार होत असलेल्या खड्ड्यात पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचत आहे. खड्डे मोठे असल्याने येथे मत्स्य उत्पादनाकरिता त्यांचा वापर करण्याचे शासनाच्या आदेशात नमूद आहे. मात्र जिल्ह्यातील ७९ खदानीपैकी एकाही खाणीत तसा तलाव नसल्याची नोंद शासन दरबारी आहे.उत्खननामुळे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचून तयार होणाऱ्या तलावात परिसरातील युवकांसह काही शाळकरी मुले पोहण्याकरिता जात असतात. यात त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता ही खड्डे बुजविण्याचा निर्णय शासनाच्यावतीने २०१३ मध्ये जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार एकाही खाण मालकाकडून तशर मागणी खनिकर्म विभागाकडून आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार गिट्टी खदानींचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार कार्यही सुरू आहे. चदान परिसरात घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती मालकाने महसूल विभागाला देणे गरजेचे आाहे. मात्र येथे तसे होत नाही. शिवाय तयार झालेल्या तलावात मत्स्य व्यवसाय करणे शक्य आहे. तसा निर्णयही आहे. मात्र वर्धेत तसे झाले नाही. पडत असलेले खड्डे बुजविण्यासंदर्भात २००३ मध्ये शासनाने नवा अद्यादेश काढला. यात शहरातील कचरा या खड्ड्यात टाकणे शक्य आहे. परंतु तशी कोणाकडून मागणीही करण्यात आली नाही. याची माहिती त्यांना आहे अथवा नाही याबात शंका आहे. -एस.के. बढे, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा