शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गिट्टी खदानी बनताहेत मृत्यूचे द्वार

By admin | Updated: September 6, 2015 02:01 IST

पक्की घरे व पक्क्या इमारती व सडका बनविण्याकरिता लागणारा दगड पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने विविध भागात गिट्टी खाणी निर्माण केल्या.

परवान्याचे नूतनीकरण नाही : पडलेल्या खड्ड्यांकडे खाण मालकांसह प्रशासनाचाही कानाडोळा रूपेश खैरी / प्रशांत हेलोंडे वर्धापक्की घरे व पक्क्या इमारती व सडका बनविण्याकरिता लागणारा दगड पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने विविध भागात गिट्टी खाणी निर्माण केल्या. महसूल विभागाच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या या खाणी भाडेतत्त्वार देण्यात आल्या. या खाणीतून आवश्यक दगड काढण्याकरिता उत्खनण सुरू आहे. या उत्खनणात तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचत असून तयार झालेली खाणीतील ही कृत्रिम तळे आता मृत्यूचे सापळे ठरत असल्याचे समोर आले आहे. या वर्षात बोरगाव (मेघे) येथील खदानीत तयार झालेल्या तळ्यात दोन युवकांचा मृत्यू झाला. या पूर्वीही येथे अशा अनेक घटना घडल्या आहेत. गिट्टी खदानीतील खोदकाम झाल्यानंतर येथे तयार झालेल्या तलावाचा वापर मत्स्य उत्पादनाकरिता करता येईल, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे. मात्र वर्धेत तयार झालेल्या गिट्टी खदानीत एकाही ठिकाणी असा तलाव असल्याची नोंद नाही. खोदकामामुळे तयार झालेले खड्डे खाण मालकाने महसुलच्या खणिकर्म विभागाशी संपर्क साधून शहरात साचलेला कचरा टाकून बुजविण्यासंदर्भात सन २०१३ मध्ये आदेश आले आहेत. याची माहिती खणिकर्म विभागाला आहे; मात्र ती माहिती खाण मालकांना नसून त्यांच्याकडून अशी कुठलीही मागणी या विभागात करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय परिसरात घडत असलेल्या घटनेची माहिती खाण मालकाने महसूल विभागाला देणे बंधणकारक असताना तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकूण ७९ खाणी आहेत. त्यातील बऱ्याच खाणींचे नुतणीकरण झाले नसतानाही त्यातून मोठ्या प्रमाणात उत्खणण सुरू आहे. एकूण खाणीपैकी ३३ खाणीच्या नुतनीकरणाचे पत्र आल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर १२ खाण मालकांकडून अद्याप कुठलेही अर्ज आले नाही. असे असतानाही त्यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. वर्धेतील बऱ्याच खदानी कागदावर एकाच्या नावावर आहे तर तिथे काम मात्र दुसराच करीत असल्याचे वास्तव आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. खाणीतून उत्खनण करण्याकरिता खाणीला परवाना आवश्यक आहे. असे असताना वर्धेत मात्र तब्बल ३३ खाणींचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यांच्याकडून केवळ अर्ज आल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाच्या नव्या आदेशाला तिलांजलीखाणीत तयार होत असलेल्या खड्ड्यात पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचत आहे. खड्डे मोठे असल्याने येथे मत्स्य उत्पादनाकरिता त्यांचा वापर करण्याचे शासनाच्या आदेशात नमूद आहे. मात्र जिल्ह्यातील ७९ खदानीपैकी एकाही खाणीत तसा तलाव नसल्याची नोंद शासन दरबारी आहे.उत्खननामुळे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचून तयार होणाऱ्या तलावात परिसरातील युवकांसह काही शाळकरी मुले पोहण्याकरिता जात असतात. यात त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता ही खड्डे बुजविण्याचा निर्णय शासनाच्यावतीने २०१३ मध्ये जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार एकाही खाण मालकाकडून तशर मागणी खनिकर्म विभागाकडून आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार गिट्टी खदानींचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार कार्यही सुरू आहे. चदान परिसरात घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती मालकाने महसूल विभागाला देणे गरजेचे आाहे. मात्र येथे तसे होत नाही. शिवाय तयार झालेल्या तलावात मत्स्य व्यवसाय करणे शक्य आहे. तसा निर्णयही आहे. मात्र वर्धेत तसे झाले नाही. पडत असलेले खड्डे बुजविण्यासंदर्भात २००३ मध्ये शासनाने नवा अद्यादेश काढला. यात शहरातील कचरा या खड्ड्यात टाकणे शक्य आहे. परंतु तशी कोणाकडून मागणीही करण्यात आली नाही. याची माहिती त्यांना आहे अथवा नाही याबात शंका आहे. -एस.के. बढे, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा