शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा आमचे प्रेरणास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:03 IST

बळीराजा आमचे पे्ररणास्थान आहे. बळीराजाचे राज्य समतेचे मूल्य जोपासणारे व सर्व लोकांना न्याय देणारे होते. आज बळीराजा म्हणजे शेतकरी व श्रमिक वर्ग या देशात पीडित आहे.

ठळक मुद्देनागेश चौधरी : किसान अधिकार अभियानचा बळीराजा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बळीराजा आमचे पे्ररणास्थान आहे. बळीराजाचे राज्य समतेचे मूल्य जोपासणारे व सर्व लोकांना न्याय देणारे होते. आज बळीराजा म्हणजे शेतकरी व श्रमिक वर्ग या देशात पीडित आहे. त्याला हे वर्तमान भाजप शासन खोटी आश्वासने देऊन लाडवत आहे. राजा म्हणून भिकाºयासारखे वागवित आहे. तीन पावलाची भूमिदान मागणारा आजचा वामन म्हणजे आजचे हे ‘अच्छे दिन’ देणारे नाटकी लोक! म्हणून आता फुल्यांचा दृष्टीकोण बाळगून शेतकºयांनी आसूड उगारायची गरज आहे, असे मत नागेश चौधरी यांनी व्यक्त केले.किसान अधिकार अभियानद्वारे बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाची भूमिका किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे यांनी मांडली. ते म्हणाले की, मागील १० वर्षांपासून आम्ही हा बळी महोत्सव घेऊन शेतकरी प्रश्नांवर चर्चा करीत आहोत. शेतकरी प्रश्नांवर काम व स्थानिक पातळीवर प्रशासनातील प्रश्न सोडवित आहोत. नरकासुर, बळीराजा यांना चुकीच्या इतिहासातील मांडणीमुळे बहुजन समाजातील बहुसंख्य लोक आपल्या इतिहासातील महापुरुषांना पायाखाली तुडवण्याचे काम बलीप्रतिपदेला करीत आहेत. ते समजून घेऊन आता ही चुकीची परंपरा भारतीयांनी सोडून द्यायला हवी, असे सांगितले.बळी महोत्सवातील दुसºया सत्रात शेती प्रश्नांवर खुली चर्चा करण्यात आली. ‘शेतकरी समस्या व त्यावरील उपाय’ या विषयावर झालेल्या चर्चेत किसान अधिकार अभियानचे प्रमुख कार्यकर्ते वारलुजी मिलमिले, जगदीश चरडे, सुरेश बोरकर, प्रकाश पाटील, नितीन झाडे, ज्ञानेश्वर ढगे, गोविंदा पेटकर, प्रा. सिद्धार्थ बुटले, उपासना यांनी विचार मांडले. समारोप प्रसंगी मुख्य पे्ररक काकडे यांनी शेती प्रश्नांची व उपायोजनांची विस्तृत मांडणी केली. बळी महोत्सवाची सुरुवात ज्योतीराव फुले लिखीत ‘बळी राजा संबंधित अखंडाने’ झाली. यानंतर क्रांतीगीत गायन झाले. जालंदरनाथ, प्रकाश कांबळे, सुनील ढाले, गजेंद्र सुरकार, भिमसेन गोटे, भारत कोकावार यांनी सहकार्य केले.दुसºया दिवशी २० आॅक्टोबरला सकाळी १० वाजता ‘बळी महोत्सव’ कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी किसान अधिकार अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार, गजेंद्र सुरकार, पद्मा तायडे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला भाऊराव काकडे, सुमंत मानकर, लक्ष्मण झाडे, संतोष चौधरी, जानराव लोणकर, प्रा. जनार्दन देवतळे, सचिन उगले, मारोती गावंडे आदींनी सहकार्य केले.लक्ष्मीपूजन दिनी आत्मक्लेश आंदोलनसेवाग्राम - सेवानिवृत्त कर्मचाºयांनी कुटुंबातील सदस्यांसह लक्ष्मीपूजनाचे दिवशी आत्मक्लेश आंदोलन केले. सेवाग्राम आश्रमासमोर सर्व जिल्हा भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाºयांचा न्याय्य हक्काच्या मागणीसाठी बेमुदत सत्याग्रह सुरु आहे. १८ आॅक्टोबर रोजी जिल्हा निंबधक अजय कडू आणि १९ आॅक्टोबर रोजी आ.डॉ.पंकज भोयर, नागपूर आप पक्षाचे जगदीश सिंग, नितीन झाडे, अमित बडवाईक, अशोक मेश्राम, देवेंद्र वानखेडे आणि चंद्रपूरचे प्रमोद भोयर आदींनी भेट देऊन चर्चा केली. हा प्रश्न लावून धरण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.