शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

बेशरमच्या झुडपांमुळे भदाडी नदी पात्र झाले डबके

By admin | Updated: May 8, 2017 00:42 IST

नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या नद्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता त्यांचे पात्र जपणे गरजेचे आहे

गावाला पुराचा धोका : उथळ पात्रामुळे लगतच्या शेतात पाणी शिरण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी) : नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या नद्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता त्यांचे पात्र जपणे गरजेचे आहे; पण बहुतांश नद्यांच्या पात्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नद्याच धोक्यात आल्याचे चित्र आहे. गावालगत वाहणारी भदाडी नदीही झाडा-झुडपांच्या विळख्यामुळे धोक्यात आली असून नदी स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे झाले आहे. गावाला लागून वाहणाऱ्या भदाडी नदीमध्ये सध्या सर्वत्र बेशरमची झाडे वाढल्यावचे दिसून येते. उन्हाळा असल्याने नदी पात्र कोरडे पडले आहे. काही प्रमाणात पाणी असले तरी अनेक ठिकाणी डबके साचले आहे. त्यावर शेवाळ तयार झाल्याने पाणी प्रदूषित होत असल्याचे पाहावयास मिळते. नदी पात्र बेशरमच्या झुडपांनी पूर्णत: बुजलेले आहे. अनेक ठिकाणी उंचवटे तयार झाल्याने पात्र उथळ झाल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे भविष्यात धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नदी पात्रात बेशरम वाढल्याने तथा पात्र उथळ झाल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरायला वेळ लागणार नाही. शिवाय शेतपिकांनाही मोठा धोका निर्माण होणार आहे. यामुळे नदी साफ करणे गरजेचे आहे. शिवाय जलयुक्त शिवार अभिभयानांतर्गत नदी पात्राचे रूंदीकरण, खोलीकरण आणि सरळीकरण करणे गरजेचे झाले आहे. नदी पात्राच्या रूंदीकरण व खोलीकरणाची गरज जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मृत जलस्त्रोत जिवंत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. देवळी तालुक्यातील यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पही यात समावेशित करण्यात आला आहे; पण लहान-मोठ्या नद्यांचा फारसा विचार केला जात नसल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, अनेक नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भदाडी नदीचे पात्र बेशरमची झुडपे आणि मातीमुळे उथळ झाले आहे. अनेक ठिकाणी डबके साचले आहे. यामुळे गावाला व शेतपिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत भदाडी नदीचेही पुनरूज्जीवन करणे गरजेचे झाले आहे. यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करावे, अशी मागणी चिकणी, जामणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत.