शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

बेशरमच्या झुडपांमुळे भदाडी नदी पात्र झाले डबके

By admin | Updated: May 8, 2017 00:42 IST

नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या नद्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता त्यांचे पात्र जपणे गरजेचे आहे

गावाला पुराचा धोका : उथळ पात्रामुळे लगतच्या शेतात पाणी शिरण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी) : नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या नद्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता त्यांचे पात्र जपणे गरजेचे आहे; पण बहुतांश नद्यांच्या पात्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नद्याच धोक्यात आल्याचे चित्र आहे. गावालगत वाहणारी भदाडी नदीही झाडा-झुडपांच्या विळख्यामुळे धोक्यात आली असून नदी स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे झाले आहे. गावाला लागून वाहणाऱ्या भदाडी नदीमध्ये सध्या सर्वत्र बेशरमची झाडे वाढल्यावचे दिसून येते. उन्हाळा असल्याने नदी पात्र कोरडे पडले आहे. काही प्रमाणात पाणी असले तरी अनेक ठिकाणी डबके साचले आहे. त्यावर शेवाळ तयार झाल्याने पाणी प्रदूषित होत असल्याचे पाहावयास मिळते. नदी पात्र बेशरमच्या झुडपांनी पूर्णत: बुजलेले आहे. अनेक ठिकाणी उंचवटे तयार झाल्याने पात्र उथळ झाल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे भविष्यात धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नदी पात्रात बेशरम वाढल्याने तथा पात्र उथळ झाल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरायला वेळ लागणार नाही. शिवाय शेतपिकांनाही मोठा धोका निर्माण होणार आहे. यामुळे नदी साफ करणे गरजेचे आहे. शिवाय जलयुक्त शिवार अभिभयानांतर्गत नदी पात्राचे रूंदीकरण, खोलीकरण आणि सरळीकरण करणे गरजेचे झाले आहे. नदी पात्राच्या रूंदीकरण व खोलीकरणाची गरज जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मृत जलस्त्रोत जिवंत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. देवळी तालुक्यातील यशोदा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पही यात समावेशित करण्यात आला आहे; पण लहान-मोठ्या नद्यांचा फारसा विचार केला जात नसल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, अनेक नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भदाडी नदीचे पात्र बेशरमची झुडपे आणि मातीमुळे उथळ झाले आहे. अनेक ठिकाणी डबके साचले आहे. यामुळे गावाला व शेतपिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत भदाडी नदीचेही पुनरूज्जीवन करणे गरजेचे झाले आहे. यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करावे, अशी मागणी चिकणी, जामणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत.