शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमुळे शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:23 IST

सदर बंधारा हा वीस वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा पासून या शेतकऱ्याचे वडील निव्वळ अज्ञानामुळे नुकसान सहन करीत होते. मुलाने शेती हाती घेतल्यानंतर सात-बारा वर असलेले क्षेत्र उपलब्ध क्षेत्रामध्ये खुप मोठी तफावर दिसून आली.

ठळक मुद्देनुकसानीचे सत्र २० वर्षांपासून सुरूच : अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : एम. आय. डी. सी. ला पाणीपुरवठा करण्यासाठी धाम नदीवर पवनारला बंधारा बांधलेला आहे. या बंधाऱ्याचे बॅक वाटरमुळे निंबाळकर या शेतकºयाच्या दोन एकर क्षेत्राला तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतात पाणीच पाणी असल्याने उभ्या पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.सदर बंधारा हा वीस वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा पासून या शेतकऱ्याचे वडील निव्वळ अज्ञानामुळे नुकसान सहन करीत होते. मुलाने शेती हाती घेतल्यानंतर सात-बारा वर असलेले क्षेत्र उपलब्ध क्षेत्रामध्ये खुप मोठी तफावर दिसून आली. तेव्हा मोजणी केली असता जवळपास ३ एकर क्षेत्र कुठलाही मोबदला न देता आधीच घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या संदर्भात त्यांनी उपअभियंता म.औ.वि.म प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.म, नागपूर यांचेकडे वारंवार तक्रार दाखल केली. परंतु, विभागाने कुठलाही सर्व्हे केला नाही. शिवाय तक्रारीची साधी दखल घेतली नाही. त्या सोबतच उरलेल्या दोन एकर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक वॉटरने नुकसान होत आहे. बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच न उघडल्या जात असल्याने शेतकºयाचे नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीला विभागीय कार्यालयाकडे पाठविले आहे. सदर प्रश्न हा भूमिअभिलेखकडे येतो. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विभागीय कार्यालयामार्फत चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी मात्र सांगता येणार नाही.- गोपाल सोनसरे, विभागीय व्यवस्थापक, एमआयडीसी, नागपूर.आमची ही वडिलापार्जीत शेती आहे. वडिलांच्या काळापासून येथे नेहमीच नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. नुकसान टळावे या उद्देशाने संबंधितांना तक्रार करण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून उडवा-उडवीचे उत्तरे देऊन अडचणीत भर टाकली जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु, जिल्हाधिकारी योग्य न्याय करतील असा मला विश्वास आहे. कारण ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.- सुनील निंबाळकर, शेतकरी.

टॅग्स :agricultureशेती