शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात नोकरभरतीवर बंदी

By admin | Updated: October 11, 2014 23:12 IST

महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीची लगबग सुरू असतानाच १९ सप्टेंबरला लोकसेवा आयोगाच्या सनदी अधिकाऱ्यांनी एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना,

वर्धा : महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीची लगबग सुरू असतानाच १९ सप्टेंबरला लोकसेवा आयोगाच्या सनदी अधिकाऱ्यांनी एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, त्यांनी मागासवर्गीय सवलतीचा लाभ घेतल्यास त्यांना लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या कोणत्याही शासनाच्या खुल्या प्रवर्गातील पदांवर नियुक्ती दिली जाणार नाही, असा घटनाबाह्य आदेश काढला आहे. आचारसंहितेच्या काळात काढलेला हा आदेश भारतीय राज्यघटनेला पूरक नसून तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी केली आहे.या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांच्यामार्फत राज्यपालांना देण्यात आले. त्यात भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२० प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला महाराष्ट्र शासनातील अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या भरतीचे अधिकार आहेत. परंतु त्या भरतीचे नियम ठरविण्याचे अधिकार नाहीत. राज्याचा लोकसेवा आयोग राज्य शासनाला विविध सेवांमध्ये अधिकारी व कर्मचारी भरती करण्याचा घटनात्मक व कायदेशीर अधिकार आयोगाला नाही. केंद्र शासनाचा कार्मिक व प्रशिक्षण विभाग सेवाविषयक नियम आणि प्रक्रिया ठरवत असते. तसेच विविध शासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीचे निर्देश देते. त्यांच्या निर्देशाच्या आधीन राहूनच राज्य लोकसेवा आयोगाला आपले काम करावे लागते. डीओपीटीने गुणवत्ताप्राप्त एससी, एसटी, ओबीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून शासनाच्या अधिकारी, कर्मचारी भरतीमधून नाकारण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अशी घोषणा किंवा आदेश काढण्याचा अधिकारच नाही. विधिमंडळाच्या अधिकारात हा हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे तो विधिमंडळाचा हक्कभंगसुद्धा ठरतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १९ सप्टेंबरला आदेश काढून एससी, एसटी, ओबीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात भरतीसाठी बंदी घातली आहे. हा आदेश सर्व मागासवर्गीयांवर अन्याय करणारा असल्याचे महात्मा फुले समता परिषदेने म्हटले आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी याच आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालेले सुधीर ठाकरे यांनी स्पष्टीकरनही दिले आहे. संबंधित सनदी अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डाहाके, सुधिर पांगुळ, अनिरूद्ध गवई, किशोर तितरे यांनी निवेदनाद्वारे केली.(शहर प्रतिनिधी)