शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात नोकरभरतीवर बंदी

By admin | Updated: October 11, 2014 23:12 IST

महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीची लगबग सुरू असतानाच १९ सप्टेंबरला लोकसेवा आयोगाच्या सनदी अधिकाऱ्यांनी एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना,

वर्धा : महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीची लगबग सुरू असतानाच १९ सप्टेंबरला लोकसेवा आयोगाच्या सनदी अधिकाऱ्यांनी एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, त्यांनी मागासवर्गीय सवलतीचा लाभ घेतल्यास त्यांना लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या कोणत्याही शासनाच्या खुल्या प्रवर्गातील पदांवर नियुक्ती दिली जाणार नाही, असा घटनाबाह्य आदेश काढला आहे. आचारसंहितेच्या काळात काढलेला हा आदेश भारतीय राज्यघटनेला पूरक नसून तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी केली आहे.या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांच्यामार्फत राज्यपालांना देण्यात आले. त्यात भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२० प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला महाराष्ट्र शासनातील अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या भरतीचे अधिकार आहेत. परंतु त्या भरतीचे नियम ठरविण्याचे अधिकार नाहीत. राज्याचा लोकसेवा आयोग राज्य शासनाला विविध सेवांमध्ये अधिकारी व कर्मचारी भरती करण्याचा घटनात्मक व कायदेशीर अधिकार आयोगाला नाही. केंद्र शासनाचा कार्मिक व प्रशिक्षण विभाग सेवाविषयक नियम आणि प्रक्रिया ठरवत असते. तसेच विविध शासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीचे निर्देश देते. त्यांच्या निर्देशाच्या आधीन राहूनच राज्य लोकसेवा आयोगाला आपले काम करावे लागते. डीओपीटीने गुणवत्ताप्राप्त एससी, एसटी, ओबीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून शासनाच्या अधिकारी, कर्मचारी भरतीमधून नाकारण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अशी घोषणा किंवा आदेश काढण्याचा अधिकारच नाही. विधिमंडळाच्या अधिकारात हा हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे तो विधिमंडळाचा हक्कभंगसुद्धा ठरतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १९ सप्टेंबरला आदेश काढून एससी, एसटी, ओबीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात भरतीसाठी बंदी घातली आहे. हा आदेश सर्व मागासवर्गीयांवर अन्याय करणारा असल्याचे महात्मा फुले समता परिषदेने म्हटले आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी याच आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालेले सुधीर ठाकरे यांनी स्पष्टीकरनही दिले आहे. संबंधित सनदी अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डाहाके, सुधिर पांगुळ, अनिरूद्ध गवई, किशोर तितरे यांनी निवेदनाद्वारे केली.(शहर प्रतिनिधी)