शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विविध माध्यमातून मतदारांत जागृती

By admin | Updated: February 3, 2017 01:57 IST

येथील तहसील कार्यालय आणि यशवंत महाविद्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे मतदार जागृती कार्यशाळा घेण्यात आली.

वर्धमनेरी येथे पोलिसांचा रोडमार्च : मतदारांना सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहनसेलू : येथील तहसील कार्यालय आणि यशवंत महाविद्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे मतदार जागृती कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. सतीश रघुवंशी, उद्घाटक म्हणून तहसिलदार रविंद्र होळी तर प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप काळे उपस्थित होते. मंचावर मुख्याध्यापक रंजना दाते, उपप्राचार्य प्रा. जी.डी. देशमुख, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. वसंत राठोड, प्रा. अनंत रिंंढे, डॉ. अर्चना फाळके यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना रविंद्र होळी म्हणाले, भारतीय लोकशाही व्यवस्थेत मतदान हा नागरिकांना मिळालेला एक अमुल्य अधिकार आहे. प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान करणे आवश्यक आहे. त्याशिवाय लोकशाही व्यवस्था जिवंत असल्याची जाणीव प्रत्येकास होणार नाही. तर डॉ. संदीप काळे यांनी ‘मतदानाचा अधिकार: एक मानवी हक्क’ या विषयावर व्याख्यान सादर केले. जागतिक पटलावर भारत असा एकमेव देश आहे की, प्रौढ मताधिकाराचे तत्व स्वीकारुन एवढ्या विशाल लोकसंख्येतील स्त्री-पुरुषांना एकाचवेळी मतदानाचा अधिकार प्रदान केला. मानवी हक्काच्या जागतिक जाहिरनाम्यातील कलम-१९ नुसार मतदानाचा अधिकार प्रत्येकाचा एक मानवी हक्क असून लोकशाही व्यवस्थेतील व्यक्तीच्या राजकीय सहभागाचे प्रमुख तत्व आहे. प्रगल्भ लोकशाहीच्या स्थापनेसाठी प्रत्येकाने कोणत्या दबावाखाली न येता निर्भिडपणे आणि स्वत:च्या बुद्धीप्रामान्यदृष्टिने मतदान करण्याची गरज व्यक्त केली.(तालुका प्रतिनिधी)