शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पुरस्कारप्राप्ती यशाचे गमक नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:03 IST

आजपर्यंतच्या सेवाकाळात सपत्नीक सत्कार हा प्रथमच होत असल्याने वर्धेकरांच्या भरभरून प्रेमाचीच ही पावती आहे. हा सत्कार आम्ही दोघेही कधी विसरणार नाही असे उद्गार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले.

ठळक मुद्देशैलेश नवाल : सावरकर सेवा समितीतर्फे सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजपर्यंतच्या सेवाकाळात सपत्नीक सत्कार हा प्रथमच होत असल्याने वर्धेकरांच्या भरभरून प्रेमाचीच ही पावती आहे. हा सत्कार आम्ही दोघेही कधी विसरणार नाही असे उद्गार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले.सावरकर सामाजिक सेवा समिती आणि सावरकर स्मारक नागरी समिती च्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची महाराष्ट्र शासनकडून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी स्मारक नागरी समितीचे अध्यक्ष हरीभाऊ वझुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, नवाल, सावरकर सेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर उपस्थित होते.याप्रसंगी सक्षम संस्थेचे नरेंद्र नरोटे, भोजराज पाटील तसेच सावरकर भक्त मंडळाचे संजय ठाकरे, अजय गांडोळे, रवी सातदेवे यांनीही जिल्हाधिकारी यांचा सत्कार केला. याप्रसंगी संक्रांतीच्या पावन पर्वावर शैलेश नवाल यांच्या पत्नीचा ज्योती देशपांडे, माधवी व्यास आणि डॉ. स्मिता तराळे यांनी साडी, सौभाग्य साधने आणि ओटी भरुन सत्कार केला. सत्काराला उत्तर देतांना त्या म्हणाल्या समाजातील चांगल्या परंपरा ज्या संस्कार करणाऱ्या असतात त्याची जोपासना झालीच पाहिजे. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले नगरातील थोर महात्म्याचे पुतळे आणि स्मारक ही नागरिकांना राष्ट्र आणि समाजसेवेची प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त असतात. वर्तमान समाजात मुल्य घसरत चालली आहे. यशस्वी होण्याच्या परिभाषेत परिवर्तन झाले आहे. पुरस्कार प्राप्ती हे यशाचे गमक नव्हे.याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे म्हणाले सावरकरांचे स्मारक हे माझे आहे. यात माझेही योगदान आहे. ही भावना जनमानसात रुजण्यासाठी प्रत्येकाने यशाशक्ती सहकार्य भावना ठेवावी. यथाशक्ती नगर परिषद सहकार्य करेलच पण हे स्मारक जनसामान्याच्या भावनाचे प्रतीक व्हावे ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल.स्मारक नागरी समितीचे अध्यक्ष हरीभाऊ वझुरकर म्हणाले स्मारकासाठी पुतळ्याचा भार मी उचलला असला तरी स्मारक निर्मितीनंतर त्याची देखभाल आणि सौंदर्यीकरण कायम राखण्यासाठी नागरिकांनी स्वयंपे्ररणेने पुढे आले पाहिजे. कार्यक्रमात सेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर यांनी समितीच्या विविध उपक्रमाचे ध्येय पुर्तीचा उद्देश सांगून गत पाच वर्षापासून शहरात साजरी होत असलेली सावरकर जयंतीचाच परिणाम आज सावरकर स्मारक निर्मितीच्या वाटचालीत होत आहे. असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम देशपांडे यांनी केले तर आभार मदन परसोडकर यांनी मानले. कार्यक्रमाला माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. प्रसाद देशमुख, रामदास ढोणे, अटल पांडे, अविनाश देव, सरपंच अजय गांडोळे, सुवर्णा काळे, अशोक कठाणे, गौरी टिबडीवाल, श्रेया देशमुख, निलेश किटे, वंदना भुते, जयंत सालोडकर उपस्थित होते.