शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

पुरस्कारप्राप्ती यशाचे गमक नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:03 IST

आजपर्यंतच्या सेवाकाळात सपत्नीक सत्कार हा प्रथमच होत असल्याने वर्धेकरांच्या भरभरून प्रेमाचीच ही पावती आहे. हा सत्कार आम्ही दोघेही कधी विसरणार नाही असे उद्गार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले.

ठळक मुद्देशैलेश नवाल : सावरकर सेवा समितीतर्फे सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजपर्यंतच्या सेवाकाळात सपत्नीक सत्कार हा प्रथमच होत असल्याने वर्धेकरांच्या भरभरून प्रेमाचीच ही पावती आहे. हा सत्कार आम्ही दोघेही कधी विसरणार नाही असे उद्गार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले.सावरकर सामाजिक सेवा समिती आणि सावरकर स्मारक नागरी समिती च्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची महाराष्ट्र शासनकडून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी स्मारक नागरी समितीचे अध्यक्ष हरीभाऊ वझुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, नवाल, सावरकर सेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर उपस्थित होते.याप्रसंगी सक्षम संस्थेचे नरेंद्र नरोटे, भोजराज पाटील तसेच सावरकर भक्त मंडळाचे संजय ठाकरे, अजय गांडोळे, रवी सातदेवे यांनीही जिल्हाधिकारी यांचा सत्कार केला. याप्रसंगी संक्रांतीच्या पावन पर्वावर शैलेश नवाल यांच्या पत्नीचा ज्योती देशपांडे, माधवी व्यास आणि डॉ. स्मिता तराळे यांनी साडी, सौभाग्य साधने आणि ओटी भरुन सत्कार केला. सत्काराला उत्तर देतांना त्या म्हणाल्या समाजातील चांगल्या परंपरा ज्या संस्कार करणाऱ्या असतात त्याची जोपासना झालीच पाहिजे. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले नगरातील थोर महात्म्याचे पुतळे आणि स्मारक ही नागरिकांना राष्ट्र आणि समाजसेवेची प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त असतात. वर्तमान समाजात मुल्य घसरत चालली आहे. यशस्वी होण्याच्या परिभाषेत परिवर्तन झाले आहे. पुरस्कार प्राप्ती हे यशाचे गमक नव्हे.याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे म्हणाले सावरकरांचे स्मारक हे माझे आहे. यात माझेही योगदान आहे. ही भावना जनमानसात रुजण्यासाठी प्रत्येकाने यशाशक्ती सहकार्य भावना ठेवावी. यथाशक्ती नगर परिषद सहकार्य करेलच पण हे स्मारक जनसामान्याच्या भावनाचे प्रतीक व्हावे ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल.स्मारक नागरी समितीचे अध्यक्ष हरीभाऊ वझुरकर म्हणाले स्मारकासाठी पुतळ्याचा भार मी उचलला असला तरी स्मारक निर्मितीनंतर त्याची देखभाल आणि सौंदर्यीकरण कायम राखण्यासाठी नागरिकांनी स्वयंपे्ररणेने पुढे आले पाहिजे. कार्यक्रमात सेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर यांनी समितीच्या विविध उपक्रमाचे ध्येय पुर्तीचा उद्देश सांगून गत पाच वर्षापासून शहरात साजरी होत असलेली सावरकर जयंतीचाच परिणाम आज सावरकर स्मारक निर्मितीच्या वाटचालीत होत आहे. असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम देशपांडे यांनी केले तर आभार मदन परसोडकर यांनी मानले. कार्यक्रमाला माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. प्रसाद देशमुख, रामदास ढोणे, अटल पांडे, अविनाश देव, सरपंच अजय गांडोळे, सुवर्णा काळे, अशोक कठाणे, गौरी टिबडीवाल, श्रेया देशमुख, निलेश किटे, वंदना भुते, जयंत सालोडकर उपस्थित होते.