शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

देवळीत जलजागृती रॅलीतून प्रबोधन

By admin | Updated: March 18, 2016 02:21 IST

विद्यार्थ्यांची प्रबोधन रॅली काढण्यात आली. निम्न वर्धा कालवे विभागाच्यावतीने आयोजित रॅलीत जनता हायस्कूल, न.प. माध्यमिक शाळा,...

निम्न वर्धा कालवे विभागाचे आयोजन : साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा सहभागदेवळी : विद्यार्थ्यांची प्रबोधन रॅली काढण्यात आली. निम्न वर्धा कालवे विभागाच्यावतीने आयोजित रॅलीत जनता हायस्कूल, न.प. माध्यमिक शाळा, यशवंत कन्या माध्यमिक शाळा, राजीव गांधी माध्यमिक शाळा, गुरुकुल विद्या निकेतन आदी शाळांतील साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष शोभा तडस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने फिरून रॅलीने प्रबोधन केले. पाणी वाचवा, जीवन वाचवा, बचत पाण्याची गरज काळाची आदी घोषणा देवून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.रॅलीचा समारोप श्यामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस व अतिथी म्हणून नगराध्यक्ष शोभा तडस, निम्न वर्धाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवा, उपविभागीय अधिकारी अशोक पावडे, सहाय्यक अभियंता गजानन घुगल, आर.आर. बोडेकर, अमोल चंदावार व सु.मो. इंगळे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी पाणी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक निम्न वर्धाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवार यांनी केले. यशस्वीतेसाठी शाखा अभियंता प्रमोद पावडे, ज्ञानेश्वर सोळुंके, विश्वेश्वर कडू, सुनील रोहणकर, प्रशांत बन्सोड यांंच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक तसेच निम्न वर्धा कालवे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)निकड लक्षात घेता अनेक योजना कार्यान्वित - तडसभविष्यात पाण्याची निकड लक्षात घेता शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. सन १९८० पासून रखडलेला लोअर वर्धा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहे. विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने या प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत केला आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेला पूनर्जिवीत करून शिवारातील तलावांचे खोलीकरण करण्यात येत आहे. यासाठी ३८ हजार कोटीच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रा.पं. ला ८० लाखाचा निधी देऊन गावातील नळयोजना कार्यान्वित करण्यात येत आहे. मनरेगा तसेच जलयुक्त शिवार योजनाचे माध्यमातून शेतातील विहिरींचे बांधकाम तसेच इतर कामे हाती घेण्यात आली आहे. या सर्व योजना गावापर्यंत नेवून नागरिकांना दिलासा दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.