शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी शाळा-मैदानात RSS वर बंदी घाला! खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस म्हणाले, "अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
4
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
5
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
6
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
7
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
8
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
9
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
10
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
11
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
12
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
13
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
14
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
15
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
16
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
17
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
18
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
19
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
20
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

देवळीत जलजागृती रॅलीतून प्रबोधन

By admin | Updated: March 18, 2016 02:21 IST

विद्यार्थ्यांची प्रबोधन रॅली काढण्यात आली. निम्न वर्धा कालवे विभागाच्यावतीने आयोजित रॅलीत जनता हायस्कूल, न.प. माध्यमिक शाळा,...

निम्न वर्धा कालवे विभागाचे आयोजन : साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा सहभागदेवळी : विद्यार्थ्यांची प्रबोधन रॅली काढण्यात आली. निम्न वर्धा कालवे विभागाच्यावतीने आयोजित रॅलीत जनता हायस्कूल, न.प. माध्यमिक शाळा, यशवंत कन्या माध्यमिक शाळा, राजीव गांधी माध्यमिक शाळा, गुरुकुल विद्या निकेतन आदी शाळांतील साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष शोभा तडस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने फिरून रॅलीने प्रबोधन केले. पाणी वाचवा, जीवन वाचवा, बचत पाण्याची गरज काळाची आदी घोषणा देवून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.रॅलीचा समारोप श्यामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस व अतिथी म्हणून नगराध्यक्ष शोभा तडस, निम्न वर्धाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवा, उपविभागीय अधिकारी अशोक पावडे, सहाय्यक अभियंता गजानन घुगल, आर.आर. बोडेकर, अमोल चंदावार व सु.मो. इंगळे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी पाणी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक निम्न वर्धाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवार यांनी केले. यशस्वीतेसाठी शाखा अभियंता प्रमोद पावडे, ज्ञानेश्वर सोळुंके, विश्वेश्वर कडू, सुनील रोहणकर, प्रशांत बन्सोड यांंच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक तसेच निम्न वर्धा कालवे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)निकड लक्षात घेता अनेक योजना कार्यान्वित - तडसभविष्यात पाण्याची निकड लक्षात घेता शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. सन १९८० पासून रखडलेला लोअर वर्धा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहे. विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने या प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत केला आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेला पूनर्जिवीत करून शिवारातील तलावांचे खोलीकरण करण्यात येत आहे. यासाठी ३८ हजार कोटीच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रा.पं. ला ८० लाखाचा निधी देऊन गावातील नळयोजना कार्यान्वित करण्यात येत आहे. मनरेगा तसेच जलयुक्त शिवार योजनाचे माध्यमातून शेतातील विहिरींचे बांधकाम तसेच इतर कामे हाती घेण्यात आली आहे. या सर्व योजना गावापर्यंत नेवून नागरिकांना दिलासा दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.