शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
2
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
3
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
4
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
5
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
6
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
7
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
8
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
9
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
10
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
12
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
13
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
14
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
15
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
16
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
17
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
18
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
19
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
20
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!

वारसान हक्क चढविण्यासाठी टाळाटाळ

By admin | Updated: June 7, 2015 02:23 IST

नजीकच्या मदनी येथील वॉर्ड क्रमांक चारमधील घरावर आजीच्या मृत्यूनंतर वारसान हक्क चढविणे गरजेचे होते.

कुटुंबीय त्रस्त : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनवर्धा : नजीकच्या मदनी येथील वॉर्ड क्रमांक चारमधील घरावर आजीच्या मृत्यूनंतर वारसान हक्क चढविणे गरजेचे होते. यासाठी अर्ज करण्यात आला. मृत्यूपत्रासह संपूर्ण कागदपत्रे दिली; पण नऊ महिन्यांपासून कारवाईच झाली नाही. यामुळे वानखेडे कुटुंब त्रस्त झाले आहे.मदनी येथील विठाबाई लक्ष्मण वानखेडे यांचा १८ सप्टेंबर २०१४ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या नावावर मौजा मदनी वॉर्ड क्र. चारमध्ये मिळकत क्र. ३५ हे घर होते. विटा-मातीचे कच्चे बांधकाम असलेल्या या घरामध्ये चार सदस्यांचा वारसा हक्क आहे. यामुळे सदर घराच्या कागदपत्रांमध्ये वारसान हक्क चढविण्यासाठी रंजीत विलास वानखेडे यांनी आमगाव ग्रा.पं. प्रशासनाकडे २४ सप्टेंबर २०१४ रोजी अर्ज केला. संपूर्ण कागदपत्रेही सादर करण्यात आली; पण अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत ग्रामपंचायत सचिवांना अनेकदा निवेदने सादर केली; पण वारसान हक्क चढविण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यामुळे रंजी वानखेडे यांनी २५ मे रोजी सेलू पं.स. चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शिवाय ४ जून रोजी स्मरणपत्र दिले; पण अद्याप कारवाई करण्यात आली नाही. यामुळे वानखेडे कुटुंबीय त्रस्त आहे. वरिष्ठांनी लक्ष देत न्याय द्यावा, अशी मागणी वानखेडे यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)