शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन खटला जिंकूनही कामावर रूजू करण्यास टाळाटाळ

By admin | Updated: February 7, 2017 01:10 IST

कामावर रूजू करून घेण्याबाबत न्यायालयातील खटला जिंकूनही बोरगाव (मेघे) येथील रहिवासी असलेल्या विनायक थूल यांना कामावर रूजू करून घेण्यात आले नाही.

अडीच दशकांपासून तगमग : भारतीय खाद्य निगमच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्षवर्धा : कामावर रूजू करून घेण्याबाबत न्यायालयातील खटला जिंकूनही बोरगाव (मेघे) येथील रहिवासी असलेल्या विनायक थूल यांना कामावर रूजू करून घेण्यात आले नाही. यातून स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा अवमानच केला आहे. शिवाय रूजू करून न घेतल्याने थूल कुटुंबियांची उपासमार होत आहे. गत २६ वर्षांपासून रूजू करून घेण्यासाठी त्यांचा लढा सुरू असून संघटनाही समस्या समजून घेण्यास तयार नसल्याने ते त्रस्त आहेत.बोरगाव (मेघे) येथील विनायक थूल हे वर्कर्स युनियनच्या माध्यमातून भारतीय खाद्य निगमच्या सेवेत १९८७ ते १९९० या कालावधीत कार्यरत होते. १९९० मध्ये माथाडी युनियन व वर्कर्स युनियनने संप केला होता. हा संप सुमारे तीन महिने सुरू होता. संपाच्या काळात माथाडी कामगाराचा मृत्यू झाल्याने काही कामगारांना तुरूंगात डांबण्यात आले होते. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. तीन वर्षानंतर माथाडी कामगार तसेच युनियनच्यावतीने कामगार न्यायालयात कामगारांना कामावर घेण्याकरिता खटला दाखल केला होता. कामगार न्यायालयात युनियनच्या बाजूने निकाल लागला. दरम्यान, संघटनेच्या तत्कालीन अध्यक्षांनी जवळच्या कामगारांना कामावर रूजू करून घेतले. मला रूजू करून घेण्यात आले नाही, असा आरोप थूल यांनी केला आहे. कामावर पूर्ववत रूजू करून घेण्याकरिता वारंवार कार्यालयाच्या चकरा मारल्या; पण कुणीही लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सध्या हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. थूल कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट आले आहे. वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी या समस्येची दखल घेत त्यांना कामावर रूजू करून घ्यावे, अशी मागणी विनायक थूल व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)