शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अतिवृष्टीमुळे दोन दिवस पेरणी टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:04 IST

जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने या दोन दिवशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देकृषीतज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने या दोन दिवशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.मंगळवार २ आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी पुढेही दमदार पाऊस येईल, अशी अपेक्षा बाळगुण पेरणीच्या कामाला गती देत आहेत. यंदाच्या वर्षी १ जुलै सकाळपर्यंत वर्धा तालुक्यात ७१.०३ मिमी, सेलू १५८.४२ मिमी, देवळी ९५.६८ मिमी, हिंगणघाट १०७.१२, समुद्रपूर ११६.७१ मिमी, आर्वी ८७.५४, आष्टी ९६.०४ व कारंजा तालुक्यात ११८.१७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात संपूर्ण जून महिन्यात सरासरी ३२१.६३ पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ सरासरी १०६.३४ पाऊस पडला आहे. असे असले तरी झालेल्या अल्प पावसामुळे संध्या शेतजमिनीत ओलावा असल्याने पेरणीची कामे शेतकरी करू शकतो; पण जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनीही या दोन दिवसांमध्ये पेरणी करण्याचे टाळावे, असे सांगण्यात येते.४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर होणार विविध पिकांची लागवडयंदाच्या खरीब हंगामात एकूण ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप ज्वारी १ हजार १०० हेक्टर, ६५ हजार हेक्टरवर तूर, ४०० हेक्टरवर मुंग, ७०० हेक्टरवर उडीद, ६७५ हेक्टरवर खरीप भुईमुंग, १ लाख २५ हजार ९२५ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर कापूस पिकाची लागवड होणार असल्याचाही अंदाज कृषी विभागाला आहे.आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जमिनीत बºयापैकी ओलावा आहे. शिवाय पेरणी करण्यासाठी जमिनीतील हा ओलावा फायदेदायक ठरणारा आहे. परंतु, हवामानखात्याने मंगळवार व बुधवारी वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकºयांनीही सदर दोन दिवस पेरणी करण्याचे टाळले पाहिजे.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.