शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

अतिवृष्टीमुळे दोन दिवस पेरणी टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:04 IST

जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने या दोन दिवशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देकृषीतज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने या दोन दिवशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.मंगळवार २ आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी पुढेही दमदार पाऊस येईल, अशी अपेक्षा बाळगुण पेरणीच्या कामाला गती देत आहेत. यंदाच्या वर्षी १ जुलै सकाळपर्यंत वर्धा तालुक्यात ७१.०३ मिमी, सेलू १५८.४२ मिमी, देवळी ९५.६८ मिमी, हिंगणघाट १०७.१२, समुद्रपूर ११६.७१ मिमी, आर्वी ८७.५४, आष्टी ९६.०४ व कारंजा तालुक्यात ११८.१७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात संपूर्ण जून महिन्यात सरासरी ३२१.६३ पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ सरासरी १०६.३४ पाऊस पडला आहे. असे असले तरी झालेल्या अल्प पावसामुळे संध्या शेतजमिनीत ओलावा असल्याने पेरणीची कामे शेतकरी करू शकतो; पण जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनीही या दोन दिवसांमध्ये पेरणी करण्याचे टाळावे, असे सांगण्यात येते.४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर होणार विविध पिकांची लागवडयंदाच्या खरीब हंगामात एकूण ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप ज्वारी १ हजार १०० हेक्टर, ६५ हजार हेक्टरवर तूर, ४०० हेक्टरवर मुंग, ७०० हेक्टरवर उडीद, ६७५ हेक्टरवर खरीप भुईमुंग, १ लाख २५ हजार ९२५ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर कापूस पिकाची लागवड होणार असल्याचाही अंदाज कृषी विभागाला आहे.आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जमिनीत बºयापैकी ओलावा आहे. शिवाय पेरणी करण्यासाठी जमिनीतील हा ओलावा फायदेदायक ठरणारा आहे. परंतु, हवामानखात्याने मंगळवार व बुधवारी वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकºयांनीही सदर दोन दिवस पेरणी करण्याचे टाळले पाहिजे.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.