शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे दोन दिवस पेरणी टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:04 IST

जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने या दोन दिवशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देकृषीतज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने या दोन दिवशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.मंगळवार २ आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी पुढेही दमदार पाऊस येईल, अशी अपेक्षा बाळगुण पेरणीच्या कामाला गती देत आहेत. यंदाच्या वर्षी १ जुलै सकाळपर्यंत वर्धा तालुक्यात ७१.०३ मिमी, सेलू १५८.४२ मिमी, देवळी ९५.६८ मिमी, हिंगणघाट १०७.१२, समुद्रपूर ११६.७१ मिमी, आर्वी ८७.५४, आष्टी ९६.०४ व कारंजा तालुक्यात ११८.१७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात संपूर्ण जून महिन्यात सरासरी ३२१.६३ पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ सरासरी १०६.३४ पाऊस पडला आहे. असे असले तरी झालेल्या अल्प पावसामुळे संध्या शेतजमिनीत ओलावा असल्याने पेरणीची कामे शेतकरी करू शकतो; पण जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनीही या दोन दिवसांमध्ये पेरणी करण्याचे टाळावे, असे सांगण्यात येते.४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर होणार विविध पिकांची लागवडयंदाच्या खरीब हंगामात एकूण ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप ज्वारी १ हजार १०० हेक्टर, ६५ हजार हेक्टरवर तूर, ४०० हेक्टरवर मुंग, ७०० हेक्टरवर उडीद, ६७५ हेक्टरवर खरीप भुईमुंग, १ लाख २५ हजार ९२५ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर कापूस पिकाची लागवड होणार असल्याचाही अंदाज कृषी विभागाला आहे.आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जमिनीत बºयापैकी ओलावा आहे. शिवाय पेरणी करण्यासाठी जमिनीतील हा ओलावा फायदेदायक ठरणारा आहे. परंतु, हवामानखात्याने मंगळवार व बुधवारी वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकºयांनीही सदर दोन दिवस पेरणी करण्याचे टाळले पाहिजे.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.