शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

पोटनिवडणुकीची माहिती ग्रामपंचायतला देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: June 24, 2014 00:00 IST

ग्रामपंचायत आनंदवाडी येथील पोटनिवडणुकी संदर्भात तलाठ्याने कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे गावाकऱ्यांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या प्रकरणी गावकऱ्यांनी

आष्टी(शहीद) : ग्रामपंचायत आनंदवाडी येथील पोटनिवडणुकी संदर्भात तलाठ्याने कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे गावाकऱ्यांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या प्रकरणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.तालुक्यात विविध ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यानंतर पोटनिवडणुका संदर्भात कार्यक्रम जाहीर झाला. यात ग्रामपंचायत आनंदवाडीचा समावेश होता. निवडणुकीची माहिती दहा दिवसांच्यापूर्वी ग्रामपंचायतीला तहसील कार्यालयाकडून मिळणे अपेक्षित आहे. त्यासासाठी संबंधीत गावाच्या तलाठ्याकडे काम सोपविण्यात आले होते; मात्र येथील तलाठी रजेवर गेले. ते रजेवर असल्याने त्यांचा प्रभार असलेल्या तलाठ्याने ती माहिती गावाकऱ्यांना देणे आवश्यक होते. वास्तविकतेत मात्र तहसीलदारांनी येथील प्रभार कोणत्याही तलाठ्याला दिला नसल्याचे समोर असले. शासनाच्या या दप्तरदिरंगाईचा फटका आनंदवाडी येथील गावकऱ्यांना बसल्याचा आरोप होत आहे.या प्रकरणी सुनील भार्गव, अनंत खोरगडे, ज्ञानेश्वर वानखडे यांच्यासह गावकऱ्यांनी या प्रकरणाला तलाठीच जबाबदार असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. निवडणुकीसारख्या संवेदनशील विषायात तलाठ्याकडून ढवळाढवळ केल्या जात असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. येथील तलाठी रजेवर असल्याचा अर्ज प्रभारी तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे दिला होता. चव्हाण यांनी येथील तात्पुरता कार्यभार दुसऱ्या तलाठ्याकडे द्यावा असे सांगितले; मात्र त्याची आॅर्डर निघाली नाही. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आनंदवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)