शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हॉटेल हॉलिडेच्या ४२ दुकानांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:28 IST

स्थानिक हॉटेल हॉलिडे रिसोर्ट परिसरातील तब्बल ४२ दुकानांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. ही कारवाई गुरुवारी पोलिसांच्या बंदोबस्तात व प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आल्यामुळे आता या व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

ठळक मुद्देपर्यटन विकास महामंडळाची कारवाई : कंत्राटदाराने परवानगी न घेता केले बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक हॉटेल हॉलिडे रिसोर्ट परिसरातील तब्बल ४२ दुकानांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. ही कारवाई गुरुवारी पोलिसांच्या बंदोबस्तात व प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आल्यामुळे आता या व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.येथील बजाज चौकात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे हॉटेल हॉलीडे रिसोर्ट आहे. हे रिसोर्ट चालविण्याचा कंत्राट पर्यटन विकास महामंडळाने १९९५ मध्ये वर्धा हॉटेल प्रा.लि. यांना दिला होता. या कंत्राटदार कंपनीने दरम्यानच्या काळात पर्यटन विकास महामंडळाची परवानगी न घेता; एक मजल्यापर्यंत बांधकाम करीत अनेक दुकानांची निर्मिती केली. तसेच ही दुकाने उपलब्ध करुन दिली. त्यामुळे या जागेवर अनेकांनी आपली दुकानदारी थाटली. याची माहिती पर्यटन विकास महामंडळाला होताच त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरु केली. तेव्हा त्यांना कंत्राटदाराने तब्बल ७ हजार ६६५ चौरस मीटर परिसरात दुकानाचे गाळे बांधल्याचे निदर्शनास आले. तसेच याच परिसरात मंगल कार्यालय वजा सभागृह बांधण्यात आल्याने काही वर्षांपूर्वी त्यावरही कारवाई करण्यात आली.आज पुन्हा पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने व्यावसायीक संकटात आले असून कंत्राटदाराच्याही पायाखालची वाळू सरकली आहे.न्यायालयाच्या आदेशाने कारवाईचा बडगापर्यटन विकास महामंडळ आणि गाळेधारकांतील हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. न्यायालयाने एका प्रकरणातील दोघांना ६ लाख रुपये तर दुसºया प्रकरणातील ३० जणांना ८२ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिलेत. पण, ही रक्कम जमा केली नाही. इतकेच नाही तर पर्यटन विकास महामंडळाकडून संबंधित गाळेधारकांना नोटीसही बजावण्यात आल्या. त्याकडेही दुर्लक्ष केल्याने अखेर आज दुकानांचा ताबा घेतला.न्यायालयाच्या निदेर्शानंतरही गाळेधारकांनी रक्कम भरली नाही. ही रक्कम भरण्यासंदर्भात वारंवार नोटीस देण्यात आल्यात. पण, त्यांनी याकडेही दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली. गाळ्यांच्या कुलूपांना सिल लावले असून, येथील मार्गही बंद करण्यात येणार आहेत. तसेच कुणी सिल तोडण्याचा किंवा रस्ता उघडण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल.-प्रशांत सवाई, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.

टॅग्स :tourismपर्यटन