शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयात सरासरी २१ टक्केच पाणी

By admin | Updated: April 8, 2017 00:26 IST

उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.

धोक्याची घंटा : एकाने तळ गाठला, तीन मार्गावर वर्धा : उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. जिल्ह्यातील एका प्रकल्पाने तळ गाठला तर तीन प्रकल्प या मार्गावर आहे. लघु प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प कोरडे झाले आहे. उर्वरीतही प्रकल्पांची स्थितीही नाजुक आहे. १५ मोठे व मध्यम प्रकल्पात सरासरी २१ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प म्हणून १५ प्रकल्पांची नोंद पाटबंधारे विभागात आहे. याच विभागाकडून पाण्याची पातळी नोंदविली जाते. ही पातळी नोंदविली जात असताना यात वाढत्या तापमाणामुळे ती सतत खालावत असल्याचे समोर येत आहे. दिवसागणीक पातळीत घट होत असल्याचे दिसत आहे. या १५ प्रकल्पात सरासरी २१.६६ टक्के जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या १५ पैकी मदन (उन्नई) प्रकल्पाने तळ गाठला आहे. तर पोथरा, लालनाला आणि नांद तळ गाठण्याच्या मार्गावर असल्याचे उपलब्ध जलसाठ्यावरून दिसत आहे. असे असले तरी सध्या असलेली स्थिती ही गत वर्षीच्या तुलनेत बरी असल्याचे दिसत आहे. जिल्ह्याला पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता धाम प्रकल्पातील जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. या धरणात पाणी असल्याने वर्धा शहराला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पात गत वर्षीच्या तुलनेत अधिक साठा आहे. येथे यंदाच्या उन्हाळ्यात २०.२० दलघमी उपयुक्त साठा आहे. गत वर्षी तो आजच्या तारखेला १४.३९ दलघमी होता. यामुळे शहरवासीयांना पाण्याकरिता भटक्ंती करण्याची गरज नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.(प्रतिनिधी) पिण्याकरिता ११.२९ दलघमी पाणी आरक्षित धाम प्रकल्पातून वर्धा शहराला पाणी पुरविण्यात येते. या जलाशयात असलेल्या जलसाठ्यापैकी ११.२९ टक्के जलसाठा पिण्याकरिता आरक्षित ठेवण्यात आला आहे. यात ५.७९ दलघमी साठा नगर परिषदेकरिता तर ५.५० दलघमी पाणी जीवन प्राधिकरणकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. रेल्वेकरिता ०.५३ दलघमी पाणी वर्धेतील काही जलाशयातून रेल्वे प्रशासनाकरिताही पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यात ०.५३ दलघमी पाणी रेल्वेकरिता आरक्षित करण्यात आले आहे. यातील काही पाणी नुकतेच सोडण्यात आले आहे. उद्योगाकरिता २.३८ दलघमी पाणी आरक्षित जिल्ह्यात असलेल्या जलसाठ्यापैकी २.३८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यातील एमआयडीसीकरिता ०.४३ दलघमी तर उत्तम व्हॅल्यू कंपनीकरिता १.९५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.