शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

जलाशयात सरासरी २१ टक्केच पाणी

By admin | Updated: April 8, 2017 00:26 IST

उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.

धोक्याची घंटा : एकाने तळ गाठला, तीन मार्गावर वर्धा : उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. जिल्ह्यातील एका प्रकल्पाने तळ गाठला तर तीन प्रकल्प या मार्गावर आहे. लघु प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प कोरडे झाले आहे. उर्वरीतही प्रकल्पांची स्थितीही नाजुक आहे. १५ मोठे व मध्यम प्रकल्पात सरासरी २१ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प म्हणून १५ प्रकल्पांची नोंद पाटबंधारे विभागात आहे. याच विभागाकडून पाण्याची पातळी नोंदविली जाते. ही पातळी नोंदविली जात असताना यात वाढत्या तापमाणामुळे ती सतत खालावत असल्याचे समोर येत आहे. दिवसागणीक पातळीत घट होत असल्याचे दिसत आहे. या १५ प्रकल्पात सरासरी २१.६६ टक्के जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या १५ पैकी मदन (उन्नई) प्रकल्पाने तळ गाठला आहे. तर पोथरा, लालनाला आणि नांद तळ गाठण्याच्या मार्गावर असल्याचे उपलब्ध जलसाठ्यावरून दिसत आहे. असे असले तरी सध्या असलेली स्थिती ही गत वर्षीच्या तुलनेत बरी असल्याचे दिसत आहे. जिल्ह्याला पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता धाम प्रकल्पातील जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. या धरणात पाणी असल्याने वर्धा शहराला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पात गत वर्षीच्या तुलनेत अधिक साठा आहे. येथे यंदाच्या उन्हाळ्यात २०.२० दलघमी उपयुक्त साठा आहे. गत वर्षी तो आजच्या तारखेला १४.३९ दलघमी होता. यामुळे शहरवासीयांना पाण्याकरिता भटक्ंती करण्याची गरज नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.(प्रतिनिधी) पिण्याकरिता ११.२९ दलघमी पाणी आरक्षित धाम प्रकल्पातून वर्धा शहराला पाणी पुरविण्यात येते. या जलाशयात असलेल्या जलसाठ्यापैकी ११.२९ टक्के जलसाठा पिण्याकरिता आरक्षित ठेवण्यात आला आहे. यात ५.७९ दलघमी साठा नगर परिषदेकरिता तर ५.५० दलघमी पाणी जीवन प्राधिकरणकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. रेल्वेकरिता ०.५३ दलघमी पाणी वर्धेतील काही जलाशयातून रेल्वे प्रशासनाकरिताही पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यात ०.५३ दलघमी पाणी रेल्वेकरिता आरक्षित करण्यात आले आहे. यातील काही पाणी नुकतेच सोडण्यात आले आहे. उद्योगाकरिता २.३८ दलघमी पाणी आरक्षित जिल्ह्यात असलेल्या जलसाठ्यापैकी २.३८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यातील एमआयडीसीकरिता ०.४३ दलघमी तर उत्तम व्हॅल्यू कंपनीकरिता १.९५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.