शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

जलाशयात सरासरी २१ टक्केच पाणी

By admin | Updated: April 8, 2017 00:26 IST

उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.

धोक्याची घंटा : एकाने तळ गाठला, तीन मार्गावर वर्धा : उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. जिल्ह्यातील एका प्रकल्पाने तळ गाठला तर तीन प्रकल्प या मार्गावर आहे. लघु प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प कोरडे झाले आहे. उर्वरीतही प्रकल्पांची स्थितीही नाजुक आहे. १५ मोठे व मध्यम प्रकल्पात सरासरी २१ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प म्हणून १५ प्रकल्पांची नोंद पाटबंधारे विभागात आहे. याच विभागाकडून पाण्याची पातळी नोंदविली जाते. ही पातळी नोंदविली जात असताना यात वाढत्या तापमाणामुळे ती सतत खालावत असल्याचे समोर येत आहे. दिवसागणीक पातळीत घट होत असल्याचे दिसत आहे. या १५ प्रकल्पात सरासरी २१.६६ टक्के जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या १५ पैकी मदन (उन्नई) प्रकल्पाने तळ गाठला आहे. तर पोथरा, लालनाला आणि नांद तळ गाठण्याच्या मार्गावर असल्याचे उपलब्ध जलसाठ्यावरून दिसत आहे. असे असले तरी सध्या असलेली स्थिती ही गत वर्षीच्या तुलनेत बरी असल्याचे दिसत आहे. जिल्ह्याला पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता धाम प्रकल्पातील जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. या धरणात पाणी असल्याने वर्धा शहराला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पात गत वर्षीच्या तुलनेत अधिक साठा आहे. येथे यंदाच्या उन्हाळ्यात २०.२० दलघमी उपयुक्त साठा आहे. गत वर्षी तो आजच्या तारखेला १४.३९ दलघमी होता. यामुळे शहरवासीयांना पाण्याकरिता भटक्ंती करण्याची गरज नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.(प्रतिनिधी) पिण्याकरिता ११.२९ दलघमी पाणी आरक्षित धाम प्रकल्पातून वर्धा शहराला पाणी पुरविण्यात येते. या जलाशयात असलेल्या जलसाठ्यापैकी ११.२९ टक्के जलसाठा पिण्याकरिता आरक्षित ठेवण्यात आला आहे. यात ५.७९ दलघमी साठा नगर परिषदेकरिता तर ५.५० दलघमी पाणी जीवन प्राधिकरणकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. रेल्वेकरिता ०.५३ दलघमी पाणी वर्धेतील काही जलाशयातून रेल्वे प्रशासनाकरिताही पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यात ०.५३ दलघमी पाणी रेल्वेकरिता आरक्षित करण्यात आले आहे. यातील काही पाणी नुकतेच सोडण्यात आले आहे. उद्योगाकरिता २.३८ दलघमी पाणी आरक्षित जिल्ह्यात असलेल्या जलसाठ्यापैकी २.३८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यातील एमआयडीसीकरिता ०.४३ दलघमी तर उत्तम व्हॅल्यू कंपनीकरिता १.९५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.