शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

आर्द्राच्या अखेरपर्यंत सरासरी २४७ मिमी पाऊस

By admin | Updated: July 5, 2017 00:22 IST

जिल्ह्यात दररोज पाऊस येत आहे. येत असलेला पाऊस नियमित नसल्याने त्याची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सध्या पाऊस कमीच लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात दररोज पाऊस येत आहे. येत असलेला पाऊस नियमित नसल्याने त्याची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारला आर्द्रा नक्षत्राचा अखेरचा दिवस होता. या नक्षत्रापर्यंत जिल्ह्यात सरसरी २४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी जुलै महिन्यापर्यंत २५४ मिमी पावसाची नोंद झाली होती. उद्या बुधवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. आद्राच्या अखरेच्या दिवशी दुपारी वर्धेत पावसाने हजेरी लावली. दोन दिवसाच्या विश्रातीनंतर हा पाऊस आला. याची मोजणी बुधवारी सकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सरासरी १,१२१ मीमी. पावसाची नोंद होणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमीच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात झालेली सर्वाधिक नोंद सरासरी ९२०.७१ मीमी. एवढी आहे. पावसाच्या चार महिन्यात झालेली सरासरी महत्त्वाची धरली जाते. यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोरडे पडलेले जलसाठे भरल्याचे दिसून आले आहे. गत पावसाळ्यात या काळात जिल्ह्यातील एकूण चार जलाशय कोरडे असल्याची नोंद आहे. यंदा मात्र तसे नाही. जिल्ह्यातील सर्वच जलाशयात पाणी असल्याचे दिसून आले आहे. पावसाचे अजून दोन महिने बाकी आहेत.कोरड्या जलाशयात आले पाणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी झालेल्या पावसाने कोरड्या पडलेल्या जलाशयात पाणी आल्याचे झालेल्या नोंदिवरून दिसून आले आहे. आजच्या स्थितीत बोर प्रकल्पात १४.७६ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. धाम प्रकल्पात २०.५४, पोथरा २६.४७, पंचधारा २४.३४, डोंगरगाव १५.८९, मदन ३७.१४, मदन उन्नई ५.९७, लालनाला १२.३५, नांद १९.३४, उर्ध्व वर्धा ३५.१९, निम्न वर्धा १७.५८, बेंबळा २६.८२ तर सुकळी लघु प्रकल्पात आजच्या घडीला एकूण २५.२७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मंगळवारी वर्धेत ११.३४ मिमि पावसाची नोंद मंगळवारी वर्धा शहरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. दुपारपासून सायंकाळपर्यंत ११.३४ मिमि पावसाची नोंद झाली आहे.