शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आर्द्राच्या अखेरपर्यंत सरासरी २४७ मिमी पाऊस

By admin | Updated: July 5, 2017 00:22 IST

जिल्ह्यात दररोज पाऊस येत आहे. येत असलेला पाऊस नियमित नसल्याने त्याची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सध्या पाऊस कमीच लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात दररोज पाऊस येत आहे. येत असलेला पाऊस नियमित नसल्याने त्याची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारला आर्द्रा नक्षत्राचा अखेरचा दिवस होता. या नक्षत्रापर्यंत जिल्ह्यात सरसरी २४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी जुलै महिन्यापर्यंत २५४ मिमी पावसाची नोंद झाली होती. उद्या बुधवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. आद्राच्या अखरेच्या दिवशी दुपारी वर्धेत पावसाने हजेरी लावली. दोन दिवसाच्या विश्रातीनंतर हा पाऊस आला. याची मोजणी बुधवारी सकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सरासरी १,१२१ मीमी. पावसाची नोंद होणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमीच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात झालेली सर्वाधिक नोंद सरासरी ९२०.७१ मीमी. एवढी आहे. पावसाच्या चार महिन्यात झालेली सरासरी महत्त्वाची धरली जाते. यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोरडे पडलेले जलसाठे भरल्याचे दिसून आले आहे. गत पावसाळ्यात या काळात जिल्ह्यातील एकूण चार जलाशय कोरडे असल्याची नोंद आहे. यंदा मात्र तसे नाही. जिल्ह्यातील सर्वच जलाशयात पाणी असल्याचे दिसून आले आहे. पावसाचे अजून दोन महिने बाकी आहेत.कोरड्या जलाशयात आले पाणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी झालेल्या पावसाने कोरड्या पडलेल्या जलाशयात पाणी आल्याचे झालेल्या नोंदिवरून दिसून आले आहे. आजच्या स्थितीत बोर प्रकल्पात १४.७६ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. धाम प्रकल्पात २०.५४, पोथरा २६.४७, पंचधारा २४.३४, डोंगरगाव १५.८९, मदन ३७.१४, मदन उन्नई ५.९७, लालनाला १२.३५, नांद १९.३४, उर्ध्व वर्धा ३५.१९, निम्न वर्धा १७.५८, बेंबळा २६.८२ तर सुकळी लघु प्रकल्पात आजच्या घडीला एकूण २५.२७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मंगळवारी वर्धेत ११.३४ मिमि पावसाची नोंद मंगळवारी वर्धा शहरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. दुपारपासून सायंकाळपर्यंत ११.३४ मिमि पावसाची नोंद झाली आहे.