शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

औरंगाबाद एक्स्प्रेस हायवे उठलाय जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:29 IST

नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार्ग आता जीवघेणा ठरु लागला आहे.

ठळक मुद्देदोन दिवसात तीन अपघात : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार्ग आता जीवघेणा ठरु लागला आहे.प्रवाशांचा हिताकरिता पुलगाव बायपास मार्गे सुरु केलेल्या एक्सप्रेस हायवेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी अल्पावधीतच वर्धा ते पुलगाव हा ४० किलो मीटरचा रस्ता खड्डयात गेला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या दोन दिवसात तीन अपघात घडले असून यामध्ये जवळपास सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. तसेच एका घराचेही नुकसान झाले असून ४ ट्रकही अपघातग्रस्त झाले आहे.कंत्राटदाराने या रस्त्याचे काम पुर्ण केल्यानंतर कुठेही अपघातग्रस्त वळण किंवा पूल असल्याबाबतचे सूचना फलक लावलेले नाही. सोबतच गावाच्याजवळ किंवा या मार्गावरील शाळांजवळ कुठेही झेब्रा क्रॉसिंग किंवा गतिरोधक लावलेले नाही. त्यामुळे रस्तेविकास महामंडळ किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मापदंडाचीही कंत्राटदाराने पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. तरिही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भरधाव वेगाने जाणाºया ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे या रस्त्यावर तयार झाले आहे. या महामार्गावरील चौरस्त्याचर ढाबे व इतर व्यावसायिक अतिक्रम करुन सौदर्याला बाधा निर्माण करीत आहे. या सर्वामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे.केंद्रातील रस्ते विकास मंत्रिपद तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्रिपद हे विदर्भाच्या वाट्याला आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई करुन नाचणगाव चौरस्त्यावर पोलीस चेकपोस्ट तयार करुन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह प्रवासी करीत आहेत.