शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

औरंगाबाद एक्स्प्रेस हायवे उठलाय जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:29 IST

नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार्ग आता जीवघेणा ठरु लागला आहे.

ठळक मुद्देदोन दिवसात तीन अपघात : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार्ग आता जीवघेणा ठरु लागला आहे.प्रवाशांचा हिताकरिता पुलगाव बायपास मार्गे सुरु केलेल्या एक्सप्रेस हायवेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी अल्पावधीतच वर्धा ते पुलगाव हा ४० किलो मीटरचा रस्ता खड्डयात गेला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या दोन दिवसात तीन अपघात घडले असून यामध्ये जवळपास सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. तसेच एका घराचेही नुकसान झाले असून ४ ट्रकही अपघातग्रस्त झाले आहे.कंत्राटदाराने या रस्त्याचे काम पुर्ण केल्यानंतर कुठेही अपघातग्रस्त वळण किंवा पूल असल्याबाबतचे सूचना फलक लावलेले नाही. सोबतच गावाच्याजवळ किंवा या मार्गावरील शाळांजवळ कुठेही झेब्रा क्रॉसिंग किंवा गतिरोधक लावलेले नाही. त्यामुळे रस्तेविकास महामंडळ किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मापदंडाचीही कंत्राटदाराने पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. तरिही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भरधाव वेगाने जाणाºया ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे या रस्त्यावर तयार झाले आहे. या महामार्गावरील चौरस्त्याचर ढाबे व इतर व्यावसायिक अतिक्रम करुन सौदर्याला बाधा निर्माण करीत आहे. या सर्वामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे.केंद्रातील रस्ते विकास मंत्रिपद तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्रिपद हे विदर्भाच्या वाट्याला आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई करुन नाचणगाव चौरस्त्यावर पोलीस चेकपोस्ट तयार करुन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह प्रवासी करीत आहेत.