शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

औरंगाबाद एक्स्प्रेस हायवे उठलाय जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:29 IST

नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार्ग आता जीवघेणा ठरु लागला आहे.

ठळक मुद्देदोन दिवसात तीन अपघात : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार्ग आता जीवघेणा ठरु लागला आहे.प्रवाशांचा हिताकरिता पुलगाव बायपास मार्गे सुरु केलेल्या एक्सप्रेस हायवेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी अल्पावधीतच वर्धा ते पुलगाव हा ४० किलो मीटरचा रस्ता खड्डयात गेला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या दोन दिवसात तीन अपघात घडले असून यामध्ये जवळपास सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. तसेच एका घराचेही नुकसान झाले असून ४ ट्रकही अपघातग्रस्त झाले आहे.कंत्राटदाराने या रस्त्याचे काम पुर्ण केल्यानंतर कुठेही अपघातग्रस्त वळण किंवा पूल असल्याबाबतचे सूचना फलक लावलेले नाही. सोबतच गावाच्याजवळ किंवा या मार्गावरील शाळांजवळ कुठेही झेब्रा क्रॉसिंग किंवा गतिरोधक लावलेले नाही. त्यामुळे रस्तेविकास महामंडळ किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मापदंडाचीही कंत्राटदाराने पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. तरिही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भरधाव वेगाने जाणाºया ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे या रस्त्यावर तयार झाले आहे. या महामार्गावरील चौरस्त्याचर ढाबे व इतर व्यावसायिक अतिक्रम करुन सौदर्याला बाधा निर्माण करीत आहे. या सर्वामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे.केंद्रातील रस्ते विकास मंत्रिपद तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्रिपद हे विदर्भाच्या वाट्याला आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई करुन नाचणगाव चौरस्त्यावर पोलीस चेकपोस्ट तयार करुन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह प्रवासी करीत आहेत.