शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम

By admin | Updated: June 5, 2015 02:04 IST

प्रवासादरम्यान नागरिकांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याच्या कटकटीपासून सुटका देण्याकरिता वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम ...

वर्धा : प्रवासादरम्यान नागरिकांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याच्या कटकटीपासून सुटका देण्याकरिता वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम (आॅटोमेटीक तिकीट व्हेंडर मशीन) सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना एक शंभर रुपयांचे कार्ड रेल्वे विभागाकडून विकत घ्यावे लागणार असल्याची माहिती नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंह यांनी वर्धेत गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. प्रवाश्यांनी विकत घेतलेल्या कार्डपैकी ५० रुपये त्यांना प्रवासाकरिता मिळतील व ५० रुपये रेल्वे विभागाच्या खात्यात जातील. हे कार्ड एक वर्षाकरिता राहील. सदर कार्डचे नुतनीकरण ५० ते ५०० रुपयांपर्यंत करता येणार आहे. यात दीडशे किलोमिटरच्या प्रवासादरम्यान प्रवाश्याला ५ टक्के सुट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच यावेळी विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. २८ मेपासून रेल्वे प्रवासी पंधरवडा सुरू झाला आहे. हा पंधरवडा येत्या ९ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान वर्धा रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवाश्यांकडून त्यांच्या सूचना त्यांनी जाणून घेतल्या. त्यांच्याकडून अर्जही भरून घेतले. यात रेल्वे विभागाकडून असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक संमुत देऊळकर, वरिष्ठ विभागीय अभियंता एच.एन. कावरे, प्रसिद्धी अधिकारी आर. डी.पाटील यांच्यासह वर्धेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)वर्धा रेल्वे स्थानकावर एमएफसी वर्धा रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना त्रास होणार नाही व त्यांना सर्वच सुविधा पुरविण्याकरिता स्थानकावर एमएफसी (मल्टी फंक्शन कॉम्प्लेक्स) बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या कामाला लावकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिंदी (रेल्वे) येथे असलेल्या फाटकामुळे नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे नवे फाटक तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुलगाव येथील रेल्वे फाटकाजवळ असलेल्या अतिक्रमणामुळे त्याचा विस्तार करणे अडचणीचे जात आहे. यावर उपाय योजना आखण्यात येत असल्याचे सिंह यावेळी म्हणाले. बजाच चौक परिसरात असलेल्या उड्डाण पुलाची रूंदी वाढविण्याच्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले. नागपूर-यवतमाळ रेल्वे मार्गाला जमीन अधिग्रहणाचे ग्रहण नागपूर-यवतमाळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्याचे काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यात अडचणी येत असल्याने त्याचे काम रखडले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास व्यापाराच्या दृष्टीने व प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने त्याचा लाभ होणे शक्य आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यंदाचे उदिष्ट १ लाख ८० हजार कोटी रुपयांचे गत हंगामात रेल्वे विभागाची कमाई १ लाख ७५ हजार कोटी रुपये झाली आहे. ही कामाई प्रवाश्यांना मिळत असलेल्या सेवेचा पुरावा आहे. प्रवाश्यांच्या सेवा वाढविताना यंदाच्या सत्रात वाढ करून १ लाख ८० हजार कोटी रुपयांचे उदिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.