शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम

By admin | Updated: June 5, 2015 02:04 IST

प्रवासादरम्यान नागरिकांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याच्या कटकटीपासून सुटका देण्याकरिता वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम ...

वर्धा : प्रवासादरम्यान नागरिकांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याच्या कटकटीपासून सुटका देण्याकरिता वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम (आॅटोमेटीक तिकीट व्हेंडर मशीन) सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना एक शंभर रुपयांचे कार्ड रेल्वे विभागाकडून विकत घ्यावे लागणार असल्याची माहिती नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंह यांनी वर्धेत गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. प्रवाश्यांनी विकत घेतलेल्या कार्डपैकी ५० रुपये त्यांना प्रवासाकरिता मिळतील व ५० रुपये रेल्वे विभागाच्या खात्यात जातील. हे कार्ड एक वर्षाकरिता राहील. सदर कार्डचे नुतनीकरण ५० ते ५०० रुपयांपर्यंत करता येणार आहे. यात दीडशे किलोमिटरच्या प्रवासादरम्यान प्रवाश्याला ५ टक्के सुट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच यावेळी विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. २८ मेपासून रेल्वे प्रवासी पंधरवडा सुरू झाला आहे. हा पंधरवडा येत्या ९ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान वर्धा रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवाश्यांकडून त्यांच्या सूचना त्यांनी जाणून घेतल्या. त्यांच्याकडून अर्जही भरून घेतले. यात रेल्वे विभागाकडून असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक संमुत देऊळकर, वरिष्ठ विभागीय अभियंता एच.एन. कावरे, प्रसिद्धी अधिकारी आर. डी.पाटील यांच्यासह वर्धेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)वर्धा रेल्वे स्थानकावर एमएफसी वर्धा रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना त्रास होणार नाही व त्यांना सर्वच सुविधा पुरविण्याकरिता स्थानकावर एमएफसी (मल्टी फंक्शन कॉम्प्लेक्स) बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या कामाला लावकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिंदी (रेल्वे) येथे असलेल्या फाटकामुळे नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे नवे फाटक तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुलगाव येथील रेल्वे फाटकाजवळ असलेल्या अतिक्रमणामुळे त्याचा विस्तार करणे अडचणीचे जात आहे. यावर उपाय योजना आखण्यात येत असल्याचे सिंह यावेळी म्हणाले. बजाच चौक परिसरात असलेल्या उड्डाण पुलाची रूंदी वाढविण्याच्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले. नागपूर-यवतमाळ रेल्वे मार्गाला जमीन अधिग्रहणाचे ग्रहण नागपूर-यवतमाळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्याचे काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यात अडचणी येत असल्याने त्याचे काम रखडले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास व्यापाराच्या दृष्टीने व प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने त्याचा लाभ होणे शक्य आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यंदाचे उदिष्ट १ लाख ८० हजार कोटी रुपयांचे गत हंगामात रेल्वे विभागाची कमाई १ लाख ७५ हजार कोटी रुपये झाली आहे. ही कामाई प्रवाश्यांना मिळत असलेल्या सेवेचा पुरावा आहे. प्रवाश्यांच्या सेवा वाढविताना यंदाच्या सत्रात वाढ करून १ लाख ८० हजार कोटी रुपयांचे उदिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.