शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पशुपक्ष्यांच्या हालचालीवर बळीराजाचे लक्ष

By admin | Updated: May 25, 2015 02:08 IST

सध्या मे हिटच्या तडाख्यात सापडलेल्या जीवसृष्टीला पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्रापासून पावसाला प्रारंभ होतो.

वर्धा : सध्या मे हिटच्या तडाख्यात सापडलेल्या जीवसृष्टीला पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्रापासून पावसाला प्रारंभ होतो. पण पक्षी महिन्याच्या मध्यानंतरच पावसापासून बचाव करण्यासाठी झाडावर आपली घरटी बांधण्याच्या तयारीला लागतात. पक्ष्यांची घरटी बांधण्याची वेळ आणि पद्धती यावरून पावसाचा अंदाज फार पूर्वीपासून शेतकरी घेत असतात. त्यामुळे पक्ष्यांचे घरटे आणि हालचालींवर बळेरेराजा लक्ष ठेवून आहे. शेतकरी शेतीच्या मशागतीसोबतच पशुपक्ष्यांच्या हालचालीवर नेहमीच बारीक लक्ष ठेऊन असतो. त्यांच्या हालचालीवरुन पावसाचा आणि एकंदरीतच निसर्गाचा अंदाज बांधला जातो. त्यातील बहुतांश अंदाज अचूक ठरत असल्याचे शेतकरी सांगतात. टिटवी पक्ष्याने नदीनाल्याच्या काठापासून अंडी दूर ठेवली, तसेच कावळ्यांनी आपली घरटी झाडाच्या मध्यावर बांधली तर पावसाळा जास्त होईल, असे संकेत असतात. सध्या पक्ष्यांनी घरटे बांधण्याची लगबग सुरू केली असून, निवारा व अंडी ठेवण्याची व्यवस्था केल्या जात आहे. घरट्याच्या उंचीवरून पाऊस किती येईल याचा अंदाज बांधला जातो.कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या हालचाली हा पावसाच्या आगमनाचा शुभ संकेत समजल्या जातो. कावळ्याने घरटे झाडाच्या शेंड्यावर बांधल्यास पावसाळा असमाधानकारक, मध्यभागी तयार केल्यास पाऊस समाधानकारक समजण्यात येतो. यासोबतच निंबाच्या झाडांना जास्त प्रमाणात निंबोळ्या लागल्या तर हंगाम चांगला येईल, असा तर्कही अनुभवी शेतकरी देतात. तसेच सुरगण हा पक्षी घरटी बांधण्यात तरबेज असतो. त्याने जर भरपूर घरटी बांधली तर पाऊस जास्त येईल असे समजले जाते. पक्ष्यांना वातावरणाचा अंदाज दूरवरून येत असतो. परंतु शेताभोवतालची झाडेच सध्या तोडल्या जात असल्याने शेतशिवारात पक्ष्यांची घरटी पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे.(शहर प्रतिनिधी)