शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांकडे जनतेचे लक्ष

By admin | Updated: October 27, 2016 00:45 IST

जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुका येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असली तरी...

राजकीय पक्षांची माथापच्ची : तिकिटासाठी इच्छुकांचे मुंबईत ठाणवर्धा : जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुका येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असली तरी अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छुकांची यादी मोठी असल्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी द्यावी, यावरून पक्षश्रेष्ठींची पाथापच्ची सुरू असल्याची माहिती आहे.नगराध्यक्षपदाची निवड थेट जनता निवडणुकीच्या माध्यमातून करणार असल्यामुळे या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातही वर्धा व हिंगणघाट सर्वसाधारण तर पुलगाव येथे हे पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने अनेकांना नगराध्यक्षपदाचे स्वप्न पडू लागले आहे. राजकीय पक्षाची तिकीट मिळाल्यास हा राजयोग सोपा होईल, ही बाब लक्षात घेऊन पक्षातील मंडळींसह इतरही मंडळींनी राजकीय पक्षांकडे तिकीट मागून फिल्डींग लावणे सुरू केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काही राजकीय पक्षांकडे नगराध्यक्षपदाचा दमदार उमेदवार नसल्यामुळे पश्रक्षेष्ठी नव्या चेहऱ्यांना चाचपडून बघत असल्याची माहिती आहे. यामुळे उमेदवारीचा तिढा सुटता-सुटत नसल्याचे समजते. दुसरी बाब म्हणजे, आधीच उमेदवार जाहीर केल्यास बंडखोरीची शक्यता अधिक आहे. हा धोकाही राजकीय पक्ष पत्करण्यास तयार नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार मुंबईत ठरणार असल्यामुळे जवळपास सर्वच प्रमुख पक्षांकडील इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले आहे. कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे जनतेचे बारीक लक्ष आहे.(जिल्हा प्रतिनिधी)