शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

गृहरक्षक दिल्लीत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:05 IST

शासनाने नवा निर्णय अंमलात आणून तब्बल ५४ हजार गृहरक्षकांना कामावरून कमी केले.

शासनाचा निषेध : बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या बैठकीत निर्णयलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने नवा निर्णय अंमलात आणून तब्बल ५४ हजार गृहरक्षकांना कामावरून कमी केले. यात वर्धेतील भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी गृहरक्षकांच्या आंदोलनादरम्यान बोळवण केल्याचा आरोप बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने करण्यात आला. सोमवारी वर्धेत झालेल्या बैठकीत शासनाच्या या दुटप्पी धोरणाच्या विरोधात गृहरक्षकांनी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृहरक्षकांवर शासनाच्या निर्णयामुळे अन्याय झाल्याचा आरोप करीत फेडरेशनच्यावतीने झाशी राणी चौक परिसरात आज सभा घेण्यात आली आहे. या सभेला फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष एस.एम. ठमके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या पहिले एका रॅलीचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जात अतिथींच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यानंतर सभेला प्रारंभ झाला. या सभेत विविध विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या धरणे आंदोलनात बहुजन समाज पार्टी, आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी, समता सैनिक दल, डॉ. आंबेडकर स्ट्रगल्स असोसिएशन आॅफ इंडिया आणि रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियासह अनेक संघटनांचा पाठींबा होता. आंदोलनातून १२ ते २१ वर्षानंतर गृहरक्षकांची सेवा समाप्त करणारा शासन निर्णय व महासमादेशकांची परिपत्रके रद्द करावी. प्रवर्तनातील मुंबई गृहरक्षक अधिनियम १९४७ च्या तरतुदी बरहुकूम वयाच्या ५५ वर्षापर्यंत देशसेवा करण्याच्या संधीचे रक्षण करणे, दर ३ वर्षानंतर गृहरक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे गैरसंविधानिक प्रयोजन कायमस्वरूपी रद्द करणे, वर्षातील संपूर्ण ३६५ दिवसाचा बंदोबस्ताचे रक्षण करणे, ३६५ दिवसाचे मानधन देवून त्यांच्या देशभक्तीच्या भावनेचा सन्मान करणारा निर्णय घेणे, गृहरक्षकांना मिनीमम वेज अ‍ॅक्टनुसार मानधन देणारा सन्मानजनक कायदा पारीत करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. राज्यात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे गृहरक्षकांना सुद्धा सर्व भत्ते व संविधानिक कायद्याच्या चौकटीत अनुज्ञेय असणाऱ्या सोयी व सुविधा देणे, पोलीस प्रशासनातील रिक्त पदे शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे भण्याची मागणी यावेळी राज्य शासनाला करण्यात आली.