शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
2
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
5
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
6
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
7
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
8
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
9
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
10
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
11
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
12
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
13
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
14
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
15
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
16
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
17
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
18
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
19
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
20
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले

एटीएमच्या ‘नो कॅश’ने नागरिक त्रस्त

By admin | Updated: April 13, 2017 01:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही एटीएमची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही.

जिल्ह्यातील अनेक एटीएम बंदच : शेतकरी, व्यापारी व चाकरमान्यांना मनस्ताप वर्धा : नोटाबंदीच्या निर्णयाला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही एटीएमची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील बहुतांश एटीएम केंद्र बंद असतात. हीच परिस्थिती ग्रामीण भागातही असल्याने एटीएम केंद्र कधी सुरळीत होईल याची ग्राहकांना प्रतीक्षा आहे. शासनाने एटीएमच्या व्यवहारावर मर्यादा आणल्या आहे. महिन्याभरात ठराविक व्यवहारवर सवलत दिली आहे. असे असताना एटीएम बंद राहत असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. बँकेकडे तक्रार करुनही एटीएम सुरू करण्यात येत नाही, असे ग्राहक सांगतात. अनेकदा एटीएम बंद असल्याने ग्राहकांना शहरभर भटकंती करावी लागते. त्यातही एखादे एटीएम केंद्र सुरू असेल तर तेथे ग्राहकांच्या रांगा असतात. यात वेळ आणि श्रम व्यर्थ जातात. बँकाच्या या कार्यप्रणालिविषयी ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम केंद्र सर्व प्रमुख चौकात आहेत. मात्र कुठलाही सण किंवा उत्सव असला की, हे एटीएम केंद्र बंद असतात. अशात कोणत्याही केंद्रावर गेले तरी रिकाम्या हातानेच परतावे लागते. यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश एटीएमवरुन आजही दोन हजाराचीच नोट मिळते. साधारण व्यवहार करताना सुटे पैसे देण्याचा प्रश्न असतो. यात ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)