शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

एटीएमच्या ‘नो कॅश’ने नागरिक त्रस्त

By admin | Updated: April 13, 2017 01:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही एटीएमची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही.

जिल्ह्यातील अनेक एटीएम बंदच : शेतकरी, व्यापारी व चाकरमान्यांना मनस्ताप वर्धा : नोटाबंदीच्या निर्णयाला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही एटीएमची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील बहुतांश एटीएम केंद्र बंद असतात. हीच परिस्थिती ग्रामीण भागातही असल्याने एटीएम केंद्र कधी सुरळीत होईल याची ग्राहकांना प्रतीक्षा आहे. शासनाने एटीएमच्या व्यवहारावर मर्यादा आणल्या आहे. महिन्याभरात ठराविक व्यवहारवर सवलत दिली आहे. असे असताना एटीएम बंद राहत असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. बँकेकडे तक्रार करुनही एटीएम सुरू करण्यात येत नाही, असे ग्राहक सांगतात. अनेकदा एटीएम बंद असल्याने ग्राहकांना शहरभर भटकंती करावी लागते. त्यातही एखादे एटीएम केंद्र सुरू असेल तर तेथे ग्राहकांच्या रांगा असतात. यात वेळ आणि श्रम व्यर्थ जातात. बँकाच्या या कार्यप्रणालिविषयी ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम केंद्र सर्व प्रमुख चौकात आहेत. मात्र कुठलाही सण किंवा उत्सव असला की, हे एटीएम केंद्र बंद असतात. अशात कोणत्याही केंद्रावर गेले तरी रिकाम्या हातानेच परतावे लागते. यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश एटीएमवरुन आजही दोन हजाराचीच नोट मिळते. साधारण व्यवहार करताना सुटे पैसे देण्याचा प्रश्न असतो. यात ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)