शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

एटीएमची डोकेदुखी कायमच

By admin | Updated: May 8, 2017 00:45 IST

नोटाबंदीला सहा महिने झाले तरी एटीएम सेवेचे रोख नसण्याचे रडगाणे सुरूच आहे. शहरातील बहुतांश

ग्राहकांना मनस्ताप : बँकेपुढे ग्राहकांच्या रांगा लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : नोटाबंदीला सहा महिने झाले तरी एटीएम सेवेचे रोख नसण्याचे रडगाणे सुरूच आहे. शहरातील बहुतांश एटीएम केंद्रापुढे बऱ्याचवेळा ‘नो कॅश’चे फलक झळकत असतात. त्यामुळे सामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बॅँक प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे तक्रार तरी कुणाकडे करावी असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. एटीएम केंद्र बंद राहत असल्याने बॅँकांपुढे ग्राहकांच्या रांगा लागतात. अनेकदा सर्व ग्राहकांना रोकड पुरविण्यात बँक प्रशासन कमी पडत असल्याचे दिसते. शासनाकडून कॅशलेस व्यवहार करण्याकरिता प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे तर हे अलिखीत धोरण अंमलात आणले जात नाही ना, असा संशय सध्या ग्राहकांतून व्यक्त केला जात आहे. येथील एटीएम मोठ्या प्रमाणावर कॅशलेस झाल्याने रोख रक्कम काढताना ग्राहकांची चांगलीच दमछाक होत आहे. बऱ्याच एटीएम केंद्रात रोकड नसल्याचे फलक लावून बँक प्रशासन जबाबदारीतून मुक्त होतात. येथील काही एटीएम अनेक महिन्यांपासून बंद आहे. याची तक्रार करुनही सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. बहुतांश एटीएम पुर्णवेळ सेवा देत नसल्याने बॅँक ग्राहकांची गोची होते. एकीककडे एटीएम वापरावर निर्बंध आले आहे. अशात जे एटीएम केंद्र महिनोंगनती बंद आहे त्या बँक ग्राहकांना नाईलाजास्तव अन्य एटीएम मधुन रोख काढावी लागते. त्यामुळे नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. एटीएम मधुन रोल्ह काढण्यासाठी भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. ज्या एटीएममध्ये रोकड असते तेथे लोकांची गर्दी होत असल्याने ताटकळत राहावे लागते. भर उन्हात उभे राहताना वृद्ध नाफरिकांना त्रास होतो. एटीएम केंद्र सुरळीत करण्याची मागणी ग्राहकातून होत आहे. कॅशलेस व्यवहाराला चालना मिळावी म्हणून शासन प्रयत्नरत आहे. मात्र येथे कॅशलेस व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी दैनंदिन व्यवहार कसे पाराडावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बॅँकांना त्यांच्या मागणीप्रमाणे रोकड उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना रोकड वाटप करताना अडचण येत असल्याचे समजते. एटीएम केंद्रात खडखडाट असल्याने ग्राहकांना बँकेत जाण्याखेरीज पर्याय नसतो. रोख व्यवहारावर नियंत्रण आल्याने ग्राहकांची कोंडी वाढतच आहे. याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी येथे सक्षम यंत्रणा उभी करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. नोटाबंदीनंतर व्यवहार सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागेल असे सांगण्यात आले. मात्र सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी व्यवहार सुरळीत झाले नसल्याने हिंगणघाटवासी त्रस्त झाले आहे. येथील एटीएममध्ये ठणठणाट असल्याने ग्राहकांची पायपीट सुरू असते. त्यामुळे एटीएम व्यवस्थेवरील सामान्यांचा विश्वास डळमळीत होत असून याकडे बँक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे. शासनाने सर्वसामान्यांना होणारा त्रास पाहता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे. पैसे काढण्यासाठी भटकंती पैसे बॅँकेत असताना ते वेळेवर उपलब्ध होत नसेल तर काय कामाचे, असा प्रश्न एका त्रस्त विद्यार्थीनीने व्यक्त यावेळी केला. असदर विद्यार्थिनी हिंगणघाट येथून मुंबईला नोकरीच्या मुलाखतीकरिता जात होती. प्रवासाकरिता तिला पैसे हवे असल्याने एटीएम केंद्रात ती गेली असता कॅश न मिळाल्याने तिला विनातिकीट प्रवास करावा लागला. असाच प्रकार काही हिंगणघाटवासींना एटीएममध्ये रोख न मिळाल्याने सहन करावा लागला. एटीएममुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत. मग, एटीएम केंद्र कशासाठी? बॅँक ग्राहकांना त्यांच्या खात्यातील रक्कम कधीही, केव्हाही काढता यावी यासाठी दिलेली ही सुविधा ग्राहकांना मनस्ताप देणारी ठरत आहे. नोटाबंदीनंतर या सुविधेला ग्रहण लागले आहे. येथील बॅँकांना रोकड कमी पुरविण्यात येत असल्याने असे प्रकार घडत असल्याची माहिती आहे. बँकांमध्ये रोखेचा तुटवडा शासनाकडून कॅशलेस व्यवहार वाढविण्याच्या प्रयत्नात बॅँकांना रोख कमी मिळत आहे. परिणामी एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट असतो. महिन्याभरात येथील एटीएम काही दिवस वगळता बंदच असतात. शहरी व ग्रामीण भागात त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून उपाययोजना करण्याची मागणी आहे.