शहरं
Join us  
Trending Stories
1
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
2
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
5
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
6
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
7
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
8
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
9
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
10
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
11
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
12
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
13
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
14
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
15
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
16
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
17
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
18
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
19
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
20
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर

स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतमालाला हमीभाव द्या

By admin | Updated: October 20, 2016 01:08 IST

देशभरांत शेती नफ्यात येत नाही म्हणून लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे. विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या ...

यशंवत झाडे : शेतकरी मेळाव्यात शेतकरी कर्जमुक्तीचा ठराववर्धा : देशभरांत शेती नफ्यात येत नाही म्हणून लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे. विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्यांमध्ये आणखीच वाढ झाली आहे. उत्पादन वाढले, जास्त पिकले तर बाजारपेठेत शेतमालाचे दर पडतात. उत्पादन वाढले तरी उत्पन्न वाढत नाही. तेव्हा स्वामीनाथन कमिशनप्रमाणे शेतमालाचे हमी दर निश्चित करावे, असे प्रतिपादन समुद्रपूर येथील शेतकरी मेळाव्यात किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी केले. नापिकी झाली तर सरकार विदेशातून गहू, तांदूळ, डाळ याची आयात करून भाव पाडते. अशास्थितीत शेतकऱ्यांना वाढत्या महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे दरवर्षी शेतमालाचे हमी दर कृषी मूल्य आयोगाने पेरणीपूर्वी जाहीर करावे. ते दर बाजारपेठेत शेतकऱ्यांना मिळतील अशी व्यवस्था केंद्र व राज्य सरकारने करावी, असेही ते म्हणाले. समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी बाळकृष्ण तिमांडे होते तर प्रमुख अतिथी मंचावर यशवंत झाडे, चंद्रभान नाखले, महेश दुबे, जानराव नागमोते, गजानन ढोरे, जगन चांभारे उपस्थिते होते. याप्रसंगी प्रमुख अतिथींनी शेतकरी समस्या व त्यावरील उपाय यावर समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्वामीनाथन कमिशनप्रमाणे शेतमालाचे दर केंद्र सरकारने जाहीर करावे व सर्व शेतकऱ्यांना कर्जमूक्ती द्यावी, असा ठराव महेश दुबे यांनी मांडला. त्याला जगन चांभारे यांनी अनुमोदन दिले. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कार्यक्रमासाठी महेश चांभारे, विजय अवचट, रामभाऊ खेळकर, आनंदराव पिदुरकर, आत्माराम कोळसे, बिजाराम नेहारे, भास्कर डवरे, घनश्याम डफ, रमाकांत वैरागडे, बाबाराव वैरागडे आदिंनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद नगराळे यांनी केले.