शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नमुने तपासणीसाठी मागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:07 IST

समुद्रपूरच्या ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरामध्ये असणारी उपविभागीय पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळा ही रामसभरोसे आहे. सदर प्रयोगशाळा ही फक्त एक शिपाई चालवित असल्याचे दिसून आले. समुद्रपूरमध्ये नगरपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ५ व ६ मध्ये पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाला दुर्गंधीयुक्त पिवळसर पाणी............

ठळक मुद्देशिपाईच अधीक्षक : पाणी तपासणी प्रयोगशाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : समुद्रपूरच्या ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरामध्ये असणारी उपविभागीय पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळा ही रामसभरोसे आहे. सदर प्रयोगशाळा ही फक्त एक शिपाई चालवित असल्याचे दिसून आले. समुद्रपूरमध्ये नगरपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ५ व ६ मध्ये पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाला दुर्गंधीयुक्त पिवळसर पाणी येत असल्याने सदर पाणी एका बॉटलमध्ये पॅक बंद करून पंचाच्या सह्या घेऊन सील करण्यात आले. त्याची माहिती नगरपंचायतला देवून हे पाणी पिण्या योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरिता स्थानिक उपविभागीय पाणी नमुने तपासणी प्रयोग शाळेत नागरिक पोहचले असता तेथे अधीक्षकांच्या खुर्चीमध्ये एकमेव शिपाई बसून दिसल्याचे आढळून आले.याबद्दल त्याला विचारणा केली असता सदर शिपायाने या तपासणी करीता पैसे लागते, असे सांगितले. या संदर्भात संबंधित कोणीही अधीक्षक,तंत्रज्ञ उपस्थित नसल्याने याबद्दची कोणाला तक्रार करावी हा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा सदर शिपायाला अधिकाऱ्याचे दुरध्वनी नंबर मागितले असता ते सुद्धा देण्यास टाळाटाळ केली.त्यानंतर त्याने काही वेळाने तंत्रज्ञ पोहणकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. त्यानुसार सदर तंत्रज्ञासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता रासायनिक तपासणी करीता सतराशे रूपये तर जैविक तपासणी करिता आठशे रूपये घेत असल्याचे सांगितले.नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याकरिता शाासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविल्या जाते. परिसरात स्वच्छता, पाणी स्वच्छता यावर शासन लाखो रूपये खर्च करते तर मग या तपासणीकरिता इतकी मोठी तपासणी फी कशाची याचा प्रश्न नागरिकांना पडला आहे.म्हणजेच अशा प्रकारचे कुठलेही पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याची तपासणी आता कुणाकडे करावी हा प्रश्न सुद्धा नागरिकांकडे उभा ठाकला आहे. म्हणजेच सदर विभाग हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा दिसून येत आहे.सदर विभाग अधीक्षक दोन तंत्रज्ञ व एक शिपाई असा कर्मचारी वर्ग असताना या ठिकाणी फक्त एक शिपाई प्रयोग शाळेचा कार्यभार सांभाळत असल्याचे दिसून येते.सदर विभाग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धा यांच्या अंतर्गत चालविला जात असून हा विभाग महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा स्वच्छता विभाग अंतर्गत येतो. मात्र दोन्ही विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या यंत्रणेत अनेक पदे रिक्त असून कंत्राटी कर्मचाºयांच्या भरोश्यावर काम चालविले जात आहे. त्यामुळे ते कधी कार्यालयात येतात कधी येतही नाही त्यामुळे नागरिकांना शिपाईच सांभाळून ेघेतो असा हा प्रकार आहे.पाण्याबाबत तक्रारीच्या संख्येत वाढशहरी, व ग्रामीण भागात नद्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. काही ठिकाणी फिल्टर प्लॅन्ट लावण्यात आले आहे. तर काही ठिकाणी पाण्यात तुरटी व ब्लिचींग पावडरचा वापर करून पाणी शुध्द केले जाते. अशी अवस्था आहे. ग्रामीण भागात अनेक गावात जुन्या पाईप लाईन आहेत. त्या जागोजागी फुटलेल्या आहेत. तेथून घाण पाणी पाईप मध्ये जाते या साºया प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होते.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण