शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

नमुने तपासणीसाठी मागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:07 IST

समुद्रपूरच्या ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरामध्ये असणारी उपविभागीय पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळा ही रामसभरोसे आहे. सदर प्रयोगशाळा ही फक्त एक शिपाई चालवित असल्याचे दिसून आले. समुद्रपूरमध्ये नगरपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ५ व ६ मध्ये पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाला दुर्गंधीयुक्त पिवळसर पाणी............

ठळक मुद्देशिपाईच अधीक्षक : पाणी तपासणी प्रयोगशाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : समुद्रपूरच्या ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरामध्ये असणारी उपविभागीय पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळा ही रामसभरोसे आहे. सदर प्रयोगशाळा ही फक्त एक शिपाई चालवित असल्याचे दिसून आले. समुद्रपूरमध्ये नगरपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ५ व ६ मध्ये पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाला दुर्गंधीयुक्त पिवळसर पाणी येत असल्याने सदर पाणी एका बॉटलमध्ये पॅक बंद करून पंचाच्या सह्या घेऊन सील करण्यात आले. त्याची माहिती नगरपंचायतला देवून हे पाणी पिण्या योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरिता स्थानिक उपविभागीय पाणी नमुने तपासणी प्रयोग शाळेत नागरिक पोहचले असता तेथे अधीक्षकांच्या खुर्चीमध्ये एकमेव शिपाई बसून दिसल्याचे आढळून आले.याबद्दल त्याला विचारणा केली असता सदर शिपायाने या तपासणी करीता पैसे लागते, असे सांगितले. या संदर्भात संबंधित कोणीही अधीक्षक,तंत्रज्ञ उपस्थित नसल्याने याबद्दची कोणाला तक्रार करावी हा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा सदर शिपायाला अधिकाऱ्याचे दुरध्वनी नंबर मागितले असता ते सुद्धा देण्यास टाळाटाळ केली.त्यानंतर त्याने काही वेळाने तंत्रज्ञ पोहणकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. त्यानुसार सदर तंत्रज्ञासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता रासायनिक तपासणी करीता सतराशे रूपये तर जैविक तपासणी करिता आठशे रूपये घेत असल्याचे सांगितले.नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याकरिता शाासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविल्या जाते. परिसरात स्वच्छता, पाणी स्वच्छता यावर शासन लाखो रूपये खर्च करते तर मग या तपासणीकरिता इतकी मोठी तपासणी फी कशाची याचा प्रश्न नागरिकांना पडला आहे.म्हणजेच अशा प्रकारचे कुठलेही पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याची तपासणी आता कुणाकडे करावी हा प्रश्न सुद्धा नागरिकांकडे उभा ठाकला आहे. म्हणजेच सदर विभाग हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा दिसून येत आहे.सदर विभाग अधीक्षक दोन तंत्रज्ञ व एक शिपाई असा कर्मचारी वर्ग असताना या ठिकाणी फक्त एक शिपाई प्रयोग शाळेचा कार्यभार सांभाळत असल्याचे दिसून येते.सदर विभाग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धा यांच्या अंतर्गत चालविला जात असून हा विभाग महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा स्वच्छता विभाग अंतर्गत येतो. मात्र दोन्ही विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या यंत्रणेत अनेक पदे रिक्त असून कंत्राटी कर्मचाºयांच्या भरोश्यावर काम चालविले जात आहे. त्यामुळे ते कधी कार्यालयात येतात कधी येतही नाही त्यामुळे नागरिकांना शिपाईच सांभाळून ेघेतो असा हा प्रकार आहे.पाण्याबाबत तक्रारीच्या संख्येत वाढशहरी, व ग्रामीण भागात नद्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. काही ठिकाणी फिल्टर प्लॅन्ट लावण्यात आले आहे. तर काही ठिकाणी पाण्यात तुरटी व ब्लिचींग पावडरचा वापर करून पाणी शुध्द केले जाते. अशी अवस्था आहे. ग्रामीण भागात अनेक गावात जुन्या पाईप लाईन आहेत. त्या जागोजागी फुटलेल्या आहेत. तेथून घाण पाणी पाईप मध्ये जाते या साºया प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होते.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण