शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आष्टीचे ग्रामीण रूग्णालय कागदोपत्री झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:18 IST

शहरात दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेले ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक नागपूर यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. वास्तविक, सर्व कागदोपत्री दिसून येत आहे. यंत्रसामुग्री नाही, डॉक्टर नाही, औषध नाही, सर्व सुविधा नाहीच.

ठळक मुद्देयंत्रसामुग्री व डॉक्टरांचा पत्ताच नाही : कर्मचाºयांना बसण्यासाठी खुर्च्यांचाही अभावच

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : शहरात दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेले ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक नागपूर यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. वास्तविक, सर्व कागदोपत्री दिसून येत आहे. यंत्रसामुग्री नाही, डॉक्टर नाही, औषध नाही, सर्व सुविधा नाहीच. या नाहीच्या पाढ्याला होकारात बदलण्यात शासकीय अधिकाºयांनी बाजी मारल्याचेच दिसून येत आहे.सध्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीतून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. याप्रकरणी आष्टीकरांनी वारंवार तक्रारी केल्या. तेव्हा विधानसभेत आ. अमर काळे यांनी आरोग्यमंत्र्यांना जाब विचारला. यावर सहा महिन्यांत ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले. यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या आस्थापनेकरिता २ डॉक्टर, ६ नर्स, १ ब्रदर अशी ९ कर्मचारी आष्टीला पाठविण्यात आले आहेत. त्यांना बसायला फर्निचर नाही. तपासणीची यंत्रसामुग्री नाही. आलेले डॉक्टरही वर्धेला सेवा देत आहेत. अशा स्थितीत येथील ग्रामीण रुग्णालय कागदोपत्री सुरू झाल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे.योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. मानवी दृष्टीकोन ठेवून आरोग्यमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा इशारा अंतोरा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश ठाकरे, डॉ. नरेंद्र देशमुख, गजानन आंबेकर, दिनेश मानकर यांनी दिला आहे.मागील वर्षी उपचारांअभावी १५ रुग्णांचे गेले प्राणमागील वर्षी १५ जणांचा विविध कारणांमुळे उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. आष्टी शहरापासून वर्धा ८५ किमी, नागपूर ११५ किमी तर अमरावती ७२ किमी आहे. या ठिकाणी उपचारासाठी जाताना विलंब होतो. रुग्ण वेळेवर पोहोचू शकत नसल्याने त्यांची प्राणांशी गाठ असते. शिवाय रुग्णवाहिकेची सुविधा नाही. यामुळे रुग्णांचा बळी जात असल्याचे वास्तव आहे.आष्टी येथील ग्रमीण रुग्णालय १ डिसेंबर २०१७ पासून सुरू झाले आहे. कर्मचारी व डॉक्टर दिले आहे. औषध, यंत्रसामुग्री व बेडची व्यव्स्था लवकरच देण्यात येईल. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे.- डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.