शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

आष्टी नगरपंचायतचा कारभार ढेपाळला

By admin | Updated: April 28, 2017 02:04 IST

नगरपंचायतचा कारभार ढेपाळल्याने येथे प्रशासकाची नेमणूक करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

निधीही खितपत : विषय समितीची सभाच घेतली नाही आष्टी (शहीद) : नगरपंचायतचा कारभार ढेपाळल्याने येथे प्रशासकाची नेमणूक करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कराण गत सहा महिन्यांत विषय समितीची येथे एकही सभा झाली नाही. विकासकामाकरिता आलेला ४.५ कोटींचा निधी दोन वर्षांपासून पडून आहे. याला खर्च करण्याचे सौजन्य नगरपंचायतचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी दाखवत नसल्याने या प्रकाराविषयी नागरिक संताप व्यक्त करीत आहे. आष्टी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले. यानंतर आष्टीचा विकास होईल, असे स्वप्न नागरिकांनी पाहिले. मात्र ग्रामपंचायतच बरी अशी म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. येथे विविध समस्यांनी उग्र रूप धारण केले असताना समस्या सोडविण्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतदान करून शहरवासियांनी विकास करण्याची चाबी दिली. मात्र निवडणुकीपासून आतापर्यंत केवळ तोंड गप्प करून कारभार हाकणे सुरू आहे. यामुळे आष्टीकर संतप्त आहेत. येथे काँग्रेसचे १२, भाजपाचे ६ असे एकूण १८ नगरसेवक आहे. आतापर्यंत झालेल्या सभेत एकमेकांवर निव्वळ आरोप प्रत्यारोप एवढाच उद्योग सुरू आहे. त्यामुळे विकासकामांना येथे खिळ बसल्याचे चित्र आहे. रस्ता अनुदान अंतर्गत सन २०१५-१६ चे २० लक्ष, सन २०१६-१७ चे २० लक्ष असा एकूण ४० लक्ष रूपये निधी प्राप्त झाला. त्यामधून विकासकामे करण्याचा ठराव अद्यापही मंजूर झालेला नाही. त्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या नाही. एकमेकाकडे बोट दाखवून दिवस काढण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप नागरिक करीत आहे. येथील सांडपाण्याच्या नाल्या बुजल्या आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. सार्वजनिक विहिरीमध्ये ब्लिचींग पावडर टाकलेले नाही. त्यामुळे जनारोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पथदिवे नाही. या समस्या मार्गी लावण्याचे सोडून आरोप करण्यात येथील पदाधिकारी मग्न असल्याचे दिसते. त्यामुळे विकासाचा बट्टयाबोळ वाजलिा आहे. सहा महिन्यांपासून सभा नाही, ठराव नाही यासाठी नगराध्यक्ष मीरा येणूरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. तर मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी ठराव करण्याचे काम नगराध्यक्ष व नगरसेवकाचे असते. त्यामुळे कामाच्या ई-निविदा करूच शकत नाही, असे सांगितले. यासर्व गोंधळात येथील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसत आहे. येथे मनमानी कारभार सुरू आहे. येथे कर्तव्यदक्ष अधिकारी देण्याची मागणी आहे. नागरिकांनी समस्या सोडविण्यासाठी कुणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील विकासकामांना गती देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) विकास कामांच्या ठरावाला मंजुरीची प्रतीक्षा दलित वस्ती विकास योजनेतून २० लक्ष मंजूर झाले. सन २०१५-१६ चा हा निधी खर्च झालेला नाही. तसेच १४ व्या वित्त आयोगामधून घनकचरा व्यवस्थापनाकरिता १ कोटी २५ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले. त्याचेही नियोजन झालेले नाही. नगरपंचायत ठेव निधीमध्ये २ कोटी वर्षभरापासून पडून आहे. या सर्व कामांना मार्गी लावण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. येथे विविध समस्यांनी डोके वर काढेले असताना याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सभा घेत नाही, सभा झालीच तर केवळ गोंधळाच्या वातावरणात पार पडते त्यामुळे महत्त्वाचे निर्णय होत नाही.