शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

आचारसंहिता उठताच भूमिपूजनांना आला वेग

By रवींद्र चांदेकर | Updated: June 8, 2024 18:35 IST

तीन महिन्यांनी दिलासा : आता विकासकामांची लगीनघाई सुरू

वर्धा : लोकसभा निवडणुकीची १६ मार्चला घोषणा होताच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. दोन महिने आणि २१ दिवसांच्या कालावधीनंतर ६ जूनला आचारसंहिता संपुष्टात येताच जिल्ह्यात भूमिपूजनांना वेग आला आहे. जवळपास पावणेतीन महिने रखडलेली विकासकामे आता सुरू होत आहेत.

गेले तीन महिने देशात लोकसभा निवडणुकीची धूम सुरू होती. निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा केली होती. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे विकासकामांना ‘ब्रेक’ लागला होता. लोकसभा निवडणूक आटोपताच आयोगाने ६ जूनला आचारसंहिता संपुष्टात आणली. आचारसंहिता संपुष्टात आल्याचे कळताच जिल्ह्यात पुन्हा विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सुरू झाला आहे. रखडलेली विकासकामे आता वेगाने होऊ लागली आहेत. किमान भूमिपूजन सुरू झाले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत ही कामे पूर्णत्वास जाणार की नाही, याबाबत मात्र साशंकता आहे. तरीही विकासकामांची लगीनघाई सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे १६ मार्च ते ६ जून दरम्यान तब्बल दोन महिने २१ दिवस संभाव्य विकासकामे थांबली होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरू झालेली कामे सुरूच होती. आता नवीन विकासकामांचा श्रीगणेशा केला जात आहे. गेल्या दोन दिवसांतच जिल्ह्यात कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आता पुढील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनेक विकासकामांचा सपाटा सुरू राहणार आहे. जागोजागी लोकप्रतिनिधींच्या नावांचे फलकही लागणार आहेत. जनतेला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत दुरावलेले मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी विकासकामांचा डोस दिला जाणार आहे. विशेषत: ज्या मतदारसंघात मतदारांनी विरोधी कौल दिला, तेथील आमदार आता सजग होण्याची शक्यता आहे.

विधानसभेची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीत सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत मतदारांनी सत्ताधारी उमेदवाराला चीत केले. केवळ एका मतदारसंघात त्यांना लीड दिली. सत्ताधारी उमेदवाराला चीत केलेल्या पाचपैकी चार मतदारसंघांत त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत. या आमदारांना आता पुढील विधानसभा निवडणुकीची चिंता सतावत आहे. लोकसभेत विरोधी कौल देणाऱ्या मतदारांना आपल्याकडे परत कसे खेचता येईल, अशी हुरहूर त्यांना लागली आहे. त्यासाठी पुढील तीन महिन्यांत त्यांना विकासकामांचा सपाटा सुरू ठेवावा लागणार आहे. यातूनच त्यांना विधानसभेची तयारी करावी लागणार आहे.ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची शक्यता

येत्या नोव्हेंबरमध्ये राज्यातील विधानसभेची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोग संभाव्य तारखांची जुळवाजुळव करणार आहे. बहुधा ऑक्टोबरच्या दुसऱ्या मध्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामांसाठी आता केवळ तीन ते सव्वातीन महिने उरले आहेत. या सव्वातीन महिन्यांत विरोधी कौल दिलेल्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, हे पुढील काळात दिसणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा