शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

आचारसंहिता उठताच भूमिपूजनांना आला वेग

By रवींद्र चांदेकर | Updated: June 8, 2024 18:35 IST

तीन महिन्यांनी दिलासा : आता विकासकामांची लगीनघाई सुरू

वर्धा : लोकसभा निवडणुकीची १६ मार्चला घोषणा होताच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. दोन महिने आणि २१ दिवसांच्या कालावधीनंतर ६ जूनला आचारसंहिता संपुष्टात येताच जिल्ह्यात भूमिपूजनांना वेग आला आहे. जवळपास पावणेतीन महिने रखडलेली विकासकामे आता सुरू होत आहेत.

गेले तीन महिने देशात लोकसभा निवडणुकीची धूम सुरू होती. निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा केली होती. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे विकासकामांना ‘ब्रेक’ लागला होता. लोकसभा निवडणूक आटोपताच आयोगाने ६ जूनला आचारसंहिता संपुष्टात आणली. आचारसंहिता संपुष्टात आल्याचे कळताच जिल्ह्यात पुन्हा विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सुरू झाला आहे. रखडलेली विकासकामे आता वेगाने होऊ लागली आहेत. किमान भूमिपूजन सुरू झाले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत ही कामे पूर्णत्वास जाणार की नाही, याबाबत मात्र साशंकता आहे. तरीही विकासकामांची लगीनघाई सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे १६ मार्च ते ६ जून दरम्यान तब्बल दोन महिने २१ दिवस संभाव्य विकासकामे थांबली होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरू झालेली कामे सुरूच होती. आता नवीन विकासकामांचा श्रीगणेशा केला जात आहे. गेल्या दोन दिवसांतच जिल्ह्यात कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आता पुढील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनेक विकासकामांचा सपाटा सुरू राहणार आहे. जागोजागी लोकप्रतिनिधींच्या नावांचे फलकही लागणार आहेत. जनतेला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत दुरावलेले मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी विकासकामांचा डोस दिला जाणार आहे. विशेषत: ज्या मतदारसंघात मतदारांनी विरोधी कौल दिला, तेथील आमदार आता सजग होण्याची शक्यता आहे.

विधानसभेची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीत सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत मतदारांनी सत्ताधारी उमेदवाराला चीत केले. केवळ एका मतदारसंघात त्यांना लीड दिली. सत्ताधारी उमेदवाराला चीत केलेल्या पाचपैकी चार मतदारसंघांत त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत. या आमदारांना आता पुढील विधानसभा निवडणुकीची चिंता सतावत आहे. लोकसभेत विरोधी कौल देणाऱ्या मतदारांना आपल्याकडे परत कसे खेचता येईल, अशी हुरहूर त्यांना लागली आहे. त्यासाठी पुढील तीन महिन्यांत त्यांना विकासकामांचा सपाटा सुरू ठेवावा लागणार आहे. यातूनच त्यांना विधानसभेची तयारी करावी लागणार आहे.ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची शक्यता

येत्या नोव्हेंबरमध्ये राज्यातील विधानसभेची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोग संभाव्य तारखांची जुळवाजुळव करणार आहे. बहुधा ऑक्टोबरच्या दुसऱ्या मध्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामांसाठी आता केवळ तीन ते सव्वातीन महिने उरले आहेत. या सव्वातीन महिन्यांत विरोधी कौल दिलेल्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, हे पुढील काळात दिसणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा