शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

आचारसंहिता उठताच भूमिपूजनांना आला वेग

By रवींद्र चांदेकर | Updated: June 8, 2024 18:35 IST

तीन महिन्यांनी दिलासा : आता विकासकामांची लगीनघाई सुरू

वर्धा : लोकसभा निवडणुकीची १६ मार्चला घोषणा होताच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. दोन महिने आणि २१ दिवसांच्या कालावधीनंतर ६ जूनला आचारसंहिता संपुष्टात येताच जिल्ह्यात भूमिपूजनांना वेग आला आहे. जवळपास पावणेतीन महिने रखडलेली विकासकामे आता सुरू होत आहेत.

गेले तीन महिने देशात लोकसभा निवडणुकीची धूम सुरू होती. निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा केली होती. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे विकासकामांना ‘ब्रेक’ लागला होता. लोकसभा निवडणूक आटोपताच आयोगाने ६ जूनला आचारसंहिता संपुष्टात आणली. आचारसंहिता संपुष्टात आल्याचे कळताच जिल्ह्यात पुन्हा विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सुरू झाला आहे. रखडलेली विकासकामे आता वेगाने होऊ लागली आहेत. किमान भूमिपूजन सुरू झाले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत ही कामे पूर्णत्वास जाणार की नाही, याबाबत मात्र साशंकता आहे. तरीही विकासकामांची लगीनघाई सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे १६ मार्च ते ६ जून दरम्यान तब्बल दोन महिने २१ दिवस संभाव्य विकासकामे थांबली होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरू झालेली कामे सुरूच होती. आता नवीन विकासकामांचा श्रीगणेशा केला जात आहे. गेल्या दोन दिवसांतच जिल्ह्यात कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आता पुढील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनेक विकासकामांचा सपाटा सुरू राहणार आहे. जागोजागी लोकप्रतिनिधींच्या नावांचे फलकही लागणार आहेत. जनतेला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत दुरावलेले मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी विकासकामांचा डोस दिला जाणार आहे. विशेषत: ज्या मतदारसंघात मतदारांनी विरोधी कौल दिला, तेथील आमदार आता सजग होण्याची शक्यता आहे.

विधानसभेची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीत सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत मतदारांनी सत्ताधारी उमेदवाराला चीत केले. केवळ एका मतदारसंघात त्यांना लीड दिली. सत्ताधारी उमेदवाराला चीत केलेल्या पाचपैकी चार मतदारसंघांत त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत. या आमदारांना आता पुढील विधानसभा निवडणुकीची चिंता सतावत आहे. लोकसभेत विरोधी कौल देणाऱ्या मतदारांना आपल्याकडे परत कसे खेचता येईल, अशी हुरहूर त्यांना लागली आहे. त्यासाठी पुढील तीन महिन्यांत त्यांना विकासकामांचा सपाटा सुरू ठेवावा लागणार आहे. यातूनच त्यांना विधानसभेची तयारी करावी लागणार आहे.ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची शक्यता

येत्या नोव्हेंबरमध्ये राज्यातील विधानसभेची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोग संभाव्य तारखांची जुळवाजुळव करणार आहे. बहुधा ऑक्टोबरच्या दुसऱ्या मध्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामांसाठी आता केवळ तीन ते सव्वातीन महिने उरले आहेत. या सव्वातीन महिन्यांत विरोधी कौल दिलेल्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, हे पुढील काळात दिसणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा