शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

आर्वी मार्ग उठलाय नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:40 IST

शहरातून आर्वीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणा ठरत आहे. मात्र, संबंधितांना सोयरसुतक नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांतून होत आहे.

ठळक मुद्देभुयारी गटाराचे खड्डे कायमच । अपघाताची शक्यता बळावली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातून आर्वीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणा ठरत आहे. मात्र, संबंधितांना सोयरसुतक नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांतून होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनापाणी चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकामाला मंजुरी मिळाली. या रस्त्यावर तब्बल ३५ कोटी रुपये खर्ची घातले जात आहे. मात्र, रस्ता बांधकाम नियोजनाच्या अभावातच पूर्णत्वास जात आहे. रस्त्याचे बांधकाम करण्यापूर्वी भुयारी गटार योजनेकरिता खड्डे तयार करण्यात आले. यानंतर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे एका बाजूने बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, भुयारी गटार योजनेचे खड्डेच बुजविण्यात आले नाही. हे खड्डे रात्रीच्या सुमारास वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नसल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. खड्डयाजवळ गेल्यानंतर वाहनचालकांना एकाएकी दिसत असल्याने ते ब्रेक लावतात. यात अपघात होत आहेत. या मार्गावरून जाताना वाहनचालकांना सर्कसच करावी लागत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित कंत्राटदाराने फलक लावण्याची गरज असताना तेही लावण्यात आले नाही. आर्वी नाका चौक परिसरात शिकवणी वर्ग असल्याने सायंकाळी रस्ता गर्दीने फुललेला असतो. खड्डयांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोठा अपघात होण्यापूर्वी खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.पानटपरीचालकांचे अतिक्रमणआर्वी नाका परिसतरात अनेक व्यावसायिकांकडून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. पानठेलेचालक ठेल्यातील साहित्य रस्त्यावर थाटतात. पानटपरीवर येणारे ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने बेशिस्तपणे उभी करतात. येथे वाहतूक पोलीस तैनात असतात. त्यांचेही या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळेही अपघाताचा धोका आहे