शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

आर्वी मार्ग उठलाय नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:40 IST

शहरातून आर्वीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणा ठरत आहे. मात्र, संबंधितांना सोयरसुतक नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांतून होत आहे.

ठळक मुद्देभुयारी गटाराचे खड्डे कायमच । अपघाताची शक्यता बळावली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातून आर्वीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणा ठरत आहे. मात्र, संबंधितांना सोयरसुतक नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांतून होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनापाणी चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकामाला मंजुरी मिळाली. या रस्त्यावर तब्बल ३५ कोटी रुपये खर्ची घातले जात आहे. मात्र, रस्ता बांधकाम नियोजनाच्या अभावातच पूर्णत्वास जात आहे. रस्त्याचे बांधकाम करण्यापूर्वी भुयारी गटार योजनेकरिता खड्डे तयार करण्यात आले. यानंतर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे एका बाजूने बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, भुयारी गटार योजनेचे खड्डेच बुजविण्यात आले नाही. हे खड्डे रात्रीच्या सुमारास वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नसल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. खड्डयाजवळ गेल्यानंतर वाहनचालकांना एकाएकी दिसत असल्याने ते ब्रेक लावतात. यात अपघात होत आहेत. या मार्गावरून जाताना वाहनचालकांना सर्कसच करावी लागत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित कंत्राटदाराने फलक लावण्याची गरज असताना तेही लावण्यात आले नाही. आर्वी नाका चौक परिसरात शिकवणी वर्ग असल्याने सायंकाळी रस्ता गर्दीने फुललेला असतो. खड्डयांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोठा अपघात होण्यापूर्वी खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.पानटपरीचालकांचे अतिक्रमणआर्वी नाका परिसतरात अनेक व्यावसायिकांकडून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. पानठेलेचालक ठेल्यातील साहित्य रस्त्यावर थाटतात. पानटपरीवर येणारे ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने बेशिस्तपणे उभी करतात. येथे वाहतूक पोलीस तैनात असतात. त्यांचेही या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळेही अपघाताचा धोका आहे