शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा उभ्या असतात, तर  वाहनतळाअभावी दुकानासमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने असंतुलित होत अपघात होतात.

ठळक मुद्देअतिक्रमणाचा विळखा : पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : दुचाकी-चारचाकी वाहनांची वाढती संख्या, अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, वाहनतळाचा अभाव आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा उभ्या असतात, तर  वाहनतळाअभावी दुकानासमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने असंतुलित होत अपघात होतात. वाहन चालवताना अनेक अडथळे पार करीत  वाहनधारकांना अमरावतीकडे कसेबसे जावे लागत आहे. शहरातील अनेक ठिकाणे अपघातप्रवण  स्थळ झाले आहे. बस स्थानक तसेच इलायची कार्यालयासमोर ऑटोरिक्षा, काळी-पिवळी व ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले जात असल्याने वाहनचालकाला मुख्य रस्त्यावरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे नेहमी अपघात होतात. पोलीस विभाग, नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी नागरिकांची मागणी  आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी