शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

आर्वी-देऊरवाडा मार्ग झाला अपघातप्रवण स्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:26 IST

आर्वी-देऊरवाडा या मार्गाची दुर्दशा झाल्याने या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झाले आहे. मार्गावरील खड्डाराज पाहून हा मार्ग अपघातप्रवन स्थळ झाल्याची ओरड परिसरातील वाहनचालक करीत आहे.

ठळक मुद्देखड्डाराज : रस्त्याची चाळणी झाल्याने वाढला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्वी-देऊरवाडा या मार्गाची दुर्दशा झाल्याने या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झाले आहे. मार्गावरील खड्डाराज पाहून हा मार्ग अपघातप्रवन स्थळ झाल्याची ओरड परिसरातील वाहनचालक करीत आहे.आर्वी ते देऊरवाडा हा सहा किलो मीटरचा रस्ता असून हा अमरावती जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावरुन दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आर्वी परिवहन विभागाच्या जवळपास ३२ फेऱ्या या रस्त्यावरून रोज धावतात. तसेच आर्वीला येणाºया तालुक्यातील १० ते १२ गावातील नागरिकांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. विशेष म्हणजे याच मार्गावर आर्वीचे शासकीय तंत्रनिकेतन, चार गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच रूख्मिणीचे प्रसिद्ध मंदिर कौंडण्यपूर येथे असल्याने कौडण्यपुरला जाण्यासाठी हाच मार्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भक्त याच मार्गाने कौडण्यपुरला जातात. इतका महत्वाचा व वर्दळीचा असलेला हा रस्ता आता खड्ड्यात गेल्याने वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. मागील महिन्याभरात अनेक अपघात या मार्गावर झाले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग अद्यापही डोळे मिटून आहे. त्यामुळे अपघाचे प्रमाण लक्षात घेता तात्काळ या रस्त्याची दुुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.आर्वी-देऊरवाडा हा आर्वी तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने याची तातडीने दुरूस्ती संबंधित विभागाने करावी, अन्यथा या विरूद्ध तिव्र आंदोलन करण्यात येईल.- दिलीप पोटफोडेअध्यक्ष, आर्वी विधानसभा क्षेत्र युवा स्वाभिमान पक्ष