शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

आर्वी-देऊरवाडा मार्ग झाला अपघातप्रवण स्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:26 IST

आर्वी-देऊरवाडा या मार्गाची दुर्दशा झाल्याने या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झाले आहे. मार्गावरील खड्डाराज पाहून हा मार्ग अपघातप्रवन स्थळ झाल्याची ओरड परिसरातील वाहनचालक करीत आहे.

ठळक मुद्देखड्डाराज : रस्त्याची चाळणी झाल्याने वाढला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्वी-देऊरवाडा या मार्गाची दुर्दशा झाल्याने या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झाले आहे. मार्गावरील खड्डाराज पाहून हा मार्ग अपघातप्रवन स्थळ झाल्याची ओरड परिसरातील वाहनचालक करीत आहे.आर्वी ते देऊरवाडा हा सहा किलो मीटरचा रस्ता असून हा अमरावती जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावरुन दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आर्वी परिवहन विभागाच्या जवळपास ३२ फेऱ्या या रस्त्यावरून रोज धावतात. तसेच आर्वीला येणाºया तालुक्यातील १० ते १२ गावातील नागरिकांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. विशेष म्हणजे याच मार्गावर आर्वीचे शासकीय तंत्रनिकेतन, चार गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच रूख्मिणीचे प्रसिद्ध मंदिर कौंडण्यपूर येथे असल्याने कौडण्यपुरला जाण्यासाठी हाच मार्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भक्त याच मार्गाने कौडण्यपुरला जातात. इतका महत्वाचा व वर्दळीचा असलेला हा रस्ता आता खड्ड्यात गेल्याने वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. मागील महिन्याभरात अनेक अपघात या मार्गावर झाले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग अद्यापही डोळे मिटून आहे. त्यामुळे अपघाचे प्रमाण लक्षात घेता तात्काळ या रस्त्याची दुुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.आर्वी-देऊरवाडा हा आर्वी तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने याची तातडीने दुरूस्ती संबंधित विभागाने करावी, अन्यथा या विरूद्ध तिव्र आंदोलन करण्यात येईल.- दिलीप पोटफोडेअध्यक्ष, आर्वी विधानसभा क्षेत्र युवा स्वाभिमान पक्ष