शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी आगाराच्या बसगाड्या रिमोल्ड टायरवरच

By admin | Updated: August 3, 2016 01:04 IST

सातत्याने मागणी करूनही गत १५ दिवसांपासून विभागीय कार्यालयातून आर्वी आगाराला नवीन टायर प्राप्त झाले नाही.

१५ दिवसांपासून टायरचा पुरवठा नाही : गाड्या रस्त्यात कुठेही पडतात बंद आर्वी : सातत्याने मागणी करूनही गत १५ दिवसांपासून विभागीय कार्यालयातून आर्वी आगाराला नवीन टायर प्राप्त झाले नाही. यामुळे येथील बसगाड्या रिमोल्ड टायरवरच धावत आहेत. परिणामी या नवीन संकटाने चालक व वाहकही त्रस्त झाले आहेत. या बसेच रस्त्यात कुठेही बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांच्या जिविताशीच परिवहन विभागाचा सध्या खेळ सुरू आहे. आर्वी उपविभागाचे ठिकाण आहे. येथील परिवहन विभागाकडून करण्यात येत असलेल्या मागणीनुसार नेहमीच कमी टायर मिळाले आहे. परिवहन महामंडळाच्या गाड्यांचे वर्षातून दोन वेळी टायर बदलविणे अपेक्षित आहे. येथे एक वर्षाच्यावर काळ होऊनही टायर मिळाले नाही. गाड्यांच्या टायरचे आयुष्य संपुनही त्यावरच गाड्या धावत आहे. परिणामी यात वेळेवर गाड्यांचे शेड्युल रद्द होते. चालक-वाहक या रोजच्या टायर अभावी बंद पडणाऱ्या गाड्याने त्रस्त झाले आहेत. आर्वी बसस्थानक प्रमुखाने विभागीय कार्यालयाला टायर पुरवठ्याची तातडीने मागणी करूनही अद्याप पुरवठा केला नसल्याने चालक वाहकासमोर नव्या समस्या निर्माण होत आहे. सध्या आर्वी परिवहन विभागाच्या सर्व गाड्या रिमोल्ड टायरवर धावत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यात एका गावाला जाणाऱ्या पाच ते सहा शेड्युल नियमित जात असेल तर ते अर्ध्यावर आल्याने प्रवाशांची बसअभावी ताटकळत होत आहे. यावर तातडीने उपाय काढून परिवहन मंडळाने प्रवाशांच्या जीवितांशी सुरू असलेला खेळ तातडीने थांबविण्याची मागणी होत आहे. सध्या टायर अभावी भंगार अवस्थेत गाड्या परिवहन विभागात उभ्या असून याचा फटका परिवहन महामंडळाला बसत असल्याची ओरड होत आहे.(तालुका प्रतिनिधी)