शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

रस्ता की कृत्रिम तलाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:16 IST

येथून सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या जुन्या मार्गाची दैनावस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करताना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असाच प्रश्न वाहनचालकांना पडतो.

ठळक मुद्देसेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथून सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या जुन्या मार्गाची दैनावस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करताना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असाच प्रश्न वाहनचालकांना पडतो. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला नाली नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात सदर रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. परिणामी, साधे पायी ये-जा करणेही कठीण होते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.वर्धा शहरातील नागरिकांना सेवाग्राम रेल्वे स्थानक गाठण्यासाठी इतवारा पोलीस चौकी होत जाणारा जुना मार्ग सोयीचा तसेच कमी अंतराचाच आहे. परिणामी, अनेक आॅटो चालक व दुचाकी चालक याच मार्गाने सेवाग्राम रेल्वे स्थानक गाठतात. परंतु, सध्या या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्यावरील डांबर पूर्णत: उखडले आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाºयांना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. वर्धा शहरातील इतवारा चौक येथून पोलीस चौकी पर्यंतचा रस्ता काही प्रमाणात बरा आहे; पण स्मशानभूमिच्या विसाव्या नंतर वाहनचालकांना तारेवरची कसरतच खड्डे चुकविण्यासाठी करावी लागते. या मार्गावर खड्डे चुकविताना वाहन अनियंत्रित होऊन दररोज छोटे-मोठे अपघात होतात. मात्र, अनेक प्रकरणे पोलीस कचेरीपर्यंत पोहोचत नाहीत. बहूदा रस्त्याच्या दैनावस्थेमुळे वाहन पंक्चरही होते. परिणामी, वाहनचालकांना अर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. जून महिन्याच्या दुसºया आठवड्यात झालेल्या पावसाचे पाणी अजुनही नाली अभावी वाहून गेले नाही. त्यामुळे या रस्त्याला सध्या तळ्याचे स्वरूप आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती व पक्की नाली तयार करण्याची मागणी आहे.रस्त्याच्या कडेला नाली तयार करणे गरजेचेसेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गावर पावसाळ्याच्या दिवसात नाली अभावी पावसाचे पाणी साचते. परिणामी, या मार्गाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तळ्याचे स्वरूप येते. पावसाचे पाणी रस्त्यावर साचू नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा पक्की नाली तयार करणे गरजेचे आहे, तशी मागणीही वाहनचालकांसह नागरिकांची आहे.मोठ्या अपघाताची भीतीसेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.