शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

५०२ आंदोलकांची अटक व सुटका

By admin | Updated: January 20, 2016 03:28 IST

कामगार, शेतकरी, महिलांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता सेंट्रल फॉर ट्रेड युनियन, किसान सभा, शेतमजूर युनियन व

वर्धा : कामगार, शेतकरी, महिलांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता सेंट्रल फॉर ट्रेड युनियन, किसान सभा, शेतमजूर युनियन व जनवादी महिला संघटनेच्यावतीने मंगळवारी राज्यस्तरीय जेलभरो आंदोलन करण्यात आले. मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचलेल्या ५०२ आंदोलकांना पोलिसांनी अटक करीत सुटका केली. सिटूच्या विठ्ठल मंदिर येथील कार्यालयातून निघालेला मोर्चा बजाज चौक, डॉ. आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला. पोलिसांनी न्यायालय परिसरात मोर्चा अडविला. यावेळी झालेल्या सभेत यशवंत झाडे, महेश दुबे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चार वाहनांमध्ये ३५० महिला आणि १५२ पुरूष अशा ५०२ आंदोलकांना अटक केली. शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली. मोर्चा तसेच जेलभरो आंदोलनाकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ५० ते ६० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. आंदोलकांच्या अटकेची व्यवस्था करण्यासाठी चार वाहनेही उपलब्ध करण्यात आली होती. शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त केला.शेतमालाला स्वामीनाथन कमीशनप्रमाणे उत्पादन खर्च व त्या प्रमाणात ५० टक्के नफा जोडून हमीदर जाहीर करावे, ते दर बाजारपेठेत मिळतील, अशी व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीसाठी मागणीनंतर आठ दिवसांत वीज जोडणी मिळावी. जिल्ह्यातील अपूरे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांच्या वीज-पाणी-रस्ते, निर्वाह भत्ता, पर्यायी जमीन या गरजा पूर्ण कराव्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्वरित सुरू करावी. प्रत्येक उद्योगातील असंघटीत कामगारांना किमान वेतन मिळावे. कामाचे आठ तास करावे. असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य स्त्री परिचर, शालेय पोषण आहार आदी कामगार कायद्यातील मालकधार्जीने बदल रद्द करावे. घर तसेच इमारत बांधकाम कामगारांचे प्रश्न त्वरित निकाली काढावे. पाटबंधारे कामगारांच्या समस्या सोडवाव्या, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.(कार्यालय प्रतिनिधी)४शेतमजुरांकरिता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. त्यांची नोंदणी शासनाकडे करून सुविधा देण्यात याव्या. प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करावीत आणि शेतमजुरांना ३०० रुपये मजुरी देण्यात यावी. महिलांवरील अत्याचारांना लगाम लावावा. राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात येऊन अवैध दारूविक्रीला मदत करणाऱ्या ठाणेदार, जमादारावर कारवाई करावी, अन्न सुरक्षा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. धान्याच्या मोबदल्यात रोख सबसीडीऐवजी धान्य द्यावे, आदी मागण्या मोर्चा व आंदोलनाद्वारे लावून धरण्यात आल्यात.४केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ राज्यभर आयोजित केलेल्या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासन सज्ज होते; पण शहरातील आंदोलन शांततेत पार पडले. दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करीत निघालेल्या मोर्चात महिलांचा समावेश अधिक होता.४गोरगरीब, शेतकरी, सामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्तेत आलेल्या केंद्र व राज्य शासनाने अद्याप कुठलेही धोरणात्मक निर्णय घेतले नाही. होत्या त्या योजनांनाही कात्री लावली. यामुळे शेतकरी, मजूर, कामगार, महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला.