शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

शहरात ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:43 IST

नगर परिषद क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी नगर परिषद क्षेत्रातील सर्व मोकळ्या जागाचे सर्वेक्षण करून नाममात्र शुल्कासहीत वाहनतळाची व्यवस्था करावी,.....

ठळक मुद्देरामदास तडस : रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक

ऑनलाईन लोकमतवर्धा : नगर परिषद क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी नगर परिषद क्षेत्रातील सर्व मोकळ्या जागाचे सर्वेक्षण करून नाममात्र शुल्कासहीत वाहनतळाची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हा सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार रामदास तडस यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., नगराध्यक्ष अतुल तराळे, आर्वीचे उपविभागीय महसूल अधिकारी प्रकाश शर्मा, हिंगणघाटचे समाधान शेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, समितीचे सदस्य सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, प्रणव जोशी, आॅटोचालक संघटनेचे देवा निखाडे, डिलर असोसिएशनचे राठी, व्यापारी असोसिएशनचे काशीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.वाहतूकीच्या नियमाचे पालन आणि सुरक्षित वाहन चालविण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह प्रभावीपणे राबवावा. या सप्ताहात लोकांना विविध माध्यमांद्वारे माहिती देत जनजागृती करावी. जिल्ह्यातील आॅटो चालकांना ई-रिक्षा चालविण्याबाबत प्रोत्साहित करावे. सेवाग्राम रेल्वे स्टेशन ते वर्धा शहर व बसस्थानक ते वर्धा शहर प्रिपेड आॅटो प्रणाली सुरू करावी, असेही याप्रसंगी खा. रामदास तडस म्हणाले.ई-रिक्षा चार्जिंगसाठी सोलर चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येईल. आॅटो चालकांनी ई-रिक्षा घेतल्यास त्यांना नि:शुल्क चार्जिंग करू देण्यात येईल. रस्ता निधीमधून ५ टक्के निधी हा शहरातील पी-१, पी-२ पार्कींग प्रतिबंधीत रस्ता, एकेरी मार्ग याचे फलक उभारणे व गतिरोधक उभारण्यासाठी खर्च करावे, अशा सूचना बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात. आॅटो चालकांनी मीटर लावणे अनिवार्य आहे. शासन नियमाप्रमाणे दर आकारण्यास आॅटो चालकांना बाध्य करावे. मीटर न लावणाºया आॅटो चालकांचे परवाने रद्द करावे, असे स्पष्ट निर्देशही जिल्हाधिकाºयांनी परिवहन विभागाला दिलेत. महामार्गावर हॉटेल आणि धाब्याच्या ठिकाणी ट्रकचालक ट्रक उभे करतात. बहूदा ते रस्त्यावरच वाहन उभे करतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. यासाठी सालोड हिरापूर येथे ट्रक टर्मिनल तयार ूूूूूकरण्याच्या सूचना सुद्धा जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यात राज्य महामार्गाची संख्या वाढल्यामुळे पोलीस चौकी उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे यावेळी प्रणव जोशी यांनी सांगितले.