शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

शहरात ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:43 IST

नगर परिषद क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी नगर परिषद क्षेत्रातील सर्व मोकळ्या जागाचे सर्वेक्षण करून नाममात्र शुल्कासहीत वाहनतळाची व्यवस्था करावी,.....

ठळक मुद्देरामदास तडस : रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक

ऑनलाईन लोकमतवर्धा : नगर परिषद क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी नगर परिषद क्षेत्रातील सर्व मोकळ्या जागाचे सर्वेक्षण करून नाममात्र शुल्कासहीत वाहनतळाची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हा सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार रामदास तडस यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., नगराध्यक्ष अतुल तराळे, आर्वीचे उपविभागीय महसूल अधिकारी प्रकाश शर्मा, हिंगणघाटचे समाधान शेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, समितीचे सदस्य सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, प्रणव जोशी, आॅटोचालक संघटनेचे देवा निखाडे, डिलर असोसिएशनचे राठी, व्यापारी असोसिएशनचे काशीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.वाहतूकीच्या नियमाचे पालन आणि सुरक्षित वाहन चालविण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह प्रभावीपणे राबवावा. या सप्ताहात लोकांना विविध माध्यमांद्वारे माहिती देत जनजागृती करावी. जिल्ह्यातील आॅटो चालकांना ई-रिक्षा चालविण्याबाबत प्रोत्साहित करावे. सेवाग्राम रेल्वे स्टेशन ते वर्धा शहर व बसस्थानक ते वर्धा शहर प्रिपेड आॅटो प्रणाली सुरू करावी, असेही याप्रसंगी खा. रामदास तडस म्हणाले.ई-रिक्षा चार्जिंगसाठी सोलर चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येईल. आॅटो चालकांनी ई-रिक्षा घेतल्यास त्यांना नि:शुल्क चार्जिंग करू देण्यात येईल. रस्ता निधीमधून ५ टक्के निधी हा शहरातील पी-१, पी-२ पार्कींग प्रतिबंधीत रस्ता, एकेरी मार्ग याचे फलक उभारणे व गतिरोधक उभारण्यासाठी खर्च करावे, अशा सूचना बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात. आॅटो चालकांनी मीटर लावणे अनिवार्य आहे. शासन नियमाप्रमाणे दर आकारण्यास आॅटो चालकांना बाध्य करावे. मीटर न लावणाºया आॅटो चालकांचे परवाने रद्द करावे, असे स्पष्ट निर्देशही जिल्हाधिकाºयांनी परिवहन विभागाला दिलेत. महामार्गावर हॉटेल आणि धाब्याच्या ठिकाणी ट्रकचालक ट्रक उभे करतात. बहूदा ते रस्त्यावरच वाहन उभे करतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. यासाठी सालोड हिरापूर येथे ट्रक टर्मिनल तयार ूूूूूकरण्याच्या सूचना सुद्धा जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यात राज्य महामार्गाची संख्या वाढल्यामुळे पोलीस चौकी उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे यावेळी प्रणव जोशी यांनी सांगितले.