शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

शहरात ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:43 IST

नगर परिषद क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी नगर परिषद क्षेत्रातील सर्व मोकळ्या जागाचे सर्वेक्षण करून नाममात्र शुल्कासहीत वाहनतळाची व्यवस्था करावी,.....

ठळक मुद्देरामदास तडस : रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक

ऑनलाईन लोकमतवर्धा : नगर परिषद क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी नगर परिषद क्षेत्रातील सर्व मोकळ्या जागाचे सर्वेक्षण करून नाममात्र शुल्कासहीत वाहनतळाची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हा सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार रामदास तडस यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., नगराध्यक्ष अतुल तराळे, आर्वीचे उपविभागीय महसूल अधिकारी प्रकाश शर्मा, हिंगणघाटचे समाधान शेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, समितीचे सदस्य सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, प्रणव जोशी, आॅटोचालक संघटनेचे देवा निखाडे, डिलर असोसिएशनचे राठी, व्यापारी असोसिएशनचे काशीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.वाहतूकीच्या नियमाचे पालन आणि सुरक्षित वाहन चालविण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह प्रभावीपणे राबवावा. या सप्ताहात लोकांना विविध माध्यमांद्वारे माहिती देत जनजागृती करावी. जिल्ह्यातील आॅटो चालकांना ई-रिक्षा चालविण्याबाबत प्रोत्साहित करावे. सेवाग्राम रेल्वे स्टेशन ते वर्धा शहर व बसस्थानक ते वर्धा शहर प्रिपेड आॅटो प्रणाली सुरू करावी, असेही याप्रसंगी खा. रामदास तडस म्हणाले.ई-रिक्षा चार्जिंगसाठी सोलर चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येईल. आॅटो चालकांनी ई-रिक्षा घेतल्यास त्यांना नि:शुल्क चार्जिंग करू देण्यात येईल. रस्ता निधीमधून ५ टक्के निधी हा शहरातील पी-१, पी-२ पार्कींग प्रतिबंधीत रस्ता, एकेरी मार्ग याचे फलक उभारणे व गतिरोधक उभारण्यासाठी खर्च करावे, अशा सूचना बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात. आॅटो चालकांनी मीटर लावणे अनिवार्य आहे. शासन नियमाप्रमाणे दर आकारण्यास आॅटो चालकांना बाध्य करावे. मीटर न लावणाºया आॅटो चालकांचे परवाने रद्द करावे, असे स्पष्ट निर्देशही जिल्हाधिकाºयांनी परिवहन विभागाला दिलेत. महामार्गावर हॉटेल आणि धाब्याच्या ठिकाणी ट्रकचालक ट्रक उभे करतात. बहूदा ते रस्त्यावरच वाहन उभे करतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. यासाठी सालोड हिरापूर येथे ट्रक टर्मिनल तयार ूूूूूकरण्याच्या सूचना सुद्धा जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यात राज्य महामार्गाची संख्या वाढल्यामुळे पोलीस चौकी उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे यावेळी प्रणव जोशी यांनी सांगितले.