शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

By admin | Updated: June 3, 2015 02:19 IST

हा भाग जंगलव्याप्त असून या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी जंगली श्वापदांमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करावा लागतो.

वनविभागाकडे तक्रार : दरवर्षी सोसावी लागते पिकांची नासाडीवर्धा : धामणगाव(वा.) हा भाग जंगलव्याप्त असून या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी जंगली श्वापदांमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. परिसरातील रहिवाश्यांचे उदरनिर्वाहाचे एकमात्र साधन शेती असून त्यातही नुकसान सोसावे लागत असल्याने यआ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी वनविभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.या भागातील शेतकऱ्यांना श्वापदांचा धोका असतो. शिवाय जंगलाचा परिसर शेतीला लागुन असल्याने रानडुक्कर, रोही, माकडे यांचा शेतात सतत वावर असतो. हे प्राणी शेतात शिरुन पिकांची नासाडी करतात. तर कधी रात्रीतून पीक फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक नुकसान सोसावे लागते. जंगली श्वापदांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने याचा भुर्दंड शेतकरी सहन करीत आहे. वनविभागाकडे याची तक्रार केली असता आजवर कोणतीच भरपाई देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. आजवर कोणतीच आर्थिक मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.(स्थानिक प्रतिनिधी)