शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

लागवड क्षेत्र वाढताच सोयाबीनचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:20 IST

Soyabean, Wardha News सततचा पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देसततचा पाऊस अन् किडीच्या प्रादुर्भावाचा फटकाशेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या हंगामात कापूस उत्पादकांना कापूस विक्रीकरिता चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवित सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ केली. मात्र, सततचा पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वर्धा जिल्ह्यासह राज्यभरातील इतरही जिल्ह्यातील हीच परिस्थिती असून अद्यापही सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाही, ही वास्तविकता आहे.

कापूस उत्पादकांना मागील वर्षीचा कापूस यावर्षीच्या हंगामापर्यंत घरात साठवून ठेवावा लागला. त्यातच कोरोनाचा प्रकोप वाढल्यो मिळेत त्या भावात विकावा लागला. यावर्षी वर्धा जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. विशेषत: यावर्षी ३० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड वाढविण्यात आली. पण, सततचा पाऊस, बोगस बियाण्यांची विक्री आणि येलो मोझॅक, चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी व खोडमाशी या रोगांच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान झाले. ही परिस्थिती सर्वत्र असून सध्या एकरी सात ते आठ क्विंटल सोयाबीन ऐवजी तीन ते चार पोते सोयाबीनचा उतारा मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न निम्मे झाल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.बोनस पिकच हातून गेलेदरवर्षी सोयाबीनच्या माध्यमातून दिवाळीच्या दिवसात शेतकऱ्यांना बोनस उत्पन्न मिळत असते. परंतु यावर्षी सोयाबीन वाढले पण, शेंगाचा पत्ता नाही. तसेच उत्पादनही निम्म्यावर आल्याने खर्चही भागणार नसल्याने शेतकºयांचे बोनसच गेल्यामुळे दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

कृषी विभाग बांधापासून लांबचसततच्या पावसाने पिकांवर मोठा आघात केला आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचा पंचनामा करुन शासकीय मदत मिळण्याची मागणी होत आहे. मात्र, कृषी विभाग अद्यापही पंचनाम्याकरिता बांधावर पोहोचलाच नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे पंचनामेच झाले नाही तर नुकसान भरपाई मिळणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :agricultureशेती