शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

लागवड क्षेत्र वाढताच सोयाबीनचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:20 IST

Soyabean, Wardha News सततचा पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देसततचा पाऊस अन् किडीच्या प्रादुर्भावाचा फटकाशेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या हंगामात कापूस उत्पादकांना कापूस विक्रीकरिता चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवित सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ केली. मात्र, सततचा पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वर्धा जिल्ह्यासह राज्यभरातील इतरही जिल्ह्यातील हीच परिस्थिती असून अद्यापही सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाही, ही वास्तविकता आहे.

कापूस उत्पादकांना मागील वर्षीचा कापूस यावर्षीच्या हंगामापर्यंत घरात साठवून ठेवावा लागला. त्यातच कोरोनाचा प्रकोप वाढल्यो मिळेत त्या भावात विकावा लागला. यावर्षी वर्धा जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. विशेषत: यावर्षी ३० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड वाढविण्यात आली. पण, सततचा पाऊस, बोगस बियाण्यांची विक्री आणि येलो मोझॅक, चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी व खोडमाशी या रोगांच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान झाले. ही परिस्थिती सर्वत्र असून सध्या एकरी सात ते आठ क्विंटल सोयाबीन ऐवजी तीन ते चार पोते सोयाबीनचा उतारा मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न निम्मे झाल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.बोनस पिकच हातून गेलेदरवर्षी सोयाबीनच्या माध्यमातून दिवाळीच्या दिवसात शेतकऱ्यांना बोनस उत्पन्न मिळत असते. परंतु यावर्षी सोयाबीन वाढले पण, शेंगाचा पत्ता नाही. तसेच उत्पादनही निम्म्यावर आल्याने खर्चही भागणार नसल्याने शेतकºयांचे बोनसच गेल्यामुळे दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

कृषी विभाग बांधापासून लांबचसततच्या पावसाने पिकांवर मोठा आघात केला आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचा पंचनामा करुन शासकीय मदत मिळण्याची मागणी होत आहे. मात्र, कृषी विभाग अद्यापही पंचनाम्याकरिता बांधावर पोहोचलाच नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे पंचनामेच झाले नाही तर नुकसान भरपाई मिळणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :agricultureशेती