शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:04 IST

शहरालगत असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या व शहरातील नागरिक, प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर शासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा सर्व्हिस सुरू करून आॅटोचालकांच्या मनमानीला लगाम लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना त्रास : प्रीपेड सर्व्हिस सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगत असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या व शहरातील नागरिक, प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर शासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा सर्व्हिस सुरू करून आॅटोचालकांच्या मनमानीला लगाम लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.सेवाग्राम रेल्वे स्थानक वर्धा शहराच्या बाहेर भागात आहे. या भागात सायंकाळनंतर फारशी वर्दळ राहत नाही. शिवाय दिवसाही रेल्वे गाड्यांच्याच वेळेत येथे वर्दळ दिसून येते. या रेल्वे स्थानकावर मध्य व दक्षीण भारतातून येणाºया अनेक रेल्वे गाड्या थांबतात. दरररोज साधारणत: २० ते २५ गाड्यांना येथे थांबा आहे. देश-विदेशातून येणारे अनेक पर्यटक सेवाग्रामसाठी येथेच उतरतात. येथील आॅटोचालक अतिशय मग्रुर असून त्यांची मनमानी चालली आहे. दीडशे ते दोनशे रूपयाच्या कमी भाडे ते घेतच नाही. या ठिकाणी आॅटोशिवाय दुसरी व्यवस्था नसल्याने व आॅटोचालक एकत्रिरित्या प्रवाश्यांना लुटण्याचे काम करीत असल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना आॅटोचालकांचा सहन करावे लागते. येथील आॅटोचालक दिवसभर येथे पत्ते पिसत राहतात. गाडी आले की प्रवाशांच्या वयाचेही भान न ठेवता त्यांच्यासोबत भावबाजीवरून वाद घालत असतात. ज्येष्ठ नागरिक, प्रवाशी यामुळे त्रस्त झाले आहे.रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे आॅटोचालकांची मनमानी वाढली आहे.चोकोलिंगम जिल्हाधिकारी असताना निश्चित केले होते दरया रेल्वे स्थानकावर रात्री बेरात्री रेल्वे गाड्या येतात. प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर लुट आॅटोरिक्षा चालक करिता असतात. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. चोकोलिंगम वर्धेचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी या रेल्वे स्थानकावरील आॅटोरिक्षा स्टॅँडवर उभ्या राहणाऱ्या आॅटोचे विविध ठिकाणचे दर निश्चित करून दिले होते. यापेक्षा अधिक पैसे घेणाºयांवर कारवाईचा दणकाही दिला होता. त्यामुळे प्रवाशांची लूट थांबली होती. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे मनमानी सुरू आहे.वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षशहराच्या अनेक चौकांमध्ये वाहनचालकांना पकडण्यासाठी सक्रिय राहणारे वाहतुक पोलीस सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या भागात भटकतानाही दिसत नाही. येथे वाहतुक पोलीस नसल्याने आॅटो चालकांचेच राज्य आहे. त्यांनी मनमानी दर आकारणी सुरू केली आहे. महिला प्रवाशांनाही घाणेरड्या भाषेत हे आॅटोचालक शिवीगाळ करतात. येथे वाहतुक पोलीस तैनात करून आॅटोचालकांची मनमानी थांबविण्याची गरज आहे.प्रीपेड आॅटो केंद्र सुरू करानागपूरसह देशाच्या विविध मोठ्या रेल्वे स्थानकावर प्रीपेड आॅटोरिक्षा स्टॅन्ड चालविले जाते. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा स्टॅन्ड सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशी मित्र मंडळाने केली आहे. येथून सीट प्रमाणे बस स्टॅन्डसाठी आॅटोरिक्षा सोडले जातात. त्या आॅटोत किमान दहा ते पंधराच्यावर प्रवाशी बसविले जातात व त्यांच्यासोबतही मनमानी केली जाते. येथील आॅटोचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आहे.