शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:04 IST

शहरालगत असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या व शहरातील नागरिक, प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर शासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा सर्व्हिस सुरू करून आॅटोचालकांच्या मनमानीला लगाम लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना त्रास : प्रीपेड सर्व्हिस सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगत असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या व शहरातील नागरिक, प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर शासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा सर्व्हिस सुरू करून आॅटोचालकांच्या मनमानीला लगाम लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.सेवाग्राम रेल्वे स्थानक वर्धा शहराच्या बाहेर भागात आहे. या भागात सायंकाळनंतर फारशी वर्दळ राहत नाही. शिवाय दिवसाही रेल्वे गाड्यांच्याच वेळेत येथे वर्दळ दिसून येते. या रेल्वे स्थानकावर मध्य व दक्षीण भारतातून येणाºया अनेक रेल्वे गाड्या थांबतात. दरररोज साधारणत: २० ते २५ गाड्यांना येथे थांबा आहे. देश-विदेशातून येणारे अनेक पर्यटक सेवाग्रामसाठी येथेच उतरतात. येथील आॅटोचालक अतिशय मग्रुर असून त्यांची मनमानी चालली आहे. दीडशे ते दोनशे रूपयाच्या कमी भाडे ते घेतच नाही. या ठिकाणी आॅटोशिवाय दुसरी व्यवस्था नसल्याने व आॅटोचालक एकत्रिरित्या प्रवाश्यांना लुटण्याचे काम करीत असल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना आॅटोचालकांचा सहन करावे लागते. येथील आॅटोचालक दिवसभर येथे पत्ते पिसत राहतात. गाडी आले की प्रवाशांच्या वयाचेही भान न ठेवता त्यांच्यासोबत भावबाजीवरून वाद घालत असतात. ज्येष्ठ नागरिक, प्रवाशी यामुळे त्रस्त झाले आहे.रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे आॅटोचालकांची मनमानी वाढली आहे.चोकोलिंगम जिल्हाधिकारी असताना निश्चित केले होते दरया रेल्वे स्थानकावर रात्री बेरात्री रेल्वे गाड्या येतात. प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर लुट आॅटोरिक्षा चालक करिता असतात. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. चोकोलिंगम वर्धेचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी या रेल्वे स्थानकावरील आॅटोरिक्षा स्टॅँडवर उभ्या राहणाऱ्या आॅटोचे विविध ठिकाणचे दर निश्चित करून दिले होते. यापेक्षा अधिक पैसे घेणाºयांवर कारवाईचा दणकाही दिला होता. त्यामुळे प्रवाशांची लूट थांबली होती. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे मनमानी सुरू आहे.वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षशहराच्या अनेक चौकांमध्ये वाहनचालकांना पकडण्यासाठी सक्रिय राहणारे वाहतुक पोलीस सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या भागात भटकतानाही दिसत नाही. येथे वाहतुक पोलीस नसल्याने आॅटो चालकांचेच राज्य आहे. त्यांनी मनमानी दर आकारणी सुरू केली आहे. महिला प्रवाशांनाही घाणेरड्या भाषेत हे आॅटोचालक शिवीगाळ करतात. येथे वाहतुक पोलीस तैनात करून आॅटोचालकांची मनमानी थांबविण्याची गरज आहे.प्रीपेड आॅटो केंद्र सुरू करानागपूरसह देशाच्या विविध मोठ्या रेल्वे स्थानकावर प्रीपेड आॅटोरिक्षा स्टॅन्ड चालविले जाते. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा स्टॅन्ड सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशी मित्र मंडळाने केली आहे. येथून सीट प्रमाणे बस स्टॅन्डसाठी आॅटोरिक्षा सोडले जातात. त्या आॅटोत किमान दहा ते पंधराच्यावर प्रवाशी बसविले जातात व त्यांच्यासोबतही मनमानी केली जाते. येथील आॅटोचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आहे.